प्रस्तावना
ज्ञान प्रबोधिनीमध्ये आधुनिक स्वरूपात इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी विद्याव्रत संस्कार सुरू झाला, त्याला आता पंचेचाळीस वर्षे होतील. पहिली वीस वर्षे हा विद्याव्रत संस्कार ज्ञान प्रबोधिनीच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच मुख्यतः होत असे. त्यानंतरची पंचवीस वर्षे मात्र महाराष्ट्रातील अनेक शाळांमधून आणि पालकांनी किंवा स्वयंसेवी वृत्तीच्या शिक्षकांनी तयार केलेल्या अनौपचारिक गटांमध्येही, हजारो विद्यार्थ्यांसाठी हा विद्याव्रत संस्कार झालेला आहे. शहरी आणि ग्रामीण, मुले व मुली यांच्यासाठी हे संस्कार कार्यक्रम योजण्यात आले. त्यामध्ये अनेक जातींचे आणि काही प्रमाणात मुस्लिम व ख्रिश्चन विद्याथ व विद्यार्थिनीही सहभागी झाले.
विद्याव्रत संस्कारापूव व्यक्तिमत्त्व विकसनाविषयीची व्याख्यानमाला, व्याख्यानांवरच्या गटचर्चा, कृतिसत्रे आणि शिबिरे अशी अनेक प्रकारे पूर्वतयारी होते. व्याख्यानांचा आशय ‘व्यक्तिविकासासाठी विद्याव्रत’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीत संकलित केलेला आहे. विद्याव्रत संस्काराचा हेतू व स्वरूप समजून घेऊन, विद्याथ हा संस्कार त्यांना का करून घ्यावासा वाटतो, अशा आशयाचे मनोगत आधी लिहितात आणि मग हा विद्याव्रत संस्कार होतो. या संस्कारासाठी तयार केलेल्या पोथीमध्ये अनेक उत्तम गेय चाली असलेले श्लोक व अभंग आहेत. संगीताची जोड दिल्यामुळे या पोथीचे पठण व श्रवण दोन्ही अतिशय हृद्य होते. अतिशय भारावलेल्या वातावरणात विद्याथ या कार्यक्रमात मनापासून सहभागी होतात व व्रतचिह्न घेतात. श्लेोकांच्या गायनानंतर प्रत्येक श्लोकाचा मराठीतून अर्थही वाचला जातो. त्यामुळे आधीच्या व्याख्यानांमध्ये व चर्चांमध्ये ऐकलेल्या विचारांची उजळणी होते.
1976 नंतर 1989 मध्ये व 1996 मध्ये या पोथीच्या आणखी दोन आवृत्त्या निघाल्या. त्यामध्ये एखाद-दुसरा श्लोक वगळण्यात आला व काही ठिकाणी अर्थाचे पुनर्लेखन करण्यात आले. 1. संकल्प, 2. विद्याव्रत स्वीकारणे म्हणजे काय?, 3. ब्रह्मचर्याश्रमाचे यमनियम, 4. गद्य संकल्प, 5. यज्ञाग्नीच्या साक्षीने, 6. व्रतचिह्न धारण आणि 7. गायत्री मंत्र संथा, असे या पोथीचे मुख्य भाग आहेत. हा त्या संस्काराचा ढाचा आहे. या चौथ्या आवृत्तीमध्ये मात्र पोथीचा मूळ ढाचा कायम ठेवून, काही जुने श्लोक वगळण्यात आले व काही नवीन श्लोक घालण्यात आले आहेत. मुद्रण करण्यापूव एक वर्ष या पोथीचे प्रारूप सुमारे दहा ठिकाणी वापरून पाहिले. आलेल्या सूचनांनुसार त्या प्रारूपात आणखीन काही बदल केले व मग याचे अंतिम मुद्रण केले आहे. तसेच यमनियमांमध्ये सद्गुरू-सेवा हे एका व्रताचे शीर्षक बदलून त्याऐवजी ‘गुरूंविषयी आदर आणि प्रेम’ असे विद्यार्थ्यांना अधिक समजणारे शीर्षक केले आहे. श्लोकांची संख्या कमी झाल्यामुळे व्रत घेणारे चाळीस विद्याथ असतील तर या पोथीचे पठण व श्रवण करायला दीड तास लागतो. विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे हा वेळ कमी जास्त होऊ शकेल.
श्लोकांचा व अभंगाचा अर्थ समजून घेऊन अध्वर्यूने समोरचे विद्याथ पाहून, छापील अर्थ वाचण्याऐवजी त्यांना समजेल, अशा पद्धतीने आपल्या शब्दांत अर्थ सोपा करून सांगितला तरी संस्काराच्या पावित्र्याला काही धक्का बसणार नाही. प्रबोधिनी-प्रणीत संस्कार अर्थ समजून घेऊन व्हावेत, अशीच अपेक्षा आहे. ज्या अध्वर्यूंची स्वतंत्रपणे अर्थ सांगण्याइतकी तयारी नाही, त्यांच्या सोयीसाठी या पोथीतला अर्थ छापलेला आहे. अर्थ सांगणे हा या संस्काराचा अविभाज्य भाग आहे. छापलेला अर्थच वाचला पाहिजे असे बंधन मात्र नाही. ग्रामीण भागातील विद्याथही पुरेसा सराव झाला, तर या पोथीतील सर्व श्लोक म्हणू शकतात. उलट सराव करून म्हणल्यामुळे पोथीची परिणामकारकता वाढते. या पोथीतील सर्व श्लोकांच्या चाली ध्वनिमुद्रित केलेल्या असून त्या ज्ञान प्रबोधिनीच्या www.jnanaprabodhini.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या चालींवर श्लोक म्हटले तर संस्कार अधिक परिणामकारक होतो. शक्यतो या चाली शिकून घेऊनच अध्वर्यूने पेटी, तंबोऱ्यासह श्लोक सांगावेत. अपवादात्मक परिस्थितीत साध्या चालींमध्येही श्लोक म्हटलेले चूक ठरणार नाही.
गिरीश श्री. बापट
पुनर्मुद्रण दिनांक –
सौर चैत्र 27, शके 1945 (दि. 17 एप्रिल 2023)
प्रती – 1000
मूल्य रु. 30/-
******************************************************************************************************************
तिसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना
मागील काही वर्षांमध्ये ज्ञान प्रबोधिनीच्या पुणे, निगडी व सोलापूर येथील शाळा सोडून अन्य शहर व ग्रामीण संस्थांमध्ये विद्याव्रत संस्काराचे अनेक कार्यक्रम झाले. या सर्व ठिकाणी समारंभापूवची व्याख्यानमाला योजताना मुद्रित साहित्य असेल तर त्या-त्या शाळांमधील अध्यापकही ही व्याख्याने देऊ शकतील असे वाटत होते. अनेक विद्यार्थ्यांनाही व्याख्यान एकदा ऐकले तरी उजळणीसाठी ते मुद्रित स्वरूपात असेल तर बरीच सोय होईल हे लक्षात येत होते. त्या दृष्टीने ऑगस्ट 1993 मध्ये ‘व्यक्तिविकासासाठी विद्याव्रत’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. गेल्या तीन वर्षांमध्ये या पुस्तकाला फारच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
‘व्यक्तिविकासासाठी विद्याव्रत’ यासारखे पुस्तक वाचून व्यक्तिमत्त्वाचे पाच पैलू कोणते हे सहजच ध्यानात येईल. प्रसंगी ते मुलांना आवडेलही; पण एखादी गोष्ट आपल्याला समजली आणि आवडलीही तरी तिचा अवलंब आपण करू अशी ग्वाही देता येत नाही. याचे कारण कळणे आणि वळणे यामध्ये बहुधा अंतर असतेच!
सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व नागरिकशास्त्राच्या अध्ययनातून कळले. त्याचा अभ्यासही केला. त्या परीक्षेत उत्तम गुणही मिळविता आले. तरी रस्त्याने जाता जाता आपण शेंगा खाऊन त्यांची टरफले आणि कागद सहजच रस्त्यावर टाकून देतो! मग त्या अभ्यासाचा अन् उत्तम गुणांचा काय उपयोग? मिळालेल्या ज्ञानामुळे स्वत:च्या वागण्यात योग्य तो बदल घडवून आणता येणे, म्हणजेच खरे शिक्षण होय. हे ध्यानी घेऊन विकसनाचे महत्त्व पटलेल्याने त्यासाठी आवश्यक त्या दिशेने प्रवास सुरू करायला हवा. हे आपोआप होत नाही. त्यासाठी पक्का निर्धार करावा लागतो. एक प्रकारचा संकल्प करावा लागतो. व्यायामाने शारीरिक विकसन उत्तम होते, हे कळून भागत नाही. ‘रोजच्या रोज इतके जोर मी काढीनच’, ‘निदान बारा सूर्यनमस्कार घातल्यावाचून मी जेवणार नाही’ असे निश्चय करावे लागतात. ते पाळावे लागतात. मग काही काळाने त्याचे फळ मिळू शकते.
आपल्या प्रकृतीला अपायकारक आहे असा पदार्थ, आपल्याला कितीही आवडत असला तरी त्याचा मोह टाळणे आणि प्रसंगी तितकासा न आवडणारा पदार्थ समजून-उमजून खाणे हे ज्याला जमलं, त्याला मानसिक विकास साधणं शक्य आहे.
एकाही दिवसाचा अपवाद न करता, रोजच्या रोज काहीतरी नवीन शिकणे, बौद्धिक विकसनासाठी आवश्यक आहे. निरीक्षण, पाठांतर, प्रयोग करणे, लेखन, वाचन इ. नानाविध मार्गांनी ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करणे म्हणजे अभ्यास!
स्वत:प्रमाणे इतरांनाही सुख आणि दु:ख होत असते. हे समजून त्यांना सुखविणे आणि दु:ख न देणे, याची जर सवय होऊ शकली, तर आत्मिक विकासाचा छोटासा का होईना प्रारंभ होतो.
अशा स्वरूपाचे संकल्प केव्हातरी एकदा विद्याव्रत संस्काराच्या वेळी केले म्हणजे पुरतील, असे नाही. असे संकल्प रोजच्या रोज अंतर्मुख होऊन स्वत:शीच करता येतात. देवावर विश्वास ठेवणाऱ्याने त्या देवाची मूत मिटलेल्या डोळ्यांसमोर आणून त्याच्या साक्षीने निश्चय केला किंवा आपण आपल्याशीच संवाद करीत असा निश्चय केला, तर तो संकल्प मनामध्ये रुजून सफल होण्याची शक्यता अधिक असते. स्वत:च्या विकासाचा निश्चय रोजच्या रोज अधिकाधिक पक्का करत जाणे, त्यासाठी स्वत:च्या मनाला आणि विश्वशक्तीला आवाहन करणे म्हणजेच उपासना!
ज्ञान प्रबोधिनीमध्ये सुमारे पंधरा ते वीस मिनिटांची अशी उपासना गेली कित्येक वर्षे रूढ झालेली आहे. आवश्यक वाटले तर या उपासनेची पोथी समोर ठेवून तिच्यावरून आपण आपली उपासना सुरू करावी. मंत्राचे उच्चार शिकण्यासाठी आवश्यक वाटल्यास या उपासनेची ध्वनिफीत प्रबोधिनीतून उपलब्ध होऊ शकते.
परंपरागत व्रतबंधानंतर बटूने संध्या करावी, अशी अपेक्षा असते. सध्याच्या काळात संध्या करणारे आणि शिकविणारे अशा दोहोंची संख्या कमी होत चालली आहे. ज्ञान प्रबोधिनी प्रणीत विद्याव्रत संस्कार उपासना पोथीमधील मंत्र शिकविण्याची व्यवस्था आहे.
ज्ञान प्रबोधिनीच्या पद्धतीने प्रामुख्याने सामूहिक विद्याव्रत संस्कार जास्ती प्रमाणात होत असतात. अलीकडे या पद्धतीने एकेका व्रताथचे उपनयनही होते. असे एका व्रताथचे उपनयन करत असताना पोथीमधील गद्य संकल्प एकवचनी (कंसामधील) वाचावा. धूपदाणी फिरविणे, बैठक व्यवस्था, अशा तपशिलांमध्ये सोयीनुसार बदल करावेत.
व्यक्तिगत उपनयन कार्यक्रमात उपासना पोथीतील श्लोकांचा अर्थविस्तार करताना त्या व्रताथशी संबंधित असे संदर्भ स्पष्टीकरणासाठी घेता येतील. यासाठी अध्वर्यूने व्रताथच्या सवयी, आवडी-निवडी इ. ची आधीच माहिती करून घेतल्यास उपयुक्त होईल.
सामूहिक विद्याव्रत कार्यक्रमात प्रत्येक व्रताथचा असा संदर्भ घेणे व्यवहारत: शक्य नसते; परंतु सामूहिक मंत्रपठणामुळे, अभंगाच्या गायनामुळे, त्यामध्ये सुस्वरतेमुळे जे वातावरण निर्माण होते, त्याचा व्रताथच्या मनावर आणि अन्य उपस्थितांवरही सखोल संस्कार होतो.
या पोथीतील मंत्र अर्थाच्या दृष्टीने अवघड आहेत. त्यामुळे अर्थाच्या दृष्टीने गद्य भागात काही सोपेपणा आणण्याची आवश्यकता पोथीच्या द्वितीय आवृत्तीपासून जाणवत होती. त्याप्रमाणे या आवृत्तीमध्ये काही सोपेपणा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ‘व्यक्तिविकासासाठी विद्याव्रत’ या पुस्तकाच्या व प्रस्तुत पोथीच्या साहाय्याने अनेकानेक ठिकाणी विद्याव्रतग्रहण समारंभ योजले जावेत अशी इच्छा आहे. असे कार्यक्रम योजणाऱ्यांना ज्ञान प्रबोधिनीतून सर्व प्रकारचे साहाय्य उपलब्ध होऊ शकेल.
य. शं. लेले
संस्कृत संस्कृति संशोधिका
ज्ञान प्रबोधिनी
तृतीय आवृत्ती प्रकाशन दिनांक –
अक्षय तृतीया
सौर चैत्र 30, शके 1918 (20 एप्रिल 1996)
*******************************************************************************************************************
पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना
ज्ञान प्रबोधिनीमध्ये हिंदू संस्कृतीची म्हणजेच भारतीय संस्कृतीची जोपासना झाली पाहिजे असा आग्रह आहे. आपल्या देशाच्या शिक्षण पद्धतीमध्ये जे महत्त्वाचे गुण प्रकट झालेले आहेत, त्यांचे रक्षण आणि संवर्धन झाले पाहिजे, हा त्यामागील विचार आहे. या विचारानुसार वर्षारंभ अथवा उपाकर्म अथवा श्रावणी समारंभ कसा असावा, तसेच वर्षान्त अथवा उत्सर्ग अथवा उत्सर्जन समारंभ कसा असावा, याच्या पोथ्या ज्ञान प्रबोधिनीत नव्याने रचलेल्या आहेत आणि हे समारंभ ज्ञान प्रबोधिनीत प्रतिवष होत असतात.
उपनयन हा शैक्षणिक संस्कार
या शैक्षणिक समारंभात दीक्षा अथवा उपनयन अथवा विद्याव्रत-धारण या समारंभाची भर घालीत आहोत. पूर्वपरंपरेत वयाच्या आठ, दहा किंवा बारा या वष मुंज अथवा उपनयन व्हावे असे म्हटलेले आहे. जुन्या काळात विद्याथ स्वत:चे घर सोडून गुरुगृही जात असे. आताच्या काळात घर सोडण्याचा अथवा गुरुगृही जाण्याचा प्रश्न नाही. अशा स्थितीत उपनयन समारंभ आठव्या वष करण्याचे कारण नाही. उपनयन समारंभाने ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश करावयाचा असतो असे म्हटले, तर ब्रह्मचर्याश्रमाचे यमनियम ज्या वयात कळू शकतील असे वय संस्कारार्थ घेणे हे उचित होईल. हे वय सामान्यत: तेरा-चौदा असे येते आणि मुलगा अथवा मुलगी त्यावेळी इयत्ता आठवीमध्ये असते. ज्ञान प्रबोधिनीमध्ये उपनयन संस्कार करण्याला हे वय आम्ही योग्य समजतो.
विविध संस्कार अर्थपूर्ण झाले पाहिजेत यावर ज्ञान प्रबोधिनीचा कटाक्ष आहे. यासाठी विवाह पोथीसुद्धा आम्ही छापून प्रसिद्ध केली आहे. या विवाह पोथीमध्ये सर्व मंत्र धर्मनिर्णय मंडळाने प्रसिद्ध केलेल्या पोथीतील घेतलेले आहेत. हे मंत्र इतके चांगले आहेत की त्यात भर घालण्याचे कोणतेच कारण दिसले नाही. धर्मनिर्णय मंडळाची विवाह पोथी ज्ञान प्रबोधिनीच्या पद्धतीने पुनर्रचित करून ती मांडणे एवढेच काम या पोथीमध्ये केलेले आहे. ही विवाह पोथी त्यामुळे अर्थवाही झालेली आहे आणि म्हणून ती हृद्यसुद्धा आहे.
नव्या पोथीची रचना
उपलब्ध असलेली उपनयनाची पोथी अथवा संस्कार हा पुरेसा अर्थवाही आहे, असे वाटेना आणि त्यामुळे उपलब्ध उपनयन पोथीतील जवळजवळ कोणतेच मंत्र आताच्या पोथीत घेता आलेले नाहीत. ब्रह्मचर्र्याश्रमाचे यमनियम काय, याचा ऊहापोह असला तर तो वेदारंभ संस्कारात केलेला आढळला. या संस्काराच्या मंत्रामध्ये वेदाध्ययन करणाऱ्या ब्रह्मचाऱ्याने दुपारी झोपू नये, क्रोध आणि मिथ्यावचन सोडून द्यावे इत्यादी सांगितलेले आहे. पण प्रचलित पद्धतीत हा वेदारंभ संस्कार होत नसल्याने त्याच्याशिवाय उरलेली उपनयन संस्कार पोथी पुरेशी अर्थवाही आहे, असे वाटेना.
यासाठी नव्याने रचलेल्या या पोथीमध्ये वेद, उपनिषदे आणि गीता यांतील मंत्रांचा उपयोग करून मांडणी केलेली आहे. या पोथीमध्ये सत्य, ज्ञान, अनंत असे जे ब्रह्म; ते जाणून जीवितरचना करणे म्हणजे ब्रह्मचर्याश्रमाचे यमनियम-युक्ताहारविहार, इंद्रिय संयमन, दैनंदिन उपासना, स्वाध्यायप्रवचन, सद्गुरू-सेवा, व्यक्तिमत्त्व विकसन आणि राष्ट्र-अर्चना एवढ्या विषयांचा ऊहापोह केला आहे. या विषयांची चर्चा झाल्यानंतर अग्निदेवाच्या साक्षीने याबद्दल व्रत पाळण्याची मनोमन प्रतिज्ञा करणे आणि त्या प्रतिज्ञेचे चिह्न म्हणून यज्ञोपवीत अथवा ताईत अथवा कडे अथवा क्रॉस अथवा जे चिह्न विद्याव्रत धारण करणाऱ्या व्रताथला प्रिय आणि आनंददायक वाटेल, ते त्याने धारण करावे, अशी मांडणी केली आहे.
मुलींचे उपनयन
हा उपनयन संस्कार अथवा विद्याव्रत-धारण समारंभ अथवा दीक्षा-समारंभ केवळ मुलांच्या पुरताच मर्यादित आहे असे नव्हे. मुलींच्यासाठीसुद्धा हा संस्कार उपलब्ध व्हावा अशी कल्पना आहे. आर्य समाजाचे संस्थापक ऋषी दयानंद यांनी याचे प्रयोजन पूवच सांगितलेले असून आर्य समाजात मुलींच्याही मुंजी होतात. कारण मुलींनीसुद्धा पंडिता, ब्रह्मवादिनी झाले पाहिजे आणि त्यासाठी विद्याव्रत घेऊन ते निष्ठेने आचरले पाहिजे.
हा संस्कार सर्वांना उपलब्ध
पूर्वपरंपरेमध्ये उपनयन हा संस्कार केवळ त्रैवर्णिकांपुरता होता. स्वामी दयानंद यांनी हा संस्कार सर्व वर्णांना पूवच उपलब्ध करून दिला. 1946 साली मी अमृतसरला गेलो होतो, तेथे एका तथाकथित अस्पृष्ट वर्णाच्या विद्यार्थ्याला स्नान करून शुद्ध वाणीने संस्कृतमध्ये संध्यावंदन करताना पाहिले, त्यावेळी मनाला एक विलक्षण आनंद झाला.
या गोष्टीला तीस वर्षे होऊन गेली. तथापि अद्यापसुद्धा महाराष्ट्रात सर्व वर्णांतून उपनयन संस्कार रूढ झालेला आहे घडलेले नाही. उलट हा संस्कार मागेच पडला आहे. स्वामी विवेकानंद म्हणत असत, आमच्या अध्यात्माची रत्ने आम्ही सर्वांना उपलब्ध करून दिली पाहिजेत. गेल्या तीस वर्षांत आमचे अध्यात्मच आम्ही गमावून बसतो की काय असे वाटण्याजोगी परिस्थिती आलेली दिसते. त्यामुळे त्यातील रत्ने सर्वांना उपलब्ध करून देणे दूरच राहिले. विद्याव्रत संस्कार, विवाह संस्कार आणि अंत्येष्टी संस्कार हे केवळ तीनच संस्कार सर्व हिंदू समाजाला त्यांतील अर्थाच्या अनुभूतीसह उपयोजिता आले तर लोकांत नवचैतन्य आल्याशिवाय राहणार नाही.
हिंदुंपुरता मर्यादित नाही
विद्याव्रत संस्कार हा केवळ हिंदूंच्या पुरताच मर्यादित खासच नाही. विद्याव्रत हे फक्त हिंदूंनीच घ्यावयाचे आहे; आणि पारशी, ख्रिश्चन, मुसलमान यांतील विद्यार्थ्यांना हे व्रत घेता येणार नाही, असे त्यात काहीही नाही. पारशी, ख्रिश्चन, मुसलमान यांतील जाणकार व्यक्तींना हा संस्कार आनंददायक आणि उपयुक्त वाटेल अशी खात्री आहे. अन्यधमय मुलांवर हा संस्कार झाला तर ते बाटतील, अशी कल्पना करणे चुकीचे आहे. पारशी समाजामध्ये मौंजीबंधन समारंभ पहिल्यापासून आहेच. ख्रिश्चन आणि मुसलमान विद्यार्थ्यांत तो नव्याने रुजवावा लागेल. असा संस्कार होत असताना मन काहीसे व्यापक करायला लागेल. ख्रिस्तजन्माच्या प्रसंगी चर्चमध्ये जाऊन गुडघे टेकून एखाद्या हिंदूने प्रार्थना केली, तर तो हिंदू बाटला, अथवा तो कमी प्रकारचा हिंदू झाला असे आता कोणी समजत नाही. तसेच ईदच्या दिवशी मशिदीत जाऊन अथवा मशिदीच्या पायऱ्यांवर बसून गुडघे टेकून एखाद्या हिंदूने अल्लाची उपासना केली तर तो मुसलमान झाला, असे म्हणणे चूक होईल. सर्वधर्मसमभाव ज्यांना पाळावयाचा आहे, त्यांनी बाटण्याची भीती सोडून दिली पाहिजे.
भारतीय संस्कृतीच्या द्वारे येशू ख्रिस्ताचा विचार प्रकटला पाहिजे, असे कित्येक ख्रिश्चन धर्माग्रणींचे मत आहे. यामधे कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट हे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. या विचारानुरूप विशेषत: कॅथॉलिकांनी आपल्या उपासना पद्धतीत काही सुधारणा केलेल्या आहेत. मेरी आणि येशू ख्रिस्त यांची चित्रे ते भारतीय वेषभूषेत काढतात. चर्चमध्ये प्रार्थनेसाठी विशेष प्रकारची बाके ठेवण्याची पद्धत पाश्चात्य देशांत आहे आणि हिंदुस्थानामध्येही आहे. पण आताच्या दिवसांत भारतीय परंपरेनुसार आसनमांडी घालून ख्रिस्ताची उपासना करण्याची पद्धत हिंदुस्थानात रूढ होते आहे. भारतीय पद्धतीने एखादा ख्रिश्चन आसनमांडी घालून बसला म्हणजे तो बाटला, तो हिंदू झाला असे समजावयास ख्रिश्चन धर्मगुरू आता तयार नाहीत.
या ऊहापोहाचा अर्थ एवढाच आहे की, ख्रिश्चन आणि मुसलमान विद्यार्थ्यांनी ईश्वरास स्मरून विद्याव्रत संस्कार स्वत:वर करून घेतला तर त्यामुळे ते कमी ख्रिश्चन अथवा कमी मुसलमान झाले, असे समजण्याचे काहीही कारण नाही. आमच्या धर्माची उपासना पद्धती आणि उपास्य दैवते भिन्न असली तरी सांस्कृतिकदृष्ट्या आणि समाजदृष्ट्या आम्ही हिंदुस्थानातील इतर धर्मबांधवांपैकीच आहोत, अशी विचारपद्धती रूढ व्हावयास पाहिजे. आम्ही इंडियन ख्रिश्चन आहोत, अथवा इंडियन मुसलमान आहोत आणि जगतातील इतर ख्रिश्चनांपेक्षा अथवा मुसलमानांच्यापेक्षा वेगळे आहोत, म्हणजेच आम्ही भारतीय आहोत, अथवा प्रथम हिंदू आणि नंतर ख्रिश्चन आहोत, प्रथम हिंदू आणि मग मुसलमान आहोत, म्हणजेच हिंदू-ख्रिश्चन वा हिंदू-मुसलमान आहोत, अशी विचारसरणी रूढ होणे हे देशहिताचे होईल यात शंका नाही. ज्ञान प्रबोधिनीमध्ये हिंदू समाजातील सर्व वणयांना हा उपनयन संस्कार हृद्य वाटल्याचा अनुभव आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या उद्योग व्यवसायांतील कर्मचारी सदस्यांसाठी साप्ताहिक उपासना असते. या उपासनेत मुसलमान आणि ख्रिश्चन कर्मचारी सदस्य त्यांच्या हिंदू बांधवांइतकेच तन्मय होऊन जातात असा अनुभाव आहे. ज्ञान प्रबोधिनी हे सर्वधर्मसमभाव मानणारे आणि जोपासणारे विद्यापीठ आहे. उद्या ना परवा उपनयन संस्कारातसुद्धा सर्व धर्मांचे विद्याथ असल्याचा अनुभव येथे येईल असा विश्वास वाटतो.
संस्कार पद्धती
या नव्या विद्याव्रत पोथीतील मंत्रांना रागदारीतील चाली लावलेल्या आहेत. त्या चालींच्यामुळे संस्काराचे गांभीर्य, अर्थवाहित्व आणि संस्कार ग्रहण करण्याची, अर्थ जाणण्याची शक्ती वाढलेली अनुभवास येते.
हरि: ओम् ने प्रारंभ केल्यापासून ओम् तत्सत् ने शेवट होईपर्यत एक तास पंचेचाळीस मिनिटे लागतात. हा वेळ कसा जातो हे कळतसुद्धा नाही. जे दीक्षा घेणारे विद्याथ असतात ते समुदायाच्या मध्यभागी चौकोनात बसलेले असतात. त्यांच्या गटनायकांना मागे पुढे जाता येईल अशी मोकळी जागा ठेवलेली असते. या विद्यार्थ्यांच्या दोन्ही बाजूंनी आणि पाठीमागे नववी-दहावीचे विद्याथ, स्त्री-पुरूष पालक आणि स्त्री-पुरूष निमंत्रित बसलेले असतात.
इयत्ता आठवीचे विद्याथ हे प्रत्यक्ष दीक्षाथ असतात आणि बाकीचे विद्याथ व पालक हे पूव घेतलेल्या अशाच व्रताची उजळणी करीत असतात. प्रेक्षक म्हणून कोणीच नसते. उपस्थित असलेल्या सर्वांनी तितक्याच तन्मयतेने अध्वर्यूच्या पाठोपाठ मंत्र म्हणावयाचे असतात. या दीक्षा समारंभास आठवीच्या पुढील कन्यका उपस्थित राहू शकतात. तथापि त्यांचा विद्याव्रत धारण संस्कार आणि मुलांचा असाच संस्कार स्वतंत्रपणे योजलेला असतो. एकत्र नाही.
पूर्वतयारी
हा दीक्षा संस्कार होण्याच्या आधी सुमारे महिनाभर आठवीच्या विद्यार्थ्यांना या संस्काराचे गांभीर्य आणि आचरण समजावून सांगितलेले असते. सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणून सहा व्याख्यानांची आयोजना केलेली असते. या व्याख्यानांत खालील विषय असतात.
1. शरीर सुंदर, सतेज करणे.
2. मन सुदृढ, पवित्र्ा करणे.
3. इंद्रियसंयमन आणि चांगल्या सवयींची शक्ती मिळविणे.
4. बुद्धीचे दश पैलू समजाऊन घेऊन त्यांची जोपासना करणे.
5. आत्मशक्ती वाढविणे आणि प्रेरणासंपन्न नेतृत्व घडविणे.
6. विश्वशक्ती आणि तिची उपासना.
अशा प्रकारे या सहा व्याख्यानांनी केवळ आठवीतील नव्हे तर दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा ब्रह्मचर्याश्रमाच्या विचाराबद्दल अभ्यास होत असतो. आठवीच्या विद्यार्थ्यांची यासंबंधीची सिद्धता विशेष होत असते.
पाचवी, सहावी, सातवी या इयत्तांतील विद्याथ अथवा विद्यार्थिनींना या व्याख्यानांना वा संस्कार समारंभाला प्रवेश नसतो. हा संस्कार समारंभ म्हणजे काही विशेष आहे, आणि त्याला काही सिद्धता व्हावी लागते, हे त्यांना कळावे आणि त्यांची उत्सुकता वाढवावी असा त्यात हेतू असतो.
दीक्षा समारंभ झाल्यानंतर आठवीच्या विद्यार्थ्यांना दैनंदिन उपासना कशी करावी याचे शिक्षण देण्यात येते.
असा हा उपनयन अथवा दीक्षा अथवा विद्याव्रत धारण संस्कार ज्ञान प्रबोधिनीमध्ये 1973 सालापासून करण्यात येत आहे. सर्व वर्णांचे विद्याथ त्यात अपवाद न करता आनंदाने भाग घेतात असा अनुभव आहे. या संस्काराचे परिणाम इष्ट आणि खोलवर होतात असाही अनुभव आलेला आहे. पूव ज्यांचे पारंपरिक पद्धतीने उपनयन झालेले आहे अशांच्यावरसुद्धा हा संस्कार करण्यात येतो. हा संस्कार म्हणजे काही तरी भोळेपणा, काही तरी मागासलेपणा, विज्ञानाबरोबर प्रतारणा असे कोणालाही वाटत नाही. याच्या उलट हा संस्कार अत्यंत बुद्धिनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, प्रचोदक, सदाचाराची आणि कर्तव्याची बीजे मनात रुजविणारा, ईश्वरी शक्तीची अनुभूती देणारा असा असतो. असेच मत लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांनी उपस्थित राहून याचा अनुभव घेतला, त्यांचे झाले असल्याचे आढळलेले आहे.
या संस्काराचा प्रयोग ज्यांना करावासा वाटेल त्यांना ज्ञान प्रबोधिनीतून सर्व साहाय्य मिळू शकेल.
वि. वि. पेंडसे
*******************************************************************************************************************
उपनयन साहित्य व विद्याव्रत उपासना पूर्वतयारी
- फुले, अक्षता, अष्टगंध, समिधा, तूप, कापूर, काडेपेटी, यज्ञवेदीसाठी विटा, सर्व व्रताथसाठी व्रतचिह्न
- सर्व व्रताथकडे – पाण्याने भरलेले फुलपात्र, छोटे ताम्हण अथवा छोटी ताटली, दोन किंवा तीन फुले, अक्षता
- तंबोरा, पेटी, टाळ, शक्य झाल्यास तबला, ध्वनिवर्धक व्यवस्था, शक्य झाल्यास अध्वर्यू व आचार्य यांना पोथी ठेवण्यासाठी चौरंग
व्रताथच्या समोर शक्यतो 15 x 20 फूट आकाराचे सुमारे 2 ते 2॥ फूट उंचीचे व्यासपीठ उभारलेले असते. ते चांगल्या रीतीने सजविलेले असावे. पाठीमागे ओम् आकारलेला असावा. व्यासपीठावर अध्वर्यू उत्तरेकडे तोंड करून बसलेले असावेत. त्यांच्यामागे तंबोरा घेऊन व बाजाची पेटी घेऊन दोघेजण बसलेले असावेत. व्यासपीठाच्या मध्यभागी एक 1॥ x 1॥ फूट आकाराची 8 इंच उंचीची यज्ञवेदी केलेली असावी. या यज्ञवेदीच्या तळाशी पत्रा ठेवलेला असावा किंवा विटांचा थर असावा. तो अशाकरिता की निखाऱ्यामुळे व्यासपीठाचे लाकूड जळू नये.
यज्ञकुंडात समिधा, चंदनाचा चुरा आणि कापूर वड्या आधीच घालून ठेवलेले चांगले. कापूर वड्या पेटल्याबरोबर चुरा आणि समिधा पेट घेतील. त्यावर तुपाची आहुती पडल्यावर त्या ज्वाळा यज्ञवेदीच्या वर आलेल्या सर्वांना दिसतील, अशी योजना असावी. यज्ञवेदीच्या भोवती प्रसादाच्या ताटल्या ठेवलेल्या असाव्यात. जेवढे व्रताथ असतील तेवढी व्रतचिह्ने यज्ञवेदीपाशीच सर्वांना दिसतील अशी ठेवलेली असावीत. ती एकेक उचलून देता येण्याची सोय असावी. अध्वर्यूच्या उजव्या हाताशी, त्यांना सापडेल अशी काडेपेटी ठेवलेली असावी.
अध्वर्यूच्या समोर यज्ञवेदी आणि यज्ञवेदीच्या दुसऱ्या बाजूला आचार्य बसलेले असावेत. व्यासपीठापासून पुरेसे अंतर ठेवून विद्यार्थ्यांच्या बसण्याची सोय करावी. व्रताथ विद्याथ पूर्वेकडे तोंड करून एका चौकोनात बसवावेत. त्यांच्यामागे त्यांचे पालक-नातेवाईक बसलेले असावेत. व्रताथच्या दोन्ही बाजूंना इतर विद्याथ व पालक बसलेले असावेत.
व्यासपीठापासून काही अंतरावर संस्थेचे अन्य अधिकारी, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष अशा चार-पाच जणांची बसण्याची सोय असावी. व्यासपीठावर केवळ अध्वर्यू, त्यांचे सहकारी आणि आचार्य एवढेच बसलेले असावेत. अध्वर्यूंच्या जवळ त्यांची पोथी शक्यतो पुरेशा उंचीच्या चौरंगावर ठेवलेली असावी. त्यांच्यामागे तंबोरा, तबला, पेटी, टाळ घेऊन वादक बसलेले असावेत.
व्रताथनी घरून येण्यापूव स्नान करून, आई-वडिलांना वंदन करून यावे. सर्वच उपस्थितांनी स्नान करून येणे चांगले. उपासनास्थळी आल्यावर सर्वांच्या कपाळावर अष्टगंध लावले जावे. कार्यक्रमापूव अर्ध्या तासापासून सर्वत्र मौन राखावे. बैठकीची व्यवस्था तत्पूवच पूर्ण केलेली असावी. धूप, उदबत्त्या ठिकठिकाणी ठेवलेल्या असाव्यात; प्रत्येक गटनायकासमोर एकेक धूपदाणी असावी. प्रत्येक धूपदाणीत पुरेसे निखारे आणि धूप घातलेला असावा किंवा धूपकांडी लावलेली असावी. गटनायकांनी किंवा नियोजित व्यक्तीने धूपदाणी घेऊन योग्य वेळी धूप फिरवावा. जेथे उपस्थित बसणार असतील, तेथे एकेक पोथी आधीच मांडलेली असावी.
संकल्पाच्या मंत्रामध्ये रिकाम्या जागी गावाचे नाव, चालू संवत्सराचे नाव, मराठी महिन्याचे नाव, पक्षाचे नाव, तिथी, वार आणि नक्षत्र इतक्या गोष्टी अध्वर्यूने कार्यक्रमापूवच दैनंदिन वृत्तपत्र, कालनिर्णयसारखी कालिका किंवा पंचांग पाहून पेन्सिलने उतरवून ठेवलेल्या असाव्यात. म्हणजे ऐनवेळी अडचण येत नाही. पोथीत काही जागी कंसात काही शब्द दिले आहेत. वाक्य एकवचनी करणे, पुल्लिंगाचे स्त्रीलिंग करणे इत्यादी साठी आवश्यक तेव्हा अध्वर्यूने योग्य ते बदल करवून घ्यावेत.
सर्व कार्यक्रम सुव्यवस्थित पार पडावा म्हणून सर्व प्रमुखांची घड्याळे बरोबर लावलेली असावीत. कार्यक्रमापूव पंधरा मिनिटे व्रताथना उपासना मंदिरात ओळींमध्ये बसवून घ्यावे. त्यानंतर इतर विद्यार्थ्यांना बसवून घ्यावे. त्यानंतर पाच मिनिटांनी पालक व निमंत्रित यांना बसवून घ्यावे. कार्यक्रमापूव पाच मिनिटे सर्वांनी शांतपणे स्थानापन्न झालेले असावे. तीन मिनिटांपूव प्रमुख पाहुण्यांनी स्थानापन्न व्हावे. दोन मिनिटांपूव तंबोऱ्यास प्रारंभ करून ठीक वेळेवर हरि: ओम् च्या उच्चाराने विद्याव्रत संस्काराच्या विधीला प्रारंभ व्हावा.
सूचना
- पुरेसा सराव करून श्लोकांचे गायन व त्यांच्या अर्थाचे वाचन शक्यतो एकाच अध्वर्यूने करावे.
- शाळांमध्ये विद्याव्रत संस्कार होताना, विद्यार्थ्यांचे वर्गाध्यापक, शाळेतील ज्येष्ठ अध्यापक, मुख्याध्यापक किंवा संस्थाचालक यांच्यापैकी ज्यांचा विद्यार्थ्यांशी नियमित संपर्कयेतो, त्यांनीच शक्यतो आचार्य म्हणून बसावे.
- अध्वर्यू व आचार्य यांनी विद्यार्थ्यांच्या समोर व होमकुंडाच्या दोन्ही बाजूंना बसावे.
- व्रतार्थीना आशीर्वाद द्यायला आलेल्या पाहुण्यांची बसायची व्यवस्था व्रतार्थी च्या उजव्या बाजूला केलेली असावी.
विद्याव्रत उपासना
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
हरिः ॐ | ॐ | ॐ |
अध्वर्यू : आज विद्याव्रत समारंभ आहे. पूव यालाच व्रतबंध किंवा उपनयन समारंभ म्हणायचे. आज येथे विद्याव्रत घेणारे व्रताथ जमले आहेत. त्यांना शुभेच्छा व आशीर्वाद द्यायला इतर ज्येष्ठ जमलेले आहेत. आपण सर्वांनी मिळून उपासनेची सुरुवात गणपतीची प्रार्थना करून करूया.
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
अध्वर्यू : विद्याव्रत संस्कार हा भारतीय संस्कृतीतला खूप पूवपासून चालत आलेला संस्कार आहे. आज स्वतंत्र भारतामध्ये तो सर्व जाती-धर्मांच्या मुला-मुलींसाठी आपण करत असतो. असे अनेक उत्तमोत्तम संस्कार व संस्कृती ज्या भारतभूमीत जन्माला आली, त्या आपल्या भारतमातेला गणपतीच्या पाठोपाठ वंदन करूया.
१ संकल्प
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीम् |
ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम् ॥
अध्वर्यू : संपत्तीने समृद्ध असा सागर जिचे पाय धूत आहे, हिमालय हा जिचा मुकुट आहे, अनेक ब्रह्मष आणि राजष यांच्या पुण्यकार्याने समृद्ध झालेल्या या भारतमातेला प्रणाम असो.
अध्वर्यू : विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यात स्वावलंबी व्हावे यासाठी विद्याव्रत घ्यायचे असते. आपल्या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकसन कसे व्हावे याबद्दल उपस्थित पालक, अध्यापक आणि अन्य ज्येष्ठ सदस्य यांनी माझ्या पाठोपाठ पुढील श्लोकाची अध-अध ओळ म्हणावी आणि आपल्या अपेक्षा व्यक्त कराव्यात.
अध्वर्यू आणि पाठोपाठ ज्येष्ठ सदस्य :
आनंदी, आत्मविश्वासू, सदाचारी, पराक्रमी |
अखंड ज्ञानजिज्ञासू, मिताहारी, शतायुषी॥
अध्वर्यू : भारतीय परंपरेमध्ये कोणताही चांगला संकल्प करताना तो संकल्प कुठे करत आहोत त्या गावाचा, आणि कधी करत आहोत त्या वेळेचा उच्चार करणे, आवश्यक मानले आहे. त्याप्रमाणे आजच्या स्थलकालाचा उच्चार करून मग पालकांनी संकल्प करायचा आहे. असा उच्चार केल्यामुळे तो संकल्प लक्षात राहायला उपयोग होतो.
अध्वर्यू आणि पाठोपाठ पालक :
इह पृथिव्यां – जम्बुद्वीपे – भरतवर्षे – ……..नगरे / ग्रामे – …….नाम संवत्सरे …….मासे – …….पक्षे – ……..तिथौ – …….वासरे – ….. नक्षत्रे अस्माकं छात्राणां व्यक्तित्वविकासार्थं विद्याव्रतसंस्कारं करिष्यामहे |
अध्वर्यू : या पृथ्वीवरील, आशिया खंडातील, भरतवर्षामधील, …….या गावात, …….नावाच्या या वष, …….महिन्यात, …….पक्षात, …….तिथीला, …….वारी, …….नक्षत्रावर, आमच्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिविकास व्हावा, म्हणून विद्याव्रत संस्कार करणार आहोत.
अध्वर्यू : आता स्वतःचे मन निर्मळ करण्यासाठी पुढील मंत्र म्हणूया. तो मंत्र म्हणत असताना आजच्या समारंभाची जागा निर्मळ करण्यासाठी, गटनायक धूप फिरवतील आणि नंतर सर्व व्रताथ आपल्या जवळील भांड्यातील पाणी फुलांच्या साहाय्याने सर्व दिशांना शिंपडून वातावरण प्रसन्न करतील.
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा |
य: स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तर: शुचि: ॥
अध्वर्यू : आपण आधी गणपतीचे व मातृभूमीचे स्मरण केले आहे. मनात असलेले बरे-वाईट सर्व विचार त्यांच्या स्मरणामुळे नाहीसे होतात व मग आपले मन शुभसंकल्प करण्यासाठी सज्ज होते.
अध्वर्यू : भाषणे ऐकून, वाचन करून आणि काही अनुभव घेऊन सर्व व्रताथ स्वतःची पूर्वतयारी करून आजच्या विद्याव्रत संस्कारासाठी आलेले आहेत. त्या सर्व पूर्वतयारीचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी आता काही श्लोक म्हणायचे आहेत. व्रताथनी हे श्लोक व त्यांचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा प्रकटपणे सर्वांसमोर एकत्र सांगावी.
२ विद्याव्रत स्वीकारणे म्हणजे काय?
सर्व व्रताथ एकत्र :
अथातो विद्याव्रतजिज्ञासा |
अहो, आचार्य, हे विद्याव्रत स्वीकारणे म्हणजे काय? आपण कृपापूर्वक, ते समजावून सांगावे.
अध्वर्यू : आयुष्याची पहिली काही वर्षे सर्वच मुले-मुली, आपले आई-वडील, आपली भावंडे, आपले आजी-आजोबा, आपले नातेवाईक व आपले शिक्षक यांंच्या मदतीने मोठे होत असतात. वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षानंतर स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः स्वीकारण्याचा संकल्प विद्याव्रत घेऊन करायचा असतो. विद्याव्रत घेतल्यानंतर स्वतःच्या जबाबदारीने जगण्याचा टप्पा सुरू होतो. त्याला ब्रह्मचर्याश्रम असे म्हणतात.
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
व्रतेन दीक्षामाप्नोति दीक्षया आप्नोति दक्षिणाम् |
दक्षिणा श्रद्धामाप्नोति श्रद्धया सत्यमाप्यते ॥
(यजुर्वेदसंहिता, अध्याय 19, मंत्र 30)
अध्वर्यू : सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी श्रद्धा लागते. श्रद्धा म्हणजे शेवटी चांगले तेच घडेल आणि मी ते घडवू शकेन असा आशावाद. चांगल्या कामाचा चांगला परिणाम होतो, असे काही अनुभव स्वतः घेतले की, माणूस सर्व परिस्थितीत आशावादी राहू शकतो. असे अनुभव घेणे यालाच या श्लोकामध्ये दक्षिणा असे म्हणले आहे. चांगले काम म्हणजे अचूक काम. कोणतेही काम अचूक होण्यासाठी त्याचा हेतू ठरवण्याची, कामाची पद्धत निवडण्याची आणि काम कौशल्याने करण्याची योग्यता आपल्यामध्ये येणे म्हणजे दीक्षा मिळणे. अशी योग्यता आपल्यामध्ये येण्यासाठी आपण रोज निश्चित पद्धतीने वागण्याचे नियम ठरवावे लागतात. असे नियम स्वतःहून ठरवणे व स्वतःच ते पाळणे म्हणजे आपण घेतलेले व्रत आपण चिकाटीने पाळत राहिलो तर दीक्षा, दक्षिणा, श्रद्धा आणि सत्य किंवा अखंड आनंद या गोष्टी आपल्याला क्रमशः मिळू शकतात असे या श्लोकात सांगितले आहे. आपण ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश का करायचा आणि त्यासाठी व्रत का घ्यायचे हे पाहिले. आता ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश करण्याच्या व्रताला विद्याव्रत का म्हणतात, ते बघूयात.
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
सत्यमेव जयते, नानृतं, सत्येन पन्था विततो देवयानः ।
(मु. ३, खं. १, मं. ६)
अध्वर्यू : जगामध्ये अखेर खऱ्याचाच विजय होतो; खोट्याचा नव्हे! उत्तम लोकांनी खरेपणाने म्हणजे सत्याने वागूनच ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग पुढच्या अनेक लोकांसाठी रुंद व सोपा केला आहे.
अध्वर्यू : ज्ञान मिळवल्यामुळे आपल्या सर्व योग्य इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आपल्यामध्ये येते आणि सत्य काय आहे तेही समजते. आपल्याला आपल्या नुसत्या डोळ्यांनी सतत बदलणारे विश्व दिसत असते. ते जणू कधीही न बदलणाऱ्या सत्याला झाकणारे झाकण आहे. ज्ञानानेच हे झाकण दूर होते. ते दूर व्हावे व आपल्याला सत्य कळावे या संबंधीची एक प्रार्थना आता म्हणूया.
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् । तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्ट्ये ।।
(ईशावास्य उपनिषद, १५)
अध्वर्यू : सत्याचा चेहरा जणू काही सोन्याच्या झाकणाने झाकलेला आहे. आम्ही सत्य जाणून घेऊ इच्छितो. हे परमेश्वरा, आम्हाला ते सत्य दिसावे म्हणून, ते झाकण तू दूर कर, म्हणजेच आम्हाला आवश्यक ते सर्व ज्ञान दे.
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रम् इह विद्यते । तत् स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ।।
(गीता, अध्याय ४ श्लोक ३८)
अध्वर्यू : या जगात ज्ञानाएवढे पवित्र दुसरे काही नाही. ज्याने योगाची माहिती करून घेऊन मन ध्येयावर एकाग्र केलेले आहे, त्याला यथावकाश अत्यंत श्रेष्ठ असे आत्म्याचे ज्ञानही मिळविता येते.
सर्व व्रतार्थी एकत्र :
अथातो ब्रह्मचर्याश्रमयमनियमजिज्ञासा ।
आता आम्हाला ब्रह्मचर्याश्रमाचे यमनियम समजावून सांगा आणि
नंतर आम्हाला विद्याव्रताची दीक्षा द्या. अहो आचार्य, आम्ही सर्व उभे राहून, नमस्कार करून आपणांस विनंती करतो. आम्हांस आशीर्वाद देण्यासाठी जी वडील मंडळी आली आहेत, त्यांनीसुद्धा आमच्या बरोबर उभे राहून आम्हांस आचार्यांकडे सोपवावे. (सर्वजण उभे राहतात आणि केवळ व्रतार्थी हात जोडून म्हणतात.)
सर्व व्रतार्थी एकत्र :
अनुग्राह्याः वयम् ।
कृपया आपण आमच्या या विनंतीचा स्वीकार करावा.
अध्वर्यू : सर्व पालकांनी माझ्या पाठोपाठ म्हणावे
अध्वर्यू आणि पाठोपाठ पालक :
भवद्भिः अस्मत् अपत्यानि अनुग्राह्याणि ।
अहो आचार्य, आमच्या मुलांना विद्याव्रत घेण्यास योग्य समजा.
अध्वर्यू : तुमची विनंती योग्यच आहे. आता अध्वर्यू या विद्यार्थ्यांना ब्रह्मचर्याश्रमाचे यमनियम समजावून सांगतील आणि मग मी आनंदाने विद्याव्रताचे व्रतचिह्न देईन.
अध्वर्यू : आता व्रतार्थी, पालक व अन्य वडील मंडळींनी पुन्हा खाली बसावे.
३. ब्रह्मचर्याश्रमाचे यमनियम
अध्वर्यू : अनंत असे ज्ञान मिळवून सत्य समजून घेणे म्हणजे ब्रह्मचर्याश्रम. हे समजून घेण्यासाठी स्वतःच्या शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धीच्या शक्तींना वळण लावावे लागते. त्यासाठी आपण स्वतःच्या वागण्यासाठी जे नियम स्वतः साठी घालून घ्यायचे. त्यांनाच ब्रह्मचर्याश्रमाचे यमनियम किंवा ब्रह्मचर्याश्रमातील व्रते असे म्हणतात.
१. युक्ताहारविहार
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ।।
(गीता, अध्याय ६ श्लोक १७)
अध्वर्यू : ज्याचे खाणे-पिणे आवश्यक तेवढे आहे, ज्याचे खेळणे, फिरणे इत्यादी गोष्टी नियमित आहेत आणि ज्याची झोप व जागेपणीचा काळ सुयोग्य आहे, अशा व्यक्तीला दुःखापासून दूर राहणे शक्य होते.
अध्वर्यू आणि उपस्थित एकत्र :
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु । युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ।।
(गीता, अध्याय ६ श्लोक १७)
२. इंद्रियसंयमन
अध्वर्यू : आपल्या डोळ्यांचे लक्ष छान छान दृश्ये बघण्याकडे, कानांचे लक्ष सुरेल संगीत ऐकण्याकडे. तर जिभेचे लक्ष गोडधोड पदार्थांनी तृप्त होण्याकडे लागलेले असेल, तर आपले मन अभ्यासावर एकाग्र होणे हे कठीण आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी आपली इंद्रिये ताब्यात ठेवण्याचे महत्त्व सांगितले आहे.
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
तस्मात् त्वम् इन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ । पाप्मानं प्रजहि होनं ज्ञानविज्ञाननाशनम् ।।
(गीता, अध्याय ३ श्लोक ४१)
अध्वर्यू : तेव्हा आपली इंद्रिये आरून, ज्ञानाचा विसर पाडणाऱ्या रागलोभादी गोष्टींवर आपण विजय मिळवला पाहिजे.
अध्वर्यू आणि उपस्थित एकत्र :
तस्मात् त्वम् इन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ । पाप्मानं प्रजहि होनं ज्ञानविज्ञाननाशनम् ।।
(गीता, अध्याय ३ श्लोक ४१)
अध्वर्यू : इंद्रियांवर विजय मिळवायचा म्हणजे इंद्रियांना अयोग्य गोष्टी पाहू किंवा एकू द्यायच्या नाहीत. आणि योग्य गोष्टीच पाहण्याची किंवा ऐकण्याची त्यांना सवय लावायची.
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
भद्रं कर्णेभिः श्रुणुयाम देवाः भद्रं पश्येम अक्षिभिर्यजत्राः । स्थिरैरंगैः तुष्टुवाँसस् तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः ।।
(प्रश्नोपनिषद शांतिमंत्र)
अध्वर्यू : आम्ही कानांनी शुभवचन ऐकावे, आम्ही डोळ्यांनी शुभ तेच पाहावे. आमचे हात, पाय आणि शरीर योग्य त्याच कामामध्ये स्थिर असावे. परमेश्वराने दिलेले संपूर्ण आयुष्य आम्हाला त्यामुळे प्राप्त व्हावे.
अध्वर्यू आणि उपस्थित एकत्र :
भद्रं कर्णेभिः श्रुणुयाम देवाः भद्रं पश्येम अक्षिभिर्यजत्राः । स्थिरैरंगैः तुष्टुवाँसस् तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः ।।
(प्रश्नोपनिषद शांतिमंत्र)
३. दैनंदिन उपासना
अध्वर्यू : आवश्यक ते आणि तेवढेच खाणे-पिणे, ज्ञानेन्द्रियांवर नियंत्रण, हे साधून रोजच्या रोज देवाचे स्मरण आपण न चुकता केले पाहिजे. त्यालाच संध्या किंवा उपासना म्हणतात. लवकर उठून शरीरशुद्धी करून स्वच्छ जागी, निर्मळ आसनावर, ताठ बसून उपासना करावी. ती कशी ?
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः । उपविश्यासने युञ्जात् योगम् आत्मविशुद्धये ।।
(गीता, अध्याय ६ श्लोक १२)
अध्वर्यू : आसनावर निश्चल बसावे. शरीराची हालचाल पूर्णपणे थांबवावी. मनाची धावपळही कमी करण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे ताठ बसून मन अंतर्मुख करावे.
अध्वर्यू आणि उपस्थित एकत्र :
तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः । उपविश्यासने युञ्जात् योगम् आत्मविशुद्धये ।।
(गीता, अध्याय ६ श्लोक १२)
अध्वर्यू : अंतर्मुख व्हायचे म्हणजे नेमके काय करायचे? तर स्वतःच्या हितासाठी स्वतः स्वतःशीच बोलायचे. शरीराची हालचाल थांबविणे, निश्चल बसणे या गोष्टी आपल्या मनातील विचार कमी करण्यास मदत करतात. मनातील सर्व विचार कमी कमी करत शेवटी स्वतःच्या हिताचा विचार करावा. यानंतर स्वतःशी बोलावे. मला काय व्हायला आवडेल? माझे वागणे काल कसे झाले? मी आणखी काय करायला हवे ? आज मी काय करणार आहे? असा आढावा घ्यावा आणि या संवादयुक्त ध्यानानंतर गायत्री मंत्र म्हणताना मनाला व्यापक करीत जावे व शेवटी आपली बुद्धी प्रखर व्हावी, अशी प्रार्थना करावी.
४. स्वाध्याय प्रवचन
अध्वर्यू : युक्ताहारविहार, इंद्रियसंयमन, ईश्वरोपासना या ब्रह्मचर्याश्रमातील नियमांचे आचरण करीत आणखी काय करायचे? तर शिकणे आणि शिकविणे यांमधून ज्ञान वाढवीत जायचे. वेळ वाया जाऊ न देता, सतत हे ज्ञान वाढवीत गेले पाहिजे.
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
जिज्ञासा गुरुनिष्ठा च सतताभ्यासनिश्चयः । एकाग्रता महत्त्वेच्छा एतद् विद्यार्थिलक्षणम् ।।
अध्वर्यू : जाणून घेण्याची इच्छा, गुरूंवरती निष्ठा, शिकलेल्याची सतत उजळणी करण्याचा निश्चय, अध्ययनाच्या वेळी एकाग्रता आणि ज्ञान मिळवून मोठे होण्याची इच्छा ही उत्तम विद्यार्थ्यांची लक्षणे आहेत. ही लक्षणे आपल्यामध्ये अधिकाधिक प्रकट व्हावीत यासाठी स्वाध्याय प्रवचनाचे व्रत घ्यायचे आहे.
अध्वर्यू आणि उपस्थित एकत्र :
जिज्ञासा गुरुनिष्ठा च सतताभ्यासनिश्चयः । एकाग्रता महत्त्वेच्छा एतद् विद्यार्थिलक्षणम् ।।
अध्वर्यू : स्वाध्याय प्रवचन केल्यानेच बुद्धी कार्यक्षम होते. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, अचूक आकलनशक्ती, जागृत स्मरणशक्ती, सर्व गोष्टींचे मर्म शोधणारी शक्ती, कोणताही प्रश्न सोडवू शकणारी शक्ती, काय करावे काय करू नये याचा तत्काळ निर्णय करणारी विवेकबुद्धी आणि सतत नवीन कल्पनांना जन्म देणारी सर्जनशीलता अशा अनेक दिशांनी बुद्धीच्या विविध शक्ती वाढविण्यासाठी स्वप्रयत्नांबरोबर गुरूंचे मार्गदर्शनही आवश्यक असते.
५. गुरूंविषयी आदर आणि प्रेम
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेश्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ।।
(गीता, अध्याय ४ श्लोक ३४)
अध्वर्यू : नवीन ज्ञान मिळवताना स्वयंअध्ययन म्हणजेच स्वाध्याय करावा लागतो. परंतु आपल्या पूर्वीच्या लोकांनी मिळवलेले ज्ञान आपल्या गुरूंकडून मिळवणे सोयीचे जाते. आपल्या गुरूंच्याबद्दल आपण मनात आदराची भावना ठेवली, विषय समजून घेण्यासाठी त्यांना अनेक बाजूंनी प्रश्न विचारले आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने काम आणि प्रयोग केले तर ते आपल्याला भरभरून ज्ञान देतात, असा या श्लोकाचा अर्थ आहे.
अध्वर्यू आणि उपस्थित एकत्र :
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेश्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ।।
(गीता, अध्याय ४ श्लोक ३४)
अध्वर्यू : अशा गुरुंबद्दलची आदरबुद्धी त्यांना नित्य वंदन करून व्यक्त करायची असते. त्यासाठी विद्यार्थी आणि अन्य उपस्थित अशा सर्वांनी उभे राहून पुढील श्लोक म्हणूया.
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।
अध्वर्यू : आपले गुरुजन हे ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांच्या सारखेच आम्हांला पूजनीय आहेत. इतकेच काय गुरू हेच आपल्याला प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप आहेत. त्या गुरुवरांना वंदन असो.
अध्वर्यू आणि उपस्थित एकत्र :
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।
अध्वर्यू : आता सर्वांनी पुन्हा बसून घ्यावे.
६. व्यक्तिमत्त्व विकसन :
राष्ट्र अर्चना
अध्वर्यू : खाण्यापिण्यावर नियंत्रण, इंद्रियांवर संयम, रोजची उपासना, शिकणे आणि शिकविणे आणि गुरुजनांविषयी आदर हे सारे कशासाठी? तर शरीर, मन, बुद्धी इत्यादींची वाढ करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचे उत्तम विकसन व्हावे यासाठी! विद्याव्रताचा प्रमुख हेतू उत्तम व्यक्तिमत्त्व विकसन हाच होय. असे सुविकसित जीवन कुटुंबाच्या, समाजाच्या, देशाच्या आणि परमेश्वराच्या चरणी अर्पण करणे यामध्ये मानवी जीवनातील फार मोठे सुख सामावलेले आहे. पूर्ण विकसित, शुद्ध अशा जीवनपुष्पाने राष्ट्रअर्चना, देवअर्चना करणे हेच साध्य! अर्चनेने, त्यागानेच परमसुखाची प्राप्ती होते. म्हटलेच आहे
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
न त्वहं कामये राज्यं न स्वर्ग नापुनर्भवम् ।
कामये दुःखतप्तानां प्राणिनाम् आर्तिनाशनम् ।।
अध्वर्यू : मी राज्याची इच्छा करीत नाही. मला स्वर्ग नको, मला जन्म-मृत्यूपासून सुटकाही नको. जे दुःखाने गांजलेले आहेत, अशांच्या वेदना दूर व्हाव्यात, एवढीच माझी इच्छा आहे. विद्याव्रत स्वीकारणाऱ्या प्रत्येक व्रतार्थीचे उद्दिष्ट अशासारखेच असले पाहिजे.
अध्वर्यू आणि उपस्थित एकत्र :
न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम् । कामये दुःखतप्तानां प्राणिनाम् आर्तिनाशनम् ।।
अध्वर्यू : युक्ताहारविहार ते राष्ट्रअर्चना या सहा व्रतांमधून, केवळ आपल्या एकट्याच्या सुखाचा विचार न करता सर्वांच्या सुखाचा विचार करणे, हे आपल्या आयुष्याचे ध्येय म्हणून सांगितलेले आहे. एकट्याच्या सुखातून मिळणारा आनंद तात्पुरता असतो. संपूर्ण राष्ट्राच्या आणि मानवतेच्या सुखासाठी प्रयत्न करण्याचा आनंद जास्त टिकाऊ असतो. तात्पुरत्या आनंदाचा त्याग करून टिकाऊ आनंदासाठी प्रयत्न करणाऱ्याला योगी असे म्हणतात. ब्रह्मचर्याश्रमातले यमनियम पाळून आपल्याला योगी होण्याचा प्रयत्न करायचा आहे. शिक्षण घेणे हेच विद्यार्थ्यांसाठी योगाचे आचरण आहे. त्यासंबधीचा एक अभग आता म्हणूया.
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
नियम पाळावे जरि म्हणशिल योगी व्हावे। नियम पाळावे जरि म्हणशिल योगी व्हावे ।। ध्रु. ।।
रसनेचा जो अंकित झाला, समूळ निद्रेला जो विकला, तो नर योगाभ्यासा मुकला असे समजावे, जरि म्हणशिल योगी व्हावे ।।१।।
रात्री निद्रा परिमित घ्यावी, भोजनातहि मिती असावी, शब्दवल्गना बहु न करावी साधक जीवे, जरि म्हणशिल योगी व्हावे ।।२।।
या परि सकलाहार-विहारी नियमित व्हावे मनि अवधारी निजरूपोन्मुख होउनि अंतरी चित्त मग धावे, जरि म्हणशील योगी व्हावे ।।३।।
अध्वर्यू : आपल्या ध्येयाचाच ध्यास घेतलेला योगी व्हायचे असेल तर त्यादिशेने जाण्याला मदत करणारीच कामे करायची आणि इतर कामे करायची नाहीत, असे ठरवावे लागते. आपणच केलेले नियम पाळून योगी होता येते. ध्येयापासून आपल्याला दूर नेणाऱ्या दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जिभेला सुख मिळावे म्हणून गोडधोड किंवा मसालेदार खाणे आणि मनात येईल ते बोलणे. दुसरी गोष्ट म्हणजे झोपेत, आळसात आणि चेंगटपणात वेळ घालवणे. या दोन गोष्टींमध्ये ज्याचा वेळ जातो तो कधीच योगी होऊ शकणार नाही. जो योगाच्या वाटेने जाऊ इच्छिणारा जीव म्हणजे मनुष्य आहे, त्याने आपल्या झोपेवर नियंत्रण ठेवले पाहिजे. खाण्यावर आणि बोलण्यावर जो नियंत्रण ठेवतो, या बाबतीत काही नियम ठरवून जो त्याप्रमाणे मनापासून वागतो, त्याचे लक्ष शिकणे आणि देशसेवा करणे या आपल्या ध्येयावर एकाग्र होते. त्याचे मन ध्येयाशी एकरूप होण्यासाठी उत्साह निर्माण करते आणि शिकणे व देशसेवा करणे या ध्येयांचेही ध्येय म्हणजे स्वतः चिदानंदरूपी शिव किंवा ज्योतिरूप आहोत हे ओळखणे, हे देखील त्याला आवाक्यातले वाटते. आतापर्यंत विविध श्लोकांमधून केलेले व्रतांचे संकल्प आता गद्यामध्ये पुन्हा एकदा उच्चारूया.
४. गद्य सकल्प
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
राष्ट्रार्थ भव्य कृति काहि पराक्रमाची ईर्ष्या निजांतरि धरूनि करावयाची खरोखर राष्ट्रहितार्थ
जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी यासाठी हा संकल्प ! हे परमात्मन् !
तू याचा साक्षी हो.
आज आम्ही सर्व पवित्रभावे ब्रह्मचर्याश्रमाचा स्वीकार करीत आहोत.
हे परमात्मन !
आपणांस स्मरून आम्ही असा संकल्प करतो की, आम्ही युक्ताहारविहार या व्रताचे परिपूर्ण पालन करू.
ज्ञानेन्द्रिये, कर्मेन्द्रिये संयत ठेवू, तुझ्या शोधात त्यांना गुंतवू.
उपासना, स्वाध्यायप्रवचन आणि गुरूंविषयी आदर व प्रेम यांचा आम्ही सदैव अवलंब करू.
शरीर सुंदर सतेज करू.
या व्रतापासून आम्ही कधीही ढळणार नाही.
आयुष्याच्या किमान पंचवीस वर्षांपर्यंत आम्ही विद्याभ्यास करू.
नंतर इतर आश्रमांत यथावकाश प्रवेश करू.
भगवान रामचंद्र गुरुगृही राहिले होते, भगवान श्रीकृष्ण गुरुगृही राहिले होते, आम्हीसुद्धा गुरूंच्या सान्निध्यात राहू. ग्रंथ हे सुद्धा गुरू होत. सर्व सृष्टी ही सुद्धा गुरु होय.
ह्या गुरूंना प्रसन्न ठेऊन आम्ही उत्तमोत्तम विद्या संपादन करू.
आमची विद्या
ही आमच्या कुटुंबाच्या, समाजाच्या, देशाच्या आणि मानवतेच्या कल्याणासाठी असेल.
हे परमेश्वरा, हे सर्व घडू दे.
तुझे मंगल आशीर्वाद आम्हांस नित्य लाभू देत. ब्रह्मचर्याश्रमातला आमचा क्षणन् क्षण हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वापरला जाऊ दे.
(गद्य प्रार्थना झाल्याबरोवर अध्वर्यूने यज्ञानी पेटवावा. यज्ञाग्नीसाठी तेलात भिजवलेली गोवरी ठेवलेली असावी. तीवर चटकन पेट घेणाऱ्या समिधा व कापूरवड्या टाकाव्यात व काडेपेटीने ती गोवरी किंवा समिधा अध्वर्यूनी पेटवावी. नंतर यज्ञानीला मंत्रपूर्वक तुपाच्या आहुती द्याव्यात.)
५. यज्ञाग्नीच्या साक्षीने
अध्वर्यू आणि पाठोपाठ व्रतार्थी :
आज राष्ट्रीय शके…… मधील सौर महिन्याच्या
दिनांकाला आम्ही आमच्या व्यक्तित्व विकासासाठी विद्याव्रत ग्रहण केल्याचे चिह्न स्वीकारू इच्छितो. हे व्रतचिह्न आम्ही जास्तीत जास्त काळ सांभाळू, त्याची काळजी घेऊ, आणि सर्व व्रतांचे सर्व शक्तीनिशी पालन करू.
अध्वर्यू : आज आपण ब्रह्मचर्याचा संकल्प तर केला. हा संकल्प सिद्धीस जावा यासाठी परमेश्वराचे प्रतीक असलेल्या यज्ञाग्नीला आहुती देऊन आपण त्याचे आशीर्वाद घेऊया. व्रतार्थीच्या वतीने मी प्रत्यक्ष आहुती देईन. व्रतार्थीनी त्यावेळी जागेवरच उभे राहून अक्षतारूपी आहुती अग्नीला अर्पण करावी.
अध्वर्यू : तूप आणि अक्षता या साधनसंपत्तीचे प्रतीक आहेत. आपल्या जवळचे उत्तमातले उत्तम परमेश्वराला अर्पण करायचे अशी कल्पना या आहुती देण्यामध्ये आहे. तसेच आमची गुणसंपदा, विद्या आणि यश हे ही समाजरूप परमेश्वराने आपल्याला दिले आहे. त्याचा गर्व आपल्याला नसावा, असाही यातील भाव आहे.
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
ॐ अग्नये स्वाहा । अग्नय इदं, न मम ।
ॐ वायवे स्वाहा । वायव इदं, न मम ।
ॐ सूर्याय स्वाहा । सूर्याय इदं, न मम ।
ॐ प्रजापतये स्वाहा । प्रजापतय इदं, न मम ।
(अग्नये स्वाहा म्हटल्याबरोबर अध्वर्यू किंवा आचार्यांनी एक चमचा तुपाची आहुती द्यावी. पाचपेक्षा कमी व्रतार्थी असताना त्यांनीही आहुती द्याव्यात. याचप्रमाणे नंतरसुद्धा आहुती द्याव्यात.)
अध्वर्यू : हे आता अग्नीला समर्पित करतो. ते आता अग्नीचे आहे, माझे नाही. हे आता वायूला समर्पित करतो. ते आता वायूचे आहे, माझे नाही. हे सूर्याला समर्पित करतो. ते आता सूर्याचे आहे, माझे नाही. हे प्रजापतीला, परब्रह्माला समर्पित करतो. ति आता प्रजापतीचे आहे, माझे नाही.
अध्वर्यू : तूप आणि अक्षतांच्या आहुती देताना त्याबरोबर आपले संकल्पही आपण परमेश्वराला वाहिले. आता ते त्याचे झालेले संकल्प त्याने आमच्याकडून पूर्ण करून घ्यावेत. आमची शक्ती व प्रयत्न जिथे कमी पडतील, तिथे परमेश्वराने आम्हाला संकल्प पूर्ण करण्यासाठी शक्ती द्यावी, असा ‘इदं न मम’ म्हणण्यामागचा अर्थ आहे.
अध्वर्यू आणि उपस्थित एकत्र :
ॐ अग्नये स्वाहा । अग्नय इदं न मम ।
ॐ वायवे स्वाहा । वायव इदं, न मम ।
ॐ सूर्याय स्वाहा । सूर्याय इदं, न मम ।
ॐ प्रजापतये स्वाहा । प्रजापतय इदं न मम ।
६. व्रतचिह्न धारण
अध्वर्यू : या आहुतीच्या रूपाने आपण परब्रह्मशक्तीची प्रतीके म्हणून अग्नी, वायू, सूर्य आणि प्रजापतीला संकल्पाचे निवेदन केले आहे. आता यज्ञाग्नीच्या साक्षीने व्रतार्थी व्रतचिह्न घेतील. तत्पूर्वी पालकांनी उभे राहावे आणि आचार्यांना वंदन करून माझ्या पाठोपाठ म्हणावे
अध्वर्यू आणि पाठोपाठ पालक :
“अहो आचार्य, इमे व्रतार्थिनः यज्ञोपवीतेन अनुग्राह्याः भवता”।
“अहो आचार्य, विद्याव्रत घेऊ इच्छिणाऱ्या या मुलांना, कृपापूर्वक व्रतचिह्न द्या.”
अध्वर्यू : आता व्रतार्थीनी शक्य असल्यास आपल्या पालकांसह क्रमाक्रमाने समोर यावे. प्रथम पालकांनी यज्ञाग्नीसमोर तिथे ठेवलेली फुले वाहावीत. नंतर व्रतार्थीने आचार्यांकडून व्रतचिह्न घेऊन त्यांना नमस्कार करावा. त्यावेळी पालकांनी व्रतार्थीच्या मागे उभे राहावे. व्रतचिह्न घेतल्यावर पालकांनी आपल्या जागेवर जाऊन बसावे. व्रतार्थीनी आपल्या जागेवर जाऊन पुढील सूचना मिळेपर्यंत उभे राहावे.
(सर्व व्रतार्थी व्रतचिह्न घेऊन जागेवर बसेपर्यंत अध्वर्यूनी ‘युक्ताहारविहारस्य’ पासून ‘न त्वहं कामये राज्यं पर्यंतचे यमनियमांचे श्लोक एकेकदा सांगावेत आणि सर्वांनी पाठोपाठ म्हणत राहावे. विद्यार्थ्यांची संख्या जास्ती असल्यास तिच श्लोक अधिक वेळ म्हणावेत.)
अध्वर्यू : आज हे व्रत घेतले आहे, त्याचे प्रतीक म्हणून हे व्रतचिह्न अथवा यज्ञोपवीत परिधान करण्यापूर्वी प्रथम भांड्यातील पाण्याने भिजवा. नंतर आपल्याला दिलेले हे व्रतचिह्न दोन्ही हातांच्या अंगठ्याने आपल्यासमोर धरा. आता माझ्या पाठोपाठ म्हणा-
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
श्रद्धां मेधां यशः प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलम् । आयुष्यं तेज आरोग्यं देहि मे हव्यवाहन ।।
अध्वर्यू : हव्यवाहन म्हणजे अग्नी हे परमेश्वराचे प्रतीक आहे. त्याच्याकडून
आपण अकरा गुण मिळावेत अशी प्रार्थना केली आहे. श्रद्धेमुळेच सत्य कळते. हे आपण सुरुवातीलाच पाहिले आहे. मेधा म्हणजे ज्ञान साठवून ठेवणारी स्मरणशक्ती, प्रज्ञा म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन ती समजून घेण्याची शक्ती. बुद्धी म्हणजे चूक बरोबर यातली निवड करून निर्णय घेण्याची शक्ती. श्री म्हणजे नीतीने वागून मिळवलेली श्रीमंती. तेज म्हणजे दुर्जनांमध्ये धाक निर्माण करणारी आणि सज्जनांना मार्गदर्शन करणारी शक्ती. या सगळ्यांबरोबर यश, विद्या, बल, दीर्घायुष्य आणि आरोग्य ज्याला मिळते, त्याचे व्यक्तिमत्त्व खऱ्या अथनि विकसित झाले असे आपण म्हणतो. आता ही प्रार्थना पुन्हा एकदा म्हणूया.
अध्वर्यू आणि उपस्थित एकत्र :
श्रद्धां मेधां यशः प्रज्ञां विद्यां बुद्धि श्रियं बलम् । आयुष्यं तेज आरोग्यं देहि मे हव्यवाहन ।।
अध्वर्यू : हे विद्याव्रत घेतल्याचे प्रतीक म्हणून आता हे व्रतचिह्न योग्य पद्धतीने घाला. प्रतिदिनी हे व्रतचिह्न स्वच्छ ठेवा. आपल्या व्रताचे स्मरण त्यामुळे नित्य होऊ दे. हे व्रतचिह्न अधिकाधिक काळ सांभाळा. नित्य उपासनेत है। विद्याव्रत अंगी पुरे मुरू दे. बाह्य चिह्न नसले तरी अंतर्यामी धारण केलेले व्रत कधीच सुटणार नाही, असे होऊ दे. आता व्रतार्थीनी खाली बसावे.
७. गायत्री मंत्र संथा
अध्वर्यू : सहा व्रते समजून घेऊन, त्यांचे पालन करण्याचे तुम्ही ठरविले आहे. आता
दैनंदिन उपासनेमध्ये ज्या मंत्राचा जप करावयाचा असतो त्या गायत्री मंत्राची संथा मी तुम्हाला देईन. तुमच्या जवळच्या अक्षता आणि फुले मंत्र म्हणताना तुमच्या समोर असावीत. उपासना संपल्यावर, आपण म्हटलेल्या मंत्रांचे प्रतीक म्हणून अक्षता आणि फुले यज्ञाग्नीसमोर अर्पण करावीत. सर्व मंत्रांत श्रेष्ठ असा आपला गायत्री मंत्र आहे. उपासनेची आपणां हिंदूंची परंपरा ऋग्वेदापासून चालत आलेली आहे. कोणाची उपासना आपण करतो? भूलोक, भुवर्लोक अशा सप्तलोकांचे, म्हणजेच निराळ्या शब्दांत पृथ्वी, ग्रहमाला आणि आपल्या ग्रहमालेचा सूर्य या लोकांचे; असे कोट्यवधी सूर्य, अशा कोट्यवधी सूर्यांना सामावणारी आपली आकाशगंगा, अशा अनंत आकाशगंगा, त्यांच्या केंद्रस्थानी असणारा, अनंत कोटी ब्रह्मांडांना प्रकाश देणारा तो सविता, या सर्वांचे आपण स्मरण करीत असतो. सर्वांना स्फुरण देणारा तोच तो सविता आहे. तो आपणां सर्वांना, आपल्या देशाला स्फुरण देवो, अशी प्रार्थना आपण करूया. (यानंतर अध्वर्यूच्या पाठोपाठ तीन वेळा ॐ चा उच्चार करून सर्वजण आत्मगत चिंतन करतात. हे चिंतन सुमारे दोन मिनिटे झाल्यावर गायत्री मंत्राचे उच्चारण होते.)
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
ॐ ॐ ॐ
(दोन मिनिटे चिंतन. या वेळी वाद्ये बंद करून पूर्ण शांतता राखावी.)
ॐ ॐ ॐ
(अध्वर्यू क्षणभर थांबतात.)
ॐ भूः हे पृथ्वी
ॐ भुवः हे अन्तरिक्ष
ॐ स्वः हे सूर्य
ॐ महः हे कोटिसूर्य
ॐ जनः हे आकाशगंगा
ॐ तपः अनंत आकाशगंगा
ॐ सत्यम: हे परब्रह्म
ॐ तत्सवितुर् वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि ।
धियो यो नः प्रचोदयात् ।।
(ऋग्वेद, ३.६२.१०)
या परब्रह्माच्या, देवाच्या, श्रेष्ठ तेजाचे ध्यान करितो.
अमुच्या बुद्धीला तो प्रचोदना देवो.
(क्षणभर अध्वर्यू थांबतात.)
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपस्थित :
ॐ तत् सत् ।
ॐ तत् सत् ।
ॐ तत् सत् ।
नमस्ते : एक, दोन, तीन
(सर्वजण हात जोडून नमस्कार करतात. व्रतार्थी ओळीने पुढे येऊन यज्ञवेदीसमोर अक्षता व फुले अर्पण करतात.)
।। उपासना समाप्ती ।।
(चाळीस विद्यार्थी व्रत घेणारे असतील तर येथपर्यंतच्या उपासनेला दीड तास लागतो. विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे हा वेळ कमी जास्त होऊ शकेल. सामूहिक उपनयन कार्यक्रमात हा विद्याव्रत विधी संपल्यावर सुमारे १० मिनिटे सर्वांना पाय मोकळे करण्यासाठी विश्रांती देण्यात येते, आणि त्यानंतर सभेच्या कार्यक्रमाला प्रारंभहोतो. सभेमध्ये ज्यांनी नुकतेच विद्याव्रत घेतलेले असते त्यांपैकी दोघे-तिघेजण आपले विचार प्रकट करतात. यानंतर पालकांपैकी कोणास बोलावयाचे असेल, तर त्यांना वेळ दिला जातो. आचार्य म्हणून जे बसलेले असतात ते आशीर्वाद देतात. भाषणाचा हा कार्यक्रम सुटसुटीत असतो. अर्ध्या तासात हा कार्यक्रम संपावा अशी अपेक्षा असते. भाषणानंतर प्रार्थना होते आणि कार्यक्रम संपतो. अखेर सर्वांना प्रसाद देण्यात येतो.)