विद्याव्रत उपासना
प्रस्तावना ज्ञान प्रबोधिनीमध्ये आधुनिक स्वरूपात इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी विद्याव्रत संस्कार सुरू झाला, त्याला आता पंचेचाळीस वर्षे होतील. पहिली वीस वर्षे हा विद्याव्रत संस्कार ज्ञान प्रबोधिनीच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच मुख्यतः होत असे. त्यानंतरची पंचवीस वर्षे मात्र महाराष्ट्रातील अनेक शाळांमधून आणि पालकांनी किंवा स्वयंसेवी वृत्तीच्या शिक्षकांनी तयार केलेल्या अनौपचारिक गटांमध्येही, हजारो विद्यार्थ्यांसाठी हा विद्याव्रत संस्कार झालेला आहे. […]