भवितव्य लेख

सोलापूर केंद्र

केंद्रस्तरावरील उद्दिष्टे १. मणिपूर येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी सहनिवास चालवणे.२. चैतन्य भुवन येथे विविध शैक्षणिक व क्षमता विकसनाच्या उपक्रमांचे प्रयोग व स्थिरीकरण करणे.३. शेळगी येथील प्रबोधिनीच्या जागेचा विकास करणे व तेथे विविध कार्यदिशांचे उपक्रम सुरू करणे.४. सामाजिक उद्योजकता – किमान 100 विडी कामगार महिलांना आरोग्यास हानिकारक नसलेला रोजगार उपलब्ध करून देणे.५. किशोरी विकास प्रकल्प – […]

सोलापूर केंद्र Read More »

निगडी केंद्र

केंद्रस्तरावरील उद्दिष्टे १. परिसरातील अन्य संस्था व व्यक्तींच्या साहचर्याने विद्यार्थ्यांसाठी अनुभव शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करून तो राबवणे.२. पिंपरी–चिंचवड शहरात पर्यावरणविषयक जागृती आणि प्रत्यक्ष उपक्रम राबविणे.३. प्रबोधिनीच्या साळुंब्रे व चिखली येथील केंद्रांवर औपचारिक शिक्षणात आवश्यक ते सहकार्य करणे.४. माध्यमिक आणि महाविद्यालयीन वयोगटाच्या उद्योजकता विकसनाची रचना निर्माण करणे.५. अंतर्गत गुणवत्ता – प्रशासन, व्यवस्थापन व जनसंपर्काच्या रचना स्थिर

निगडी केंद्र Read More »

पुणे केंद्र

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला १. नवीन जागेत अधिक सुसज्ज व सुनिर्मित वास्तू उभारून स्थलांतर करणे व भौतिक सुविधा व आस्थापना अधिक सुसज्ज व गुणवत्तापूर्ण करणे.२. सर्व प्रकारच्या वंचित गटांतील विद्यार्थ्यांचा समावेश होईल अशा रचना (कार्यपद्धती, अध्यापन पद्धती व आस्थापना) उभ्या करणे.३. विद्यार्थ्यांमध्ये अभिजात अभिरूची-अभिव्यक्तीचे संवर्धन करणे.४. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण व्यक्तिघडणीला पूरक असणारी अधिमित्र रचना बसवणे.५. व्यक्तिमत्त्व

पुणे केंद्र Read More »

उद्दिष्टप्रधान कार्यदिशा उद्दिष्टे

राष्ट्रीय एकात्मता कार्यदिशा (देशासमोर असलेल्या सामाजिक एकात्मतेपुढील आव्हाने समजून घेऊन त्यांवर संशोधन करण्यापासून (research in social studies), संवाद प्रस्थापित करू पाहणारा व त्यासाठी सामाजिक – सांस्कृतिक)देवाण-घेवाण (social and cultural exchanges) घडवणारा गट)१. समाजामधली राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव जागृत, दृढ आणि वृद्धिंगत करण्यासाठी सांस्कृतिक देवाण-घेवाणीच्या व एकात्मतेच्या सामूहिक प्रकटीकरणाच्या रचना बसवणे व रूढ करणे.२. राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम

उद्दिष्टप्रधान कार्यदिशा उद्दिष्टे Read More »

कार्यप्रधान कार्यदिशा उद्दिष्टे

औपचारिक माध्यमिक शिक्षण कार्यदिशा (प्रबोधिनीच्या पाच माध्यमिक शाळांमधून चाललेल्या औपचारिक माध्यमिक शिक्षणाच्या (Formal Secondary Education) कामासाठी धोरणनिश्चिती)१. ज्ञान प्रबोधिनीच्या औपचारिक शिक्षण रचनांमध्ये त्रिवेणी शिक्षणपद्धतीचे प्रयोग करणे आणि प्रबोधिनीची शिक्षणप्रणाली सिद्ध करणे.२. ज्ञान प्रबोधिनीच्या शाळा त्यांची उद्दिष्टे व बदलती परिस्थिती यानुसार गुणवत्तेने समृद्ध करणे.३. विद्यार्थ्यांमध्ये स्वयं अध्ययन कौशल्य व वृत्ती विकसित करण्यासाठी प्रशिक्षण व सरावाची स्थिर

कार्यप्रधान कार्यदिशा उद्दिष्टे Read More »

मध्यवर्ती उद्दिष्टे

विस्तार साध्यसूत्रात म्हटल्याप्रमाणे ज्ञान प्रबोधिनीच्या कामाचा देशात आणि राज्यातविस्तार हीच पुढील दहा वर्षांतील कामाची मुख्य दिशा राहणार आहे. हे साध्य करण्यासाठी पुढील उद्दिष्टे मांडली आहेत : १. महाराष्ट्राच्या सर्व प्रशासकीय विभागांतील प्रत्येकी तीन जिल्ह्यांमध्ये विस्तार केंद्रे सुरू करणे. यातील प्रत्येकी एका जिल्ह्यात मनुष्यघडणीचे केंद्र आस्थापनेसह स्थिर करणे.२. देशातील सहा राज्यांमध्ये स्थायी संपर्क केंद्र निर्माण होणे.

मध्यवर्ती उद्दिष्टे Read More »

साध्यसूत्र

ज्ञान प्रबोधिनीच्या तिसऱ्या भवितव्यलेखाचे साध्यसूत्र महाराष्ट्राच्या सहा प्रादेशिक विभागांमध्ये ज्ञान प्रबोधिनीची मनुष्यघडणीची केंद्रे आस्थापनेसह सुस्थिर करणे आणि भारताच्या सहा राज्यांमध्ये विस्तार केंद्रे स्थापन करणे. साध्यसूत्राचे स्पष्टीकरण १. हा विस्तार करताना समावेशकता (inclusion), नवोन्मेषता (innovation), सेतुबंधन (integration) आणि प्रभाव (impact) ही मार्गदर्शक तत्त्वे असतील. २. मनुष्यघडणीचे केंद्र क्षमता आणि कौशल्यविकसनाच्या बरोबरीने वृत्तिघडण आणि प्रेरणाजागरण करणारे व

साध्यसूत्र Read More »

कार्यदिशा परिचय

ज्ञान प्रबोधिनीने स्वतःसमोर राष्ट्रघडणीचे मोठे आणि व्यापक ध्येय ठेवले आहे. त्यामुळे राष्ट्रजीवनाच्या विविध अंगांनी इथे काम केले जाते, त्यांना कार्य दिशा असे म्हटले आहे. सध्या अशा एकूण अकरा दिशांनी काम चालू आहे. कार्यप्रधान कार्यदिशा देशाच्या विकासात थेट योगदान देतात तर उद्दिष्टप्रधान कार्यदिशा व्यक्ती आणि समाज घडवण्याचे काम करतात. प्रबोधिनीच्या वेगवेगळ्या केंद्रांवर आणि विभागांत एकाच कार्य

कार्यदिशा परिचय Read More »

ज्ञान प्रबोधिनी परिचय

ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. विनायक विश्वनाथ तथा आप्पाजी पेंडसे एक शिक्षणतज्ज्ञ, समाजसंघटक आणि कृतिशील विचारवंत होते. स्वामी विवेकानंद हे त्यांचे प्रेरणास्थान! ‘आपल्या देशाची अस्मिता व एकात्मता ज्यातून व्यक्त होते अशी सांस्कृतिक परंपरा तसेच दारिद्रय निर्मूलन,दुखः निवारण यासाठी करावयाचे प्रबोधन आणि संघटन’ यांची सांगड स्वामी विवेकानंदांनी घालण्याचा प्रयत्न केला. मनुष्यघडणीच्या शिक्षणाचा विचार त्यांनी मांडला. त्या विचारातून

ज्ञान प्रबोधिनी परिचय Read More »