पाकिस्तानी शाळांमधून असा इतिहास शिकवला जातो
श्री. यशवंतराव लेले इतिहास हे राष्ट्रनिर्मितीचे फार मोठे साधन आहे, याचा आपल्या राज्यकर्त्यांना विसर पडलेला असला आणि आपल्या राष्ट्रीय इतिहासाचा विकृत जातीय विपर्यास खपवून घेण्यापर्यंत आपल्याकडील अनेक विचारवंतांचीही मजल गेलेली असली तरी पाकिस्तानात मात्र त्यांच्याच दृष्टीने इतिहास शिकवला जातो. त्यात काय काय सांगितले जाते, याचा एका पाठ्यपुस्तकाच्या निमित्ताने घेतलेला आढावा. बरेच दिवस जिज्ञासा होती की पाकिस्तानात, म्हणजेच त्या सिंधुसरितेच्या परिसरातील शाळांमधून कसला इतिहास शिकवण्यात येत असेल ? त्या सिंधुदेशात, सिंध प्रांतात दाहीरचे नाव नि त्या देवल ऋषींचे नाव इतिहासात सांगत असतील का ? ती व्यास नदी, ती असक्नवी, ती रावी, ती शतद्रू अन् ती सिंधुसरिता ! या परमपावन पंच नद्यांच्या आसपास तरी कुणी सांगत असेल का की जगातील तो प्राचीनतम ग्रंथ ऋग्वेद-ऋषींना स्फुरला ? ग्रंथालयात शोधाशोध करता Pakistan Studies हे पुस्तक हाती लागले. ११ वी – १२ वी साठी हे अनिवार्य पुस्तक म्हणून नेमलेले असून पाकिस्तानच्या सर्व प्रांतांमध्ये ते शिकवावे लागते. पहिलेच प्रकरण आहे, The Basis of Pakistan पाकिस्तानचा पाया म्हणजे इस्लामचे पृथगात्म तत्त्वज्ञान असे प्रथम प्रकरणात सांगण्यात आले आहे. पुस्तकाचे लेखकमंडळात पाचातील तीन डॉक्टर मंडळी आहेत. दुसऱ्या प्रकरणात पाकिस्तानची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करताना लेखकांनी कायदे-आझम जीनांचे वचन उद्धृत केले आहे. जीना म्हणतात ‘या उपखंडावर (म्हणजे भारतात) ज्या दिवशी पहिल्या मुसलमानाचा पाय पडला व पहिल्या हिंदूने इस्लामचा स्वीकार केला त्याच दिवशी पाकिस्तानची स्थापना झाली.’ दक्षिण आशियात मुस्लीम समाजाची निर्मिती महंमद बिन कासीमने राजा दाहीरचा पराभव करून सिंध प्रांत जिकल्यानंतर झाली. व्यापारार्थ आलेल्या अरबांच्या जीवनाचा स्थानिक लोकांवर असा काही प्रभाव पडला की त्यांच्यापैकी बहुसंख्य लोकांनी इस्लामचा स्वीकार करून मुस्लीम समाजात मोठी भर टाकली. ११ व्या शतकात दक्षिण पंजाबात सतत मुसलमान येत राहिले. लाहोरच्या हिंदू राजाने म्हणजे जयपालने सातत्याने जे विश्वासघाताचे वर्तन चालू ठेवले त्यामुळे महम्मद गझनीला राग आला व त्याने लागोपाठ स्वाऱ्या करून त्याचे राज्य खालसा करून आपल्या राज्यास जोडले. मुसलमानी समाजाचा दक्षिण आशियाच्या उत्तर व मध्य-भागात जो प्रसार झाला तो मुख्यतः महंमद घोरीच्या पराक्रमामुळे. त्याने तरेण (Tarain) युद्धभूमीवर राजा पृथ्वीराजाचा पराभव केला व थोड्याच अवधीत दिल्ली व अजमीर मुसलमानी अंमलाखाली आले. महंमद घोरीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबक याने गुजरात व ग्वाल्हेरचे राज्य मुसलमानी अंमलाखाली आणले, तर बख्त्यार खिलजी बिहार-बंगाल मुस्लीम अधिसत्तेखाली आणण्यात यशस्वी झाला. १२०६ मध्ये कुतुबुद्दीन ऐबक हा गादीवर आला- तो दक्षिण अशियाच्या मोठ्या थोरल्या भागावरील मुस्लीम राजा म्हणून ! त्याने दिल्लीस ‘दार उल खिलाफा’ बनवले. त्याने उभारलेल्या प्रचंड मशिदीचा उर्वरित एकमेव मिनार म्हणजे आजही पहावयास मिळणारा कुतुबमिनार होय ! अशा प्रकारे दीर्घकालीन मुस्लिम अधिराज्याचा द. अशियावरील पाया घातला गेला अन् १८५७ पर्यंत हे अधिराज्य चालले. मोगली सिंहासनावरून बहादूरशहा जफरला पदच्युत करण्यात आल्यानंतर हे अधिराज्य संपले. आध्यात्मिक भूमिकेतून राज्य करणाऱ्या इल्तमश व नासिर उद्दीन मोहंमदसारख्या प्रगल्भ राजांनी जसा इस्लामचा प्रसार केला तसाच प्रामाणिक, सच्चे असे जे सूफी संत त्यांनीही तो केला. त्यांची दारे हिंदू नि मुसलमान सर्वांनाच खुली असत ! एखाद्या मुसलमानाने आपले वर्तन सुधारण्यामुळे त्यांना जसा आनंद होई तसाच हिंदूने इस्लामचा स्वीकार केल्याने होत असे. पण सर्वांचीच आध्यात्मिक उन्नती करणे हे त्यांचे ध्येय होते. मुसलमानी सत्ताधीशांनी येथील मुस्लिम समाजास भक्कम राजकीय आधार दिला तर सूफींनी त्यांना नैतिक व आध्यात्मिक बळ दिले. अजमीरचे ख्वाजा मुइउद्दीन, बाबा फरीदगंज शकर, स्वाजा निजामुद्दीन अवलिया, शेख बहाउद्दीन झकेरिया, हजरत मखदुम-इ-जहानिआन इ. जहान गंश्त आणि शेख रूखउद्दीन या सूफी संतांचे काम इस्लाम प्रसाराच्या दृष्टीने स्मरणीय आहे. आठशे वर्षांच्या मुसलमानी सत्तेने या उपखंडाचे केवढे कल्याण केले ते सांगताना लेखक म्हणतात ‘शांतता, न्याय, भौतिक विकास, एक नवीन संस्कृती आणि जीवनपद्धती या गोष्टी उपखंडास मुस्लीम कालखंडाची देणगी म्हणता येईल.’ दक्षिण आशियाई मुस्लिम राजसत्तेचा कणा तैमूरलंगाच्या स्वारीमुळे मोडून पडला व फिरोजशहा तुघलकापासून ते अकबर बादशहा होईपर्यंतच्या सुमारे दीडशे वर्षात सिकंदर लोदीच्या राज्याची २८ वर्षे वगळता स्थिर असे केन्द्रीय शासनच अस्तित्वात नव्हते. अखेरीस तर राजस्थानात व विजयानगरात हिंदू बंडखोरीचे ओंगळ भूत उभे राहिले. पुढे तर रजपुतांनी (Seditious methods) राजद्रोहाचा विडा उचलून त्याबरोबर धार्मिक क्षेत्रातही अशी काही उलथापालथ आरंभिली की एकीकडे भक्ती संप्रदायाच्या मिशाने त्यांनी इस्लामच्या आध्यात्मिक पायासच सुरूंग लावला तर दुसरीकडे त्यांनी मुस्लीम समाजास उघड उघड धर्मत्यागाचीच ओढ उत्पन्न करण्यास प्रारंभ केला. ‘ त्यात भर पडली ती अकबराच्या अतिउदार धार्मिक धोरणाची ! द. अशियातील इस्लामचे त्यामुळे अस्तित्वच धोक्यात आले होते. अकबराने हिंदू वेषभूषा केलेली पाहून एतद्देशीयांना काय आनंद झाला असेल याची कल्पना करून पहावी. पण ख्वाजा बाकी-बिल्ला आणि मुजाद्दिद अल्फीथानी यांनी मुस्लीम धर्माच्या जागरणाचे काम आघाडीवर राहून सुरू केले. त्यांचे काम अवघड होते. अकबराच्या दिने इलाही या गोधडी धर्माचे खूळ निपटून काढणे हे एक आवश्यक काम बनले होते तर दुसरीकडे भक्त कबीर, बाबा नानक व त्यांचे सहकारी यांनी इस्लाम व पाखंडी विचार एक करून राम व रहीम ही एकाच शक्तीची दोन नावे असल्याचा भ्रम पैदा करण्याचा जो खटाटोप चालवला होता त्याच्याशी मुकाबला आवश्यक झाला होता ! ‘पायाभूत तत्त्वावरील श्रद्धा एकदा गोंधळली की माणसाची क्रमाने पाखंडाकडे मार्गक्रमणा सुरू झाली हे गृहीत धरावे.’ ‘मुस्लिम पुनरुज्जीवनाचे काम करणाऱ्यांत तत्कालीन दिल्लीच्या शेख अब्दुल हक्क यांचाही उल्लेख केला पाहिजे. मुसलमानांनी हादिथ (Hadith) चा अभ्यास करण्यास त्यांना गोडी वाटावी असे प्रयत्न त्यांनी केले. ‘ शाहजहान व औरंगजेब यांचे विशेष कार्य काय होते त्याबद्दल लेखक म्हणतात, ‘समाजात इस्लाम धर्माची श्रद्धा वाढीस लागावी यासाठी शहाजहानचे प्रयत्न विशेष कारणीभूत ठरले आहेत. दैनिक नमाजावर त्याचा कटाक्ष असे. धमनि सांगितलेले उपवास तो करीत असे. उलेमा व प्रतिष्ठित मुसलमानांचा गौरव तो नेहमी करीत असे आणि शरियतच्या कायद्याप्रमाणे तो आपले निर्णय करीत असे. हे सारे जरी खरे तरी मुस्लिम साम्राज्याची उभारणी शरियतच्या आधारावर करणे, साऱ्या देशभर उलेमांकडे न्यायदान सोपवणे, आणि बादशाही आसन हे साऱ्या नास्तिकतेतून किंवा अनेक देवतावादातून पूर्णतः मुक्त करण्याचे महत्कार्य मात्र औरंगजेब अलमगीर याच्या हातूनच व्हायचे होते हे खरे! ते त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले ‘फतवा-इ-अलमगिरी’मध्ये औरंगजेबाने शरियतच्या आधारे आपल्या राज्याचे कायदे मांडून दाखवले आहेत. त्याच्या काळात मोगली साम्राज्याच्या सीमा खूपच विस्तारल्या हे जरी खरे तरी त्या क्षेत्रात सत्ता दृढमूल होण्याआधीच दक्षिणेत मराठ्यांनी बंडाळी केली व औरंगजेबाच्या वारसांना त्यावर नियंत्रण ठेवणे जमले नाही.’ याच वेळी जर अहंमदशहा अब्दालीची स्वारी होऊन त्यारे पानपतावर मराठ्यांचा पराभव केला नसता तर मुसलमानी सत्ता हिंदूंच्या हाती पडण्याचे दुःस्वप्न खरे ठरले असते !’ तिकडे वायव्य सरहद्द प्रांतात सय्यद अहमद आणि शहा इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली जिहादचा पुकारा करून मुस्लिम जनतेने शिखांचा उठाव दडपून टाकण्याचे प्रयत्नात हौतात्म्य पत्करले. बंगालमध्ये सिराज उद्दौला आणि दक्षिणेत हैदरअली आणि टिपू सुलतान यांचे इस्लामस्थापनेचे सारे प्रयास विश्वासघातक्यांनी व्यर्थ ठरवले ! आणि सुमारे ८०० वर्षाच्या कालखंडानंतर द. आशियात मुसलमान सत्ताभ्रष्ट झाले. द. आशियात विजेते म्हणून आलेले नि शतकानुशतके येथे राज्यकर्ते म्हणून राहिलेले, भरभराटीस आलेले मुसलमान दूरदृष्टीच्या अभावी अन् इंग्रजांच्या कुचक्रात सापडून अधोगतीला पोचले !’ पाकिस्तानची चळवळ – तेहरिक-ए-पाकिस्तान ! याविषयी लेखक सांगतात, ‘मुसलमानांची राजकीय
पाकिस्तानी शाळांमधून असा इतिहास शिकवला जातो Read More »