संत्रिका सुवर्ण महोत्सव

संघटनेचे पर्यावरण

१. सामूहिक द्रष्टेपणा यंदा अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण झाले. त्या दिवशी रात्री अनेकांनी ते ग्रहण अनेक ठिकाणांहून पाहिले. कोणी नुसत्या डोळ्यांनी पाहिले. आणखी कोणी दुर्बिणीतून पाहिले. विविध शक्तीच्या अनेक दुर्बिणी अनेक गच्च्यां धून व टेकड्यांवरून ग्रहणाच्या आधीपासूनच चंद्राकडे रोखल्या गेल्या होत्या. ज्यांनी नुसत्या डोळ्यांनी ग्रहण पाहिले, त्यापेक्षा जास्त तपशील दुर्बिणीतून पाहणाऱ्यांना बघायला मिळाले. […]

संघटनेचे पर्यावरण Read More »

प्रकट चिंतन – पुस्तिका २ प्रस्तावना

एखाद्या संघटनेच्या कामाचा पसारा वाढत जातो, त्या प्रमाणात तिच्या सदस्यांच्या नित्य कामाच्या जागांधले भौगोलिक अंतर वाढत जाते. संघटनेतील काहीजणांनावेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या सदस्यांध्ये संपर्क टिकवून ठेवण्याचे काम करावे लागते. ठिकाणानुसार परिस्थिती बदलत जाते. परिस्थितीतील बदलांना वेगवेगळ्याठिकाणचे सदस्य वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतात. स्थानिक प्रश्नांना स्थानिक उत्तरे काढली जातात. अशा वेळी वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या सदस्यांना आपले

प्रकट चिंतन – पुस्तिका २ प्रस्तावना Read More »

मंत्रपुष्पांजली- सार्वभौम राज्याची कामना

लेख क्र. ५६ ३०/०८/२०२५ गणेशोत्सव भारतीय मनाला आनंद देणारा आहे. कुटुंबाला, समाजाला संघटित करणारा आहे. गणेशाची स्थापना झाल्यापासून त्याच्या विसर्जनापर्यंत केली जाणारी आरती हा सुद्धा भारतीय मनाला आस्था असणारा विषय आहे. आर्तभावाने ईश्वराला मारलेली हाक म्हणजे आरती. आरती म्हणून झाल्यावर हातात फुले आणि अक्षता घेवून मंत्रपुष्प वाहिले जाते. पूजेतील सोळा उपचारातील हा शेवटचा उपचार मानला

मंत्रपुष्पांजली- सार्वभौम राज्याची कामना Read More »

अभ्युदय व नि:श्रेयसाची दीक्षा देणारा जैन धर्म

लेख क्र. ५४ २३/०८/२०२५ ‘यज्ञ’ या मासिकाच्या ‘प्राचीन भारतीय संस्कृती विशेषांक, दिपावली २००८’ मध्ये डॉ. मनीषा शेटे यांचा जैन धर्माचा परिचय करून देणारा लेख प्रकाशित झाला. जैन धर्म आपल्याला नि:श्रेयसाचा म्हणजेच मोक्षाचा मार्ग शिकवतो. हा मार्ग शिकवणारे तीर्थंकर व या मार्गावर जाताना आवश्यक असणारी तत्वे आणि त्यातून मिळणारे फळ यांचीही माहिती या लेखात आहे. असा

अभ्युदय व नि:श्रेयसाची दीक्षा देणारा जैन धर्म Read More »

यजुर्वेदातील राष्ट्रसंकल्पना

लेख क्र. २७ १/७/२०२५ वीस वर्षांपूर्वी मा. यशवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनीषा शेटे यांनी केलेल्या अभ्यासातून ‘यजुर्वेदातील राष्ट्रसंकल्पना’ हा लेख तयार झाला. भारताला राष्ट्र संकल्पना ब्रिटिश आल्यानंतरच समजली असे म्हटले जाते. त्या पार्श्वभूमीवर यजुर्वेदातून दिसणार्‍या राष्ट्रीय जीवनाचा विचार इथे मांडला आहे. वेदत्रयींमधील ‘यजुर्वेद’ हा एक सामाजिक वेद, यज्ञ व त्याच्याशी निगडित सर्व कर्मकांड त्याच्यामध्ये येते.

यजुर्वेदातील राष्ट्रसंकल्पना Read More »

सौर कालदर्शिकेचा प्रवास

लेख क्र. १४ १८/६/२०२५ कालदर्शिका निर्मिती व नंतर ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्थेला खूप खटाटोप करावे लागत. त्यासाठी विविध क्षेत्रातील विद्वान कालदर्शिका समितीमध्ये कार्यरत होते ज्यामध्ये पं. गोरेशास्त्री, श्री. मा. भ. पंत, श्री. वि. वि. मोडक, डॉ. अ. मा. साठ्ये, प्रा. अ. ग. पटवर्धन, प्रा. नी. र. पटवर्धन, प्रा. कृ. श्री. अर्जुनवाडकर यांची नावे येतात. प्रत्यक्ष

सौर कालदर्शिकेचा प्रवास Read More »

संस्कृत सर्वांसाठी!

लेख क्र. १२ १६/६/२०२५ संत्रिकेमध्ये सुरुवातीच्या काळात संंस्कृत सर्वांपर्यंत पोहोचावे तसेच, संस्कृतीचे रक्षण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न झाले. संस्कृत भाषेच्या रक्षणासाठी व वाढीसाठी संत्रिका विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले व पूर्णत्वास नेले, काही मधेच बंद पडले. अशा उपक्रमांची माहिती येथे देत आहोत. संत्रिका विभागाचे पहिले विभागप्रमुख प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर व त्यांचे सहकारी यांनी सुरुवातीस

संस्कृत सर्वांसाठी! Read More »

धर्म सुधारक व गाढे विद्वान पंडित रघुनाथशास्त्री कोकजे यांचे महानिर्वाण

लेख क्र. ९ १३/६/२०२५ मागील दोन लेखात आपण बघितले की धर्म-परिवर्तनासाठी १९३८ सालापासून ‘धर्मनिर्णय मंडळ’ या संस्थेने अनेक कामे केली. १९३९ पासून पं. रघुनाथशास्त्री कोकजे संस्थेचे कार्यवाह होते. या महान धर्म-सुधारकाचा, विद्वानाचा मृत्यू १४ फेब्रुवारी १९७६ रोजी झाला. ‘देवर्षि-प्रकाश’ या त्रैमासिकाच्या मे १९७६ च्या अंकात ‘संपादकीय’मध्ये मो. वा. निमकर यांनी ‘पं. रघुनाथशास्त्री कोकजे’ यांच्या निधनानंतर

धर्म सुधारक व गाढे विद्वान पंडित रघुनाथशास्त्री कोकजे यांचे महानिर्वाण Read More »

योगी अरविंद यांचे महाकाव्य ‘सावित्री’

१० जून २०२५ लेख क्र. ६ मुळात महाभारतातील या कथेचा विस्तार लहान आहे. पण श्री अरविंदांचा असा विश्वास होता की सावित्रीच्या कथेमध्ये एक गहन अर्थ दडलेला आहे, जो कालांतराने हरवला आहे. त्यांनी हा अर्थ शोधण्यासाठी आणि मांडण्यासाठी सुमारे ४० ते ५० वर्षे मनन चिंतन केले व त्यांच्या या प्रदीर्घ चिंतनातून  ‘ ‘Savitri: A legend and

योगी अरविंद यांचे महाकाव्य ‘सावित्री’ Read More »