आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला २०२४

प्रवृत्तीपर अध्यात्म-विचारांच्या सिंचनातून राष्ट्रयोगाची साधना

आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला- भाग ४- प्रवृत्तीपर अध्यात्म-विचारांच्या सिंचनातून राष्ट्रयोगाची साधना https://youtu.be/gEmr9tqLM-E?si=KBv7gr15cwOz539s टीप – मा. श्री. गिरीश बापट यांच्या व्याख्यानाचे खाली दिलेले शब्दांकन स्वयंचलित पद्धतीने केलेले आहे. त्यात शुद्धलेखनाच्या व वाक्यरचनेच्या चुका असू शकतात. कृपया नोंद घ्यावी नमस्कार, आध्यात्मिक राष्ट्रयोग या व्याख्यानमालेतलं आजचं शेवटचं पुष्प आहे. मागच्या वेळचं व्याख्यान “आध्यात्मिक ते व्यावहारिक – एक सलग रेषा” या व्याख्यानानंतरही चॅट बॉक्समध्ये किंवा व्यक्तिशः काही प्रश्न आलेले नाहीयेत. त्यामुळे आजच्या भाषणाला लगेचच सुरुवात करतो. इष्ट – पंथ – संप्रदाय – धर्म – योग – आध्यात्मिक राष्ट्रयोग ‘राष्ट्रयोग’ हा शब्द वापरताना जो वेगळा विचार केलेला होता, त्याच्यामध्ये एक विचार असाही केला होता की, आपल्याकडे भारतामध्ये “इष्ट” अशी संकल्पना आहे. “इष्ट” म्हणजे प्रत्येकाचा आध्यात्मिक आदर्श आणि तो प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. प्रत्येकाने स्वतःचं इष्ट निवडायचं आणि त्या इष्टाची उपासना करायची, अशी कल्पना आहे. प्रत्येकाचं इष्ट वेगळं असलं तरी, तो उपासना कुठल्या पद्धतीने करणार, याचे अनेक प्रयोग झाल्यानंतर काही मार्ग निश्चित होत गेले. त्याला मार्ग किंवा पंथ असं म्हणता येईल आणि ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, राजयोग असे मुख्य चार मार्ग आणि काही छोटे-छोटे इतर मार्ग अशी मार्गांची कल्पना आहे. मग इष्ट अनेक, मार्ग अनेक, प्रत्येकाने आपलं इष्ट निवडावं, आपला मार्ग निवडावा म्हणजे पद्धत निवडावी की, त्या इष्टापर्यंत कसं जायचं. पण अनेक लोकांना आपण सगळेजण एका मार्गाने चाललेलो आहोत, असं लक्षात आल्यानंतर एकत्र यावसं वाटतं आणि मग त्यातून संप्रदाय तयार होतात. मग त्यांचा स्वतःचा एखादा विशिष्ट पोशाख होतो, विशिष्ट पद्धत तयार होते, भोजनाची, भजनाची काही विशिष्ट पारिभाषिक शब्द येतात. त्यांचे काही आदर्श चरित्र ठरतात, काही वागायच्या पद्धती ठरतात, आणि त्या संप्रदायांना ठळक ओळख निर्माण होत जाते. पण इष्ट आणि मार्ग हे जास्त महत्त्वाचे. आपल्याला त्या मार्गाने जाण्यासाठी मदत होत असेल तर संप्रदायांचा उपयोग होतो. असे अनेक संप्रदाय समाजामध्ये असू शकतात, त्या सगळ्या संप्रदायांना कवेत घेणारा तो ‘धर्म’ अशी आपल्याकडची कल्पना आहे. आध्यात्मिक राष्ट्र्ययोग आध्यात्मिक ते व्यावहारिक सलग रेषा असं म्हटलं की, त्याच्यानंतर आपल्या इष्टापर्यंत पोहोचण्यासाठी ‘राष्ट्र’ हे एक सामुदायिक इष्ट सगळ्यांचे होऊ शकतं, अशी कल्पना विवेकानंदांनी मांडली. तुम्हाला व्यक्तिगत आपापल्या घरी पाहिजे त्या इष्टाची पूजा करा, परंतु सगळेजण बाहेर याल तेव्हा मातृभूमी हेच आपलं दैवत, हेच आपलं इष्ट असू द्या, सामुदायिक इष्ट असू द्या, अशी कल्पना मांडली. आणि म्हणून सगळे ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यासारखाच ‘राष्ट्रयोग’ असा शब्द वापरावा असं सुचलं. आज ज्याच्या संबंधी बोलायचे ते म्हणजे आध्यात्मिक राष्ट्रयोग. त्याच्यामध्ये काय काय येतं, मुख्यतः त्याच्यात कुठल्या प्रकारचा आचार येतो आणि तो का करायचा याच्या संबंधी बोलायचं आहे. मग असा राष्ट्रयोगाचा आचरण कुठे होतंय, असा शोध घेतल्यानंतर मला असं वाटलं की, दूर कुठे जाण्यापेक्षा ज्ञानप्रबोधिनीतच या राष्ट्रयोगाचा आचरण कसं होतंय, याचा शोध घ्यावा आणि हा सगळ्यांच्या समोर मांडावा, असा विचार करायला सुरुवात केली.   पथकाधिपती आणि साधन-साध्य/उद्धिष्ट मांडणी सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात आलं, की असा हा राष्ट्रयोग ज्ञानप्रबोधिनीच्या आधी कोणी मांडलाय का, वेगळ्या पद्धतीने त्या त्या काळाच्या परिभाषेमध्ये. आणि मग त्यांना विचारून आपण आपलं राष्ट्रयोगाचे आचरण करतोय का, आपल्याला काहीतरी स्वतंत्र सुचलंय. तर, अर्थातच मग प्रबोधिनीने जे आदर्श राष्ट्रपुरुष म्हणून स्वीकारलेले आहेत, त्यांची नावे डोळ्यासमोर येतात. त्याची गंमत अशी आहे की, हे प्रबोधिनीचे आदर्श राष्ट्रपुरुष म्हणून आपण नंतर प्रकटपणे मांडायला सुरुवात केली. सुरुवातीला ही चार नावे ज्ञानप्रबोधिनीची पुण्यातली प्रशाला सुरू झाल्यानंतर आप्पांचे नेतृत्व विकसनाचे प्रयोग सगळे पीएचडीच्या निमित्ताने अभ्यासून झालेले होते. त्याच्यात शाळेमध्ये कुलपद्धती किंवा पथक पद्धती असेल, तर त्यातून काही जणांना नेतृत्वाची संधी मिळते. आणि मग त्या पथकांना नाव काय असावं, तर ज्या नावातून काहीतरी स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल, मार्गदर्शन मिळेल, अशी नावं असावीत. अशा कल्पनेतून आप्पांनी काही नावं काढली होती, त्यामध्ये नेहरूंचं, सावरकरांचं, नेताजी सुभाषचंद्र बोसांचं, जमशेदजी टाटांचे नाव होतं. अर्थातच ही नंतरची नावं निश्चित झाली – रामदास, दयानंद, विवेकानंद, अरविंद ही सगळी नावं निश्चित झाली. आणि मग आता या नावांमधून चार नावांची निश्चिती करताना, निवड करताना काहीतरी निकष लावले पाहिजेत. त्यात निकष लावले ते हे … सगळे पथकाधिपती जे निवडायचे, ते द्रष्टे म्हणजे राष्ट्रद्रष्टे असले पाहिजेत, आणि अर्थातच ब्रह्मद्रष्टे सुद्धा असले पाहिजेत. संन्यस्त वृत्तीचे असले पाहिजेत. संन्यासी असे म्हणायला हरकत नाही; पण रामदास आणि अरविंदांनी विधिवत संन्यास घेतलेला नव्हता. त्यामुळे संन्यस्त वृत्तीचे असे म्हणतो. तर अशा आदर्श राष्ट्रपुरुषांची, पथकाधिपतींची निवड करताना ते राष्ट्र राष्ट्रद्रष्टे असले पाहिजेत आणि संन्यस्त वृत्तीचे असले पाहिजेत, हे त्यांच्या निवडीसाठी निकष होते. मग या चौघांनी समान काय सांगितलेलं आहे, म्हणजे आणखीन नावांची भर घालायची झाली, निवड करायची झाली, तर मग हे पुढचे निकष सुद्धा विचारात घेता येतील. या चौघांनी विकसित व्यक्ती कशी असली पाहिजे, हे सांगितलेलं आहे. संघटक कसा असला पाहिजे, हे सांगितलेलं आहे. देशव्यापी संघटनेची आवश्यकता ही त्यांनी मांडलेली आहे आणि धर्मसंस्थापना हे उद्दिष्ट त्यांनी मांडलेले आहे.  विकसित व्यक्तींनी संघटित होऊन किंवा अशा विकसित व्यक्तींना संघटित करून, अशी देशव्यापी संघटना करून काय करायचे? तर धर्मसंस्थापना करायची, हे उद्दिष्ट त्यांनी मांडलेले आहे. रामदासांनी धर्मसंस्थापना शब्द वापरलेला आहे. विवेकानंदांनी वापरलाय, दयानंदांनी वापरलाय, अरविंद त्यांच्या परिभाषेमध्ये धर्मसंस्थापना करायची म्हणजे काय करायचं? तर अतिमानस शक्तीचं अवतरण झालं पाहिजे. त्याच्यातून आजचा माणूस हा आणखीन विकसित देवमानव झाला पाहिजे आणि अशा देव मानवांचा समाज तयार झाला पाहिजे, अशी कल्पना वाढलेली आहे. प्रबोधिनीच्या संस्थापकांनी, म्हणजे आप्पांनी त्यांच्या प्रतिभेने या सगळ्याचे वर्णन “अतिमानस शक्ती अवतरो मानवतेमध्ये” अशा मंत्रांमध्ये केलेले आहे. हा मंत्र अजून कधी आपण उपासनेमध्ये म्हटलेला नाही. पण “माताजी अरविंद काय म्हणाले” हे पुस्तक आपण केले. त्याच्यात “अतिमानस शक्ती अवतरो मानवतेमध्ये” अशा मंत्राचा उल्लेख मुखपृष्ठावर आणि या प्रस्तावनेमध्ये सुद्धा केलेला आहे. पण ही खूप पुढची गोष्ट आहे. याच्या आधी काय करायला पाहिजे? तर त्या पूर्वी “परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये” हा मंत्र म्हटला पाहिजे. …’परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ हा मंत्र म्हटला पाहिजे म्हणजे काय तर हिंदू समाजामध्ये संघटना निर्माण व्हावी, हिंदू समाजातला पराक्रम वाढावा. हिंदू समाजातल्या सगळ्यांना स्वतःमधल्या आणि इतरांमधल्या ईश्वरी शक्तीची जाणीव व्हावी. हिंदू समाजाला, आपल्याला ही जी जाणीव झालेली आहे, ती सगळ्या जगाला करून देण्याची, विश्वविजयाची प्रेरणा निर्माण व्हावी, असं संघटना, पराक्रम, ईश्वरी शक्तीची जाणीव आणि विश्वविजयाची प्रेरणा ही हिंदू समाजातली वाढली, म्हणजे परब्रह्मशक्तीचे स्फुरण झालं, असं म्हटलेलं आहे. हे जर का व्हायचं असेल हिंदू समाजामध्ये, तर हे कोणी करायचं? तर हे ‘प्रबोधिनी’ या संघटनेने करायचं. आणि त्याच्यासाठी त्यापूर्वी सुद्धा ‘परब्रह्मशक्ती प्रबोधिनीमध्ये’ अशाही मंत्राची रचना केली. परब्रह्म शक्तीचे स्मरण प्रबोधिनीमध्ये व्हावं म्हणजे काय व्हावं तर प्रबोधिनीचा विस्तार अखिल भारतीय व्हावा. इथे प्रबोधिनी या संघटनेतल्या सगळ्या व्यक्तींमध्ये प्रतिभाशक्ती वाढावी. त्यांनी विज्ञानाचा उपयोग करावा, विज्ञानाची कास धरावी, वेदांत तत्वज्ञानाचा अभ्यास त्यांनी करावा, आपली नेतृत्वशक्ती वाढवावी, संघटना करावी, व्यक्तिगत आणि सामूहिक पराक्रम करावा. हे सगळं करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. जे हिंदुत्वामध्ये आलं पाहिजे, ते आलंच पाहिजे: संघटना, पराक्रम, ईश्वरी शक्तीची जाणीव आणि विश्वविजयाची प्रेरणा. पण त्याच्यासाठी प्रबोधिनीने

प्रवृत्तीपर अध्यात्म-विचारांच्या सिंचनातून राष्ट्रयोगाची साधना Read More »

अध्यात्म ते व्यवहार- एक सलग रेषा

 आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला २०२४ / By Amol Phalke आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला – भाग ३  टीप – मा. श्री. गिरीश बापट यांच्या व्याख्यानाचे खाली दिलेले शब्दांकन स्वयंचलित पद्धतीने केलेले आहे. त्यात शुद्धलेखनाच्या व वाक्यरचनेच्या चुका असू शकतात. कृपया नोंद घ्यावी  पहिला पुष्प होतं ते राष्ट्र योगाची संकल्पना या विषयावर होतं. त्याच्यामध्ये मुख्यतः राष्ट्रयोग म्हणजे राष्ट्र निर्माणात आपण सर्वांनी आपलं चित्त एकाग्र करणे अशी संकल्पना मांडलेली होती. दुसऱ्या व्याख्यानामध्ये राष्ट्र निर्माण झालं तर ते राष्ट्र टिकलं पाहिजे, राष्ट्राचा निर्वाह चालू पाहिजे, राष्ट्राच्या निर्वाहासाठी सामाजिक क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, आर्थिक  क्षेत्रात, पर्यावरणाच्या बाबतीत, राजकारणाच्या बाबतीत, कायद्यांच्या बाबतीत, लोकसंख्येच्या वयोगटांचा विचार कसा करायचा, कालमानानुसार हे कसं करायचं, या सगळ्याचा म्हणजे राष्ट्रयोगाचा व्यवहार याच्या संबंधी आपण बोललेलो होतो. आणि आता आजचा विषय  व्यवहार ते अध्यात्म ही एक सलग रेषा कशी आहे? शीर्षकात म्हटले तसा अध्यात्म ते व्यवहार एक सलग रेषा कशी आहे? हे आज आपण बघणार आहोत . म्हणजे नंतर अध्यात्मिक राष्ट्रयोग त्याच्या संबंधी आपल्याला आणखी तपशीलात बोलता येईल. भौतिक समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती एकत्र जाऊ शकते अध्यात्म ते व्यवहार ही सलग रेषा असा विचार करायला सुरुवात केली की मला भगवद्गीतेची आठवण होते. भगवद्गीते मध्ये अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या संवाद आहे. अर्जुन हे व्यवहाराचे प्रतीक आहे आणि श्रीकृष्ण हे अध्यात्माचे प्रतीक आहे. आणि भगवद्गीतेच्या शेवटी असं म्हटलंय    यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीः-विजयो-भूतिः-ध्रुवानीतिः मतिःमम || गीतेचा समारोप म्हणून संजय धृतराष्ट्रांना सांगतो की जिथे योगेश्वर कृष्ण आहे आणि धनुर्धर अर्जुन आहे तिथे श्री: म्हणजे समृद्धी, विजय म्हणजे यश, इतर वेळी भूती म्हणजे श्री किंवा समृद्धी असाच अर्थ घेतात. पण इथे हे एकत्र आलेले आहेत त्यामुळे विशेष प्रकारची समृद्धी ज्याचं वर्णन आपल्याला सर्वांचं कल्याण, कल्याणकारी राज्य असं करता येईल. ध्रुव: नीती म्हणजे सर्वांचे जिथे सतत नैतिक आचरण चालू असते असं राज्य तिथे तयार होईल असं म्हटलेलं आहे. समृद्धी, यश, कल्याण किंवा नैतिक आचरण हे चारही शब्द जर पाहिले तर त्याच्यामध्ये अध्यात्म हा शब्द कुठे आहे ? श्रीकृष्णांनी अर्जुनाला तर अनेक वेळा तू योगी हो! तू योगी हो! तू योगी हो! असं म्हटलेलं आहे. योगी हो म्हणजे योगाचा आचरण करून प्रत्यक्ष जे परमतत्व आहे त्याचा    अनुभव घे असं सांगितलेले आहे. तेही सांगितले आणि युद्ध केलंस तर हे तुला सगळं मिळेल म्हणजे एकाच व्यक्तीला या दोन्ही गोष्टी मिळवणे शक्य आहे असं गीतेमध्ये दिसतं. हे फक्त शेवटच्या  अठराव्या अध्यायात नाही,  तर दुसऱ्या अध्यायामध्ये  हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्  असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. हरलास तर तुला स्वर्ग मिळेल आणि    जिंकलास तर पृथ्वीचे राज्य मिळेल, त्याचा उपभोग तू घेशील. अकराव्या अध्यायात पुन्हा तस्मात्मुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रुन् भुंक्ष्व राज्यं समृद्धम् गीता ११.३३ : असं म्हटलेलं. आता तू उठ आणि यश मिळव, शत्रूंना जिंक, त्यांच्यावरती विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. सोळाव्या अध्यायात दैवी संपत्तीचे वर्णन केल्यानंतर असं सांगितलेले, ही सगळी दैवी संपत्ती मोक्षाला सहाय्यक ठरते आणि असुरी संपत्ती बंधनात घालते. पण तू काही काळजी करू नकोस मा शुच:, सम्पदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव  दैवी संपत्ती घेऊन जन्माला आलेला पांडव आहेस, म्हणजे मोक्षाचा अधिकारी आहेस, म्हणजे हा अध्यात्मिक अनुभव घेण्याचा तू अधिकारी आहेस असं सांगितलेले. म्हणजे एकाच वेळी तू सगळं यश मिळव, समृद्धी मिळव, शत्रूंना जिंक कल्याण कर  सगळ्यांचं आणि असं राज्यामध्ये सगळ्यांचे  सतत नैतिक आचरण चालू राहील असे सगळं सांगितलेलं आहे. तू मोक्षाचा अधिकारी आहेस असेही सांगितलेलं आहे तर भौतिक समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती हे एकत्र जाऊ शकते असं श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं . अध्यात्म कल्पना विकसन   अध्यात्म हा शब्द  आहे  त्याचं काही जणांना विलक्षण आकर्षण असतं आणि काही जणांना त्याची भीती असते किंवा ऍलर्जी असते. नको आपल्याला त्याचा काही संबंध. याचं कारण अध्यात्म हा शब्द आज वापरला जातो तो  वेगळ्या अर्थाने वापरला जातो.  तो वापरायला सुरुवात झाली ती वेगळ्या अर्थाने झाली आणि त्या अर्थात कशी प्रगती होत गेली असं आपण पाहिलं तर मग त्याची भीती किंवा विशेष आकर्षण वाटायचं काही कारण नाही. संस्कृत मधलं आत्मन हे सर्वनाम म्हणजे “स्वतः”. अध्यात्म म्हणजे स्वतः संबंधी. स्वतःच खरं रूप ओळखण्यास स्वतःचे कुठल पहिलं रूप /आपल्याला दिसतं तर आपलं शरीर, मी म्हणजे शरीर. तैत्तिरीय उपनिषद म्हणून एक उपनिषद आहे. त्याच्यातलं पहिलं प्रकरण शिक्षावल्ली. आणि शिक्षा म्हणजे  वेदांचा उच्चार शास्त्र. त्याच्या संबंधी वर्णन करताना असं सांगितलं की आता उच्चार शास्त्राचे अध्यात्म काय? तर वरचा जबडा खालचा जबडा दोन्हीच्या मधली जीभ आणि यांची व्यवस्थित हालचाल झाली की वाणी निर्माण होते. हे उच्चार शास्त्राच अध्यात्म  असं म्हटलेलं आहे. पूर्वीची जी कल्पना होती ती जे काही निर्माण झालेले त्याला भूत असा शब्द होता आणि जे सगळं जग निर्माण झालेला आहे ,त्या भूता संबंधी अधिभूत असा शब्द होता. त्या सगळ्या निर्माण झालेल्यातला मी वेगळा त्याच्यासाठी अध्यात्म असा शब्द होता. आपल्या इंद्रियांना कळते, जाणवते ते सगळं भूत आणि जे आपल्याला कळत नाही, काय होते?कसं होते? त्याच्यासाठी दैव असा शब्द वापरला जातो. त्यामुळे अधिभूत, अधिदैव आणि अध्यात्म असे शब्द होते. याचा पूर्वीचा पारंपारिक अर्थ लक्षात घ्यायचा असेल तर त्रिविध ताप म्हणून जे वर्णन केलेले आहेत की तीन प्रकारचे ताप लोकांना होतात. त्रास होतो आणि ते तिन्ही  प्रकारच्या तापाने जो पोळून निघालेला आहे तो मग खऱ्या मोक्षाचा अधिकारी बनतो, अशी पूर्वीची कल्पना. आध्यात्मिक ताप म्हणजे काय ?तर आपल्या शरीराच्या आतून निर्माण होणारे सगळे आजार. आधी व्याधी सगळे ज्याला म्हणतात ते सगळे आध्यात्मिक ताप. बाहेरून आपल्याला कोणीतरी येऊन मारतं, सोसाट्याचा वारा येतो, वीज अंगावर कोसळते, पाण्यात आपण वाहून जातो, आगीत भाजतं  हे सगळे आधिभौतिक  ताप आणि आधिदैविक ताप म्हणजे काय म्हटले तर जे मृत्यूनंतर तुम्हाला नरकामध्ये भोगावे लागतात. त्या आधीभौतिक ताप गुणिले शंभर असं त्याचं सगळ्या आधिदैविक तापाचे वर्णन केलेले आहे.  जसं जसं कळत गेलं की निसर्गातल्या सगळ्या  शक्ती काय काय आहेत तर ज्याला आधी आधीदैविक ताप म्हटलं होतं ते आधिभौतिक तापामध्ये येत गेले. आपल्या शरीराचे ज्ञान होत गेलं तर तसं आध्यात्मिक ताप सुद्धा अनेक या वेगळ्या जंतूंमुळे होतात. ते जंतू हे आपल्यापेक्षा वेगळे त्यामुळे ते आधिभौतिक ताप. असं करत करत करत मी या शरीराच्या पलीकडे आहे असं लक्षात येत गेलं. ज्या तैत्तिरीय उपनिषदामध्ये हे सुरुवातीला वरचा जबडा खालचा जबडा वगैरे म्हटलेले आहे त्याच्या  थोडं पुढे आणखीन आणखीन वर्णन करताना मग अध्यात्म म्हणून पुन्हा जे वर्णन केलेलं  आहे,  त्याच्यात पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय आणि पंचप्राण हे सगळं मिळून अध्यात्म असं म्हटलेलं आहे. इतरही दोन तीन उपनिषदे आहेत. त्याच्यामध्ये अशाच पद्धतीचं वर्णन केलेलं आहे की आता अधिभूताबद्दल बोलून झालं आता अध्यात्माबद्दल बोलतो. आणि  मग आपल्या शरीरातल्या सगळ्या अनेक गोष्टींमध्ये काय काय बदल होऊ शकतात त्या  सगळ्याच्या यादीच्या यादी त्याच्यामध्ये. मास आहे, त्वचा आहे, हाडं आहेत सगळ्याचा उल्लेख आहे. हे सगळं म्हणजे अध्यात्म. तर स्वतः संबंधीचा विचार करत असताना त्यातल्या अनेक गोष्टी या अभिभूत म्हणता येतील अशा आहेत. त्यामुळे  मी म्हणजे हे शरीर नाही त्याच्यापेक्षा आतमध्ये काहीतरी आहे असा विचार करत करत मग अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय आणि त्याच्या आतला आत्मा यांच्या संबंधीचा विचार म्हणजे अध्यात्म अशी अध्यात्म कल्पना विकसित होत गेलेली आहे. अध्यात्म आणि व्यवहार ही एक सलग

अध्यात्म ते व्यवहार- एक सलग रेषा Read More »

देशकारण करणे आणि करविणे

आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला – भाग २ – देशकारण करणे आणि करविणे टीप – मा. श्री. गिरीश बापट यांच्या व्याख्यानाचे खाली दिलेले शब्दांकन स्वयंचलित पद्धतीने केलेले आहे. त्यात शुद्धलेखनाच्या व वाक्यरचनेच्या चुका असू शकतात. कृपया नोंद घ्यावी राष्ट्राला देव मानणारे होऊ – प्रश्नोत्तरे मागच्या रविवारी राष्ट्रयोगाची संकल्पना, “राष्ट्राला देव मानणारे होऊ” असं शीर्षक होतं त्याच्यावर तासभर काही विचारांची मांडणी मी केली. आज त्याच्या पुढचा भाग “राष्ट्रयोगाचा व्यवहार” असा विषय आहे. आजच्या  भाषणाचं “देशकारण करणारे आम्ही होऊ आणि इतरांना करू” अशा शीर्षकाची कल्पना मी मनात केलेली आहे. ज्यांनी मागच्या वेळचे भाषण ऐकलं नाहीये, त्यांच्यासाठी जर  राष्ट्रयोगाची संकल्पनेचा आढावा घ्यायचा म्हटला तर, ज्ञान प्रबोधिनीच्या वर्षारंभ उपासनेची पहिली पोथी होती, त्या पोथीच्या प्रस्तावनेमध्ये अगदी एका वाक्यामध्ये थोडक्यात ही कल्पना मांडलेली असं मला  वाटतं. काय वाक्य आहे? तर-  ज्ञान आणि विज्ञान, अध्यात्म विद्या आणि भौतिक विद्या यांचा समतोल राखणे आणि अभ्युदय व निः श्रेयस यांची चरमसीमा गाठणे हा व्यक्ति जीवनाचा परमोच्च बिंदू  आहे.  उन्नत व्यक्तिजीवन आणि उन्नत राष्ट्रजीवन यातील द्वैत पुसले जाऊन तिथे समभाव निर्माण व्हावा, हे आम्हाला साध्य करायचं आहे. तर या दोन वाक्यांमध्ये राष्ट्रयोगाच्या संकल्पनेची अगदी प्राथमिक कल्पना थोडक्यात आली आहे असं मला वाटतं.  व्यक्तिगत जीवनात चरमसीमा गाठणे म्हणजे जास्तीत जास्ती प्रगती साधणे. व्यक्ती जीवन आणि राष्ट्रजीवन यात समभाव निर्माण करणे म्हणजे व्यक्ती जीवन जितकं उन्नत झालेलं आहे, तिथे राष्ट्रातल्या सगळ्या लोकांचे जीवन उन्नत झालेलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रामध्ये ज्ञान – विज्ञान, अध्यात्मिक विद्या आणि भौतिक विद्या, अभ्युदय आणि  निःश्रेयस या सगळ्यांची चरम सीमा गाठलेली आहे असं होणं हे राष्ट्रयोगाचं उद्दिष्ट आहे. असं मागच्या वेळच्या व्याख्यानाचं थोडक्यात सार सांगता येईल. त्याच्या संबंधी काही प्रश्न आलेले आहेत..  दोन जणांनी झूमच्या चॅट बॉक्स मध्ये पाठवलेले होते. दोघांनी व्हाट्सअप वर स्वतंत्र संदेश पाठवलेला होता आणि आणखी दोघांनी प्रश्न विचारला. पण एका विषयावरती आज मी  सुरुवातीला बोलावं असं  म्हटलेल.  गांधीजींची जी कल्पना मांडलेली होती की राष्ट्रातल्या समाज जीवनामध्ये कोणकोणते बदल झाले म्हणजे राष्ट्र विकसित झालं असं  आपल्याला म्हणता येईल. त्यातल्या पहिल्याच मुद्द्यावरती एक प्रश्न आलेला आहे, देशातल्या गरिबातल्या गरीब ,अडाण्यातल्या अडाणी, जो एरवी समाज जीवनामध्ये मूक असतो, जे जे होईल ते फक्त स्वीकारतो अशा व्यक्तीला सुद्धा माझ्या  मताला या देशात किंमत आहे, माझं म्हणणं ऐकून घेतलं जातं अशी स्थिती आली पाहिजे. त्याच्यावरती एक प्रश्न असा होता की असं प्रत्येकाचं ऐकत बसलं आणि प्रत्येकाचं  वेगवेगळं मत त्याला किंमत आहे असं  करत बसलो तर काम कसं करता येईल?  मला प्रश्न ऐकल्या ऐकल्या प्रबोधिनीच्या पहिल्या भवितव्य लेखातलं सूत्र वाक्य – ज्याला आपण साध्य सूत्र म्हटलं होतं ते आठवलं की “देशातील सुप्त मनुष्यशक्तीचा आत्मसन्मान जागृत करणे, आत्मसन्मान वाढवणे.”  गांधीजींनी म्हटलं की प्रत्येकाला माझ्या मताला किंमत आहे, ऐकून घेतलं जाते असं वाटलं पाहिजे. मला वाटतं आत्मसन्मान जागृत होण्याचे ते पहिलं लक्षण आहे. मला काहीतरी मत आहे,  ते मी व्यक्त करू शकतो आणि बाकीचे माझ्या मताला किंमत देतात, म्हणजे निदान ऐकून तरी घेतात तर प्रत्येकाला बोलायची संधी असली पाहिजे.  प्रत्येकाला ऐकून घेतलं जातंय असं वाटतंय हे अतिशय आवश्यक आहे. ज्ञान प्रबोधिनीमध्ये जी सहविचारात्मक नेतृत्वपद्धती आपण वापरतो त्याच्यामध्ये असंच म्हणतो की गटातल्या प्रत्येकाला प्रत्येक विषयावरती जे काही मांडायचं असेल ते मोकळेपणाने आधी मांडता आलं पाहिजे. जे गटासाठी आपण प्रबोधिनीमध्ये म्हणतो ते गांधीजींनी देशातल्या सर्व लोकांसाठी म्हटलेलं आहे. आत्ता सार्वजनिक निवडणुकीच्या वेळी आपण जी प्रौढ मतदान पद्धती स्वीकारलेली आहे, त्या अधिकाराचा जो वापर करतात त्यांच्यापर्यंत पोहोचली असं म्हणता  येईल. साधारणपणे ५० टक्के ते ८० टक्के पर्यंत मतदान वेगळ्या मतदारसंघात वेगवेळ्या निवडणुकांच्या वेळी होतं . देशातल्या इतक्या लोकांपर्यंत निदान हा मतदानाचा अधिकार मी वापरला पाहिजे आणि वापरू शकतो एवढी स्थिती आलेली आहे. समाज आणि समाजाची जीवन पद्धती  याच्यातल आधी काय?  दुसरा प्रश्न जो आलेला होता की समाज आणि समाजाची जीवन पद्धती याच्यात आधी काय येत? म्हणजे कारण काय आणि परिणाम काय आहे? जीवन पद्धती हे कारण आहे आणि त्याच्यामुळे समाज घडतो समाज हा परिणाम आहे? का समाज हा कारण आहे आणि जीवन पद्धती हा त्याचा परिणाम आहे? मी असं म्हटलं होतं की समाज हा कारण आहे आणि समाज जीवन पद्धती घडवत जातो. आता खरं तर हे अखंड चक्र आहे. पण सुरुवात कशी झाली असेल? जीवन पद्धती आधी असेल का समाज आधी असेल? तर समाज आधी आहे असं म्हणायला लागते . प्रश्न असा होता की जीवन पद्धती समाजात अनेक पिढ्या चालत आलेली आहे त्याचा माझ्यावरती काहीतरी परिणाम होतोच.  त्याप्रमाणे माझी जीवन पद्धती घडत जाते.  समाजाच्या आजच्या सगळ्या लोकांची जीवन पद्धती घडत जाते.  त्यामुळे जीवन पद्धती हे कारण आणि समाज हा परिणाम आहे असं वाटते.  पहिलं जे निरीक्षण होतं की देशातल्या प्रत्येकाला बोलायची संधी मिळाली पाहिजे, त्याच्या पुढे प्रत्येकाला बदल करण्याची संधी मिळाली पाहिजे. काहीतरी जीवन पद्धती आपल्याकडे  परंपरेने आलेली आहे.  मी त्याच्यात बदल न करता तशीच्या तशीच ती पाळायची? का मला त्याच्यात बदल करायचा अधिकार  आहे?  तर मला बदल करायचा अधिकार आहे असं वाटलं पाहिजे. त्याच वेळी तोपर्यंत जी आलेली जीवन पद्धती ती आपल्याला स्वीकारायला लागते. पण तशीच स्वीकारली पाहिजे असं बंधन आपल्यावरती नाही. ज्ञान प्रबोधिनी त्यातल्या त्यात बदलायला अवघड असे सगळे संस्कार पद्धती आहे त्याच्यात धर्मनिर्णय मंडळाच्या प्रेरणेने आपण पोथ्यांची पुनर्मांडणी करू असं म्हटलं. हळूहळू त्या पोथ्यांचा स्वीकार होत आहे.  तो बदल समाजाने स्वीकारणे म्हणजे जीवन पद्धतीत बदल होत जाणं.  आणि ते आपण घडवतोय, त्यामुळे आपण समाजातले घटक कारण आहोत आणि जीवन पद्धती हा त्याचा परिणाम आहे हा सांगण्याचा मुद्दा होता.  अगदी सुरुवात झाली तेव्हा समाजानेच जीवन पद्धती निर्माण केली आणि आजसुद्धा समाज बदल करायचं ठरवतो आणि त्याप्रमाणे समाजात बदल होतात. समाजातल्या काही व्यक्ती बदल करायचं आधी ठरवतात. प्रश्नोत्तरे – समाज प्रामाण्य बुद्धी म्हणजे काय  आता याच्याशी संबंधित असा तिसरा प्रश्न आलेला आहे…   पहिले दोन्ही व्हाट्सअप वरती आले होते. एकाच व्यक्तीने विचारले होते. दुसरा आणखी एकाने विचारलेला होता की समाज प्रामाण्य बुद्धी म्हणजे काय ? एखाद्याने बदल करायचा ठरवला आणि समाजाने त्याला विरोध केला की हे चूक आहे ! तर मग समाजातले सगळे जण चूक आहे असं म्हणतात तर ते आपण स्वीकारायचं म्हणजे समाज प्रामाण्य बुद्धी आहे का? आधीच्या प्रश्नाशी संबंधितच आहे..  समाज प्रामाण्य बुद्धी म्हणजे अर्थशास्त्रात ज्याला डिमांड आणि सप्लाय म्हणतात. मागच्या वेळी ते शब्द मी वापरले होते की समाजाची मागणी काय आहे त्याप्रमाणेच आपण वागायचं. आपण पुरवठा करायचा. असे वागायचे म्हणजे समाज प्रामाण्य? का समाजाची गरज काय आहे ती गरज ओळखून त्याप्रमाणे पुरवठा करायचा म्हणजे समाज प्रामाण्य? समाजातल्या अनिष्ट रूढी, चुकीच्या रूढी अंधश्रद्धा सगळेजण मानतात म्हणून मी त्या मानायच्या? याला समाजप्रामाण्य म्हणायचं की हा समाजातला दोष आहे –  हा दूर केला पाहिजे म्हणून आपण पुढाकार घेऊन तो बदल करायला सुरुवात करायची?  याला समाज प्रामाण्य म्हणायचं तर, मागणी प्रमाणेच पुरवठा करू असा विचार न करता गरज काय आहे ती ओळखू आणि पुरवठा करू असं म्हटलं पाहिजे.  गरज ओळखण्यासाठी आपल्याला आपली विवेक बुद्धी वापरावी लागते. त्यामुळे समाज प्रामाण्य वृत्ती आपल्यामध्ये निर्माण करायची असेल तर समाजाचे निरीक्षण करणे,  त्याच्यात काय आवश्यक आहे ? काय नाही ? याचा स्वतंत्रपणे विचार करणे,  आणि आपण विवेकाने ठरवणे.  असे त्या समाज

देशकारण करणे आणि करविणे Read More »

आम्ही राष्ट्राला देव मानणारे होऊ

आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला – भाग १ टीप – मा. श्री. गिरीश बापट यांच्या व्याख्यानाचे खाली दिलेले शब्दांकन स्वयंचलित पद्धतीने केलेले आहे. त्यात शुद्धलेखनाच्या व वाक्यरचनेच्या चुका असू शकतात. कृपया नोंद घ्यावी. आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला २०२४ – भाग १ – आम्ही राष्ट्राला देव मानणारे होऊ आध्यात्मिक राष्ट्रयोग या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाला आपण सुरुवात करत आहोत. आजच्या रविवारपासून पुढचे तीन रविवार ही व्याख्यानमाला चालू राहणार आहे. व्याख्यान चालू असताना कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये ते प्रश्न टंकित करावेत. व्याख्यान संपल्यानंतर ते सगळे प्रश्न एकत्र पाहून पुढच्या व्याख्यानाच्या वेळी त्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील. व्याख्यान चालू असताना किंवा व्याख्यान संपल्यावर प्रश्नोत्तरांचे सत्र अपेक्षित नाही आहे. त्यामुळे ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी ते अवश्य चॅट बॉक्स मध्ये विचारून ठेवा. पुढच्या रविवारी त्यांची उत्तरे मिळतील. पार्श्वभूमी ‘राष्ट्रयोग’ या विषयावरती पहिल्यांदा प्रबोधिनीच्या दुसऱ्या भवितव्य लेखामध्ये २०१२ साली म्हटलेले आहे की, राष्ट्रविचाराला छेद देणारे जे आधुनिक विचारप्रवाह आहेत, त्याला उत्तर म्हणून आध्यात्मिक राष्ट्रयोगाची मांडणी प्रबोधिनीमध्ये आपण करायला पाहिजे. हे २०१२ साली म्हटलं; पण त्याच्यावर कोणी अभ्यास करायचा, कसा अभ्यास करायचा, असं काही ठरत नव्हतं आणि त्यामुळे त्याच्यावर पहिली व्याख्यानमाला व्हायला २०१९ साल उजाडलं. ऑगस्ट, सप्टेंबर आणि नोव्हेंबर २०१९ मध्ये तीन व्याख्याने झाली. पहिलं व्याख्यान ‘राष्ट्रविचाराला छेद देणारे आधुनिक विचार प्रवाह’ या विषयावरती झालं. राष्ट्राची गरजच नाही, राष्ट्र कालबाह्य झाले, असे हे आधुनिक विचारप्रवाह मांडतात, पण आपल्याला जर प्रबोधिनी मध्ये ‘राष्ट्रासाठी काम करणे’, हे मुख्य उद्दिष्ट असेल तर या विचारप्रवाहांची दखल घ्यायला पाहिजे. हे विचार प्रवाह काय आहेत, त्यातले मुद्दे काय आहेत, असं समजून घेणारे पहिलं व्याख्यान झालं. दुसरं व्याख्यान ‘राष्ट्रकारणाची विविध अंगे’ या विषयावरती झालं. राष्ट्रकारण करायचं म्हणजे काय करायचं ? नेमकं कुठल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये काम केलं पाहिजे ? आज कोण काम करते ? त्या कामाच्या मर्यादा काय आहेत, त्याची बलस्थान काय आहेत ? असं दुसरं व्याख्यान झालेलं होतं. ही दोन व्याख्याने प्रस्तावनेची झाल्यानंतर मग ‘आध्यात्मिक राष्ट्रयोग’ या विषयावरती शेवटचं तिसरं व्याख्यान झालं. या विषयावरची पहिलीच मांडणी त्यावेळी झाली. २०१९ मध्ये हे का करावसं वाटलं ? एक तर भवितव्य लेखामध्ये म्हटलेलं आहे, त्यामुळे अनेक जणांचा आग्रह चालला होता, याच्यावरती काहीतरी आपण विचार सुरू करूया, अभ्यास सुरू करूया, बैठकी घेऊया. पण बैठकी घ्यायच्या तर आधी काहीतरी प्रस्ताव पाहिजे म्हणून हे व्याख्यान करूया अशी कल्पना निघाली. पण त्याला मुख्य गती मिळाली ती २०१८ साली माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाच्या वेळी जे भाषण झालं त्यातून. ते भाषण जून २०१८ साली झालं. ते भाषण ऐकल्यानंतर आता आपण नक्की काहीतरी मांडणी करायला पाहिजे, असं वाटायला लागलं. ते भाषण मी पूर्ण ऐकलेलं होतं. अनेक जणांनी ऐकलं असेल कारण परस्परांशी फारसा संवाद नसणाऱ्या संघटना – संघ आणि काँग्रेस. तर काँग्रेस मध्ये पण ५० वर्ष काम केलेले शेवटी राष्ट्रपती म्हणून काम केलेले असे प्रणव मुखर्जी येत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात ते काय बोलतील अशी थोडी उत्सुकता होती. फार छान भाषण झालं. अतिशय विद्वान गृहस्थ होते. त्यामुळे अतिशय चांगलं भाषण आहे. त्याचं भाषण पूर्ण लेखबद्ध झालेलं आपल्याला ते बघायला उपलब्ध आहे. (https://www.indiatoday.in/india/story/read-here-the-full-text-of-pranab-mukherjee-s-speech-at-rss-event-1254156-2018-06-07 ) त्या भाषणाच्या शेवटी शेवटी त्यांनी “राष्ट्रवाद आणि देशभक्ती यांची तुलना केली. Nationalism चं भाषांतर मराठीमध्ये राष्ट्रवाद करतो आणि patriotism चं भाषांतर आपण ‘देशभक्ती’ असं करतो. त्यांनी असं म्हटलं की, ‘राष्ट्रवाद’ हा थोडासा एकांगी आहे, अतिरेकी आहे. सर्व समावेशक असा तो नाहीये. लोकांना वगळणारा आहे आणि बऱ्याच देशांमध्ये किंवा बऱ्याच विद्वानांनी राष्ट्रवादामध्ये आपपरभाव हा अतिशय आवश्यक आहे. आपले कोण आणि परके कोण, हा फरक करता आला पाहिजे, असं त्याच्यामध्ये आग्रहाने सांगितलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवाद Nationalism पेक्षा ‘घटनानिष्ठ देशभक्ती’ (constitutional patriotism) हे मी मानतो आणि त्याची आज देशामध्ये जास्त गरज आहे” असं त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं. म्हणजे आपल्या देशाची संस्कृती काय, इतिहास काय, याचा विचार न करता आता ‘India that is Bharat’ या राज्यामध्ये जी घटना आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारलेली आहे, त्या घटनेशी एकनिष्ठ राहणं आणि या देशातल्या सगळ्या लोकांनी त्या घटनेप्रमाणे वागणं, ही घटनानिष्ठा म्हणजेच देशभक्ती, अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केलेली होती. मला जरा उत्सुकता वाटली की, ‘Constitutional Patriotism’ ही कल्पना कोणी मांडली. असं लक्षात आलं की, ही युरोपात मांडली गेलेली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिम जर्मनी काही काळ दोस्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली होतं आणि त्यांनी मिळून पश्चिम जर्मनीसाठी घटना तयार करून दिली. आधीचा सगळा नाझी भस्मासुराचा जो सगळा इतिहास आहे. ज्यूचं जे शिरकाण त्यांनी केलेलं होतं, तर तो इतिहास काही फार उज्जवल नाही. त्याचा अभिमान बाळगावा असं नाही, तर आता जर्मन राष्ट्र हे कशाच्या आधाराने उभं राहू शकेल, एकत्र येऊ शकेल तर जर्मनीतल्या तत्वज्ञांनी, समाजशास्त्रज्ञांनी ‘Constitutional Patriotism’ ही कल्पना मांडली. आता आपण या देशामध्ये राहतोय, या देशाची घटना आपण प्रमाण मानूया, तिच्याशी एकनिष्ठ राहूया आणि या घटनेला मानणारे सगळे आपण सर्वजण एक आहोत. ही घटना या देशात चालते तर म्हणून या देशावरती आपण प्रेम करूया, अशी ती घटनानिष्ठ देशभक्तीची व्याख्या आहे. नंतर युरोपामध्ये सगळ्या युरोपची एक संसद तयार झाली आणि सगळ्या युरोपातल्या देशांनी आपापली राष्ट्रीय अस्मिता थोडीशी कमी करावी आणि युरोपची अस्मिता तयार व्हावी. त्या युरोपच्या संसदेसाठी सगळ्या युरोपची म्हणून सुद्धा घटना तयार झाली आणि त्यामुळे राष्ट्राच्या पलीकडे जाण्यासाठी ही घटनानिष्ठ देशभक्ती याचा उपयोग होईल आणि तो केला पाहिजे, असं पाश्चात्य देशांमधले घटनातज्ञ, समाजशास्त्रज्ञ आता बोलत आहेत आणि प्रणव मुखर्जी यांनी त्याचाच पुरस्कार केला. त्यामुळे याच्यापेक्षा आपल्याला काहीतरी वेगळा विचार मांडण्याची गरज आहे, असं मला वाटतं. थोडंसं मागे जर का जायचं झालं, म्हणजे माझ्या या राष्ट्रासंबंधीच्या विचाराला कशी सुरुवात झाली? तर हा २०१८ मधला प्रसंग, त्यामुळे राष्ट्रयोगावरती बोलूया, असं मी ठरवलं; पण याच्यात घटनानिष्ठ देशभक्ती म्हटलंय. तसेच देशभक्तीचा दुसरा एक प्रकार म्हणजे प्रादेशिक राष्ट्रवाद ‘Territorial Nationalism’ आणि आता यूपीएससीच्या परीक्षांची सगळी गाईड्स मीपाहतो, त्याच्यामध्ये भारताने आता ‘Territorial Nationalism’ स्वीकारलेला आहे वगैरे अशी सुद्धा विधाने असतात. १९७२ साली प्रबोधिनी मध्ये अभ्यास शिबिर झालं. आपल्याकडच्या अभ्यास शिबिराच्या पद्धतीमध्ये प्रत्येकाने चार दिवसाच्या, पाच दिवसाच्या शिबिरात जे काही वाचलेले त्यातला एखादा विषय घेऊन बोलायचं असतं. त्यावेळी मी प्रादेशिक राष्ट्रवादावरती पहिल्यांदा बोललो होतो की, एका प्रदेशात राहणारे सगळे लोक त्यांचं राष्ट्र एक आहे, मग त्यांचा धर्म काही असू दे, भाषा काही असू दे, संस्कृती काही असू दे, वंश काही असू दे. ते एका देशात राहतात. त्या देशावरती एकच शासन चालते तर असे एका देशात राहणारे सगळेजण, त्यांचं एक राष्ट्र, अशी ती प्रादेशिक राष्ट्रवादाची कल्पना. १९७१ सालीच पाकिस्तान फुटलेला होता. पश्चिम पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान वेगळे झालेले होते. त्यामुळे पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानातले सगळे लोक एका देशाचे म्हणजे त्यांनी एका राष्ट्राशी आपल्या एकनिष्ठ राहायला पाहिजे. पण आमची संस्कृती वेगळी, आमची भाषा वेगळी आहे, आम्ही काय पश्चिम पाकिस्तानची उर्दू भाषा मानणार

आम्ही राष्ट्राला देव मानणारे होऊ Read More »