प्रकट चिंतन

११. नव्या पर्वासाठी राष्ट्रजीवनाची पुनर्मांडणी

राष्ट्र पुन्हा उभविणे : देशजीवनाच्या विविध क्षेत्रांत आवश्यकतेप्रमाणे नेतृत्वाची जबाबदारी घेतील असे कार्यकर्ते घडवणाऱ्या शिक्षण-प्रणालीची निर्मिती करणे व ती वापरात आणणे हे प्रबोधिनीच्या घटनेतील पहिल्या सहा परिच्छेदांचे सार आहे. ते प्रबोधिनीचे सर्वात नजिकचे उद्दिष्ट आहे. नेतृत्व विकसन व शिक्षणप्रणालीची निर्मिती ज्यासाठी करायची ती पुढची सर्व उद्दिष्टे ‘स्वदेशात विचार प्रबोधन व कार्य प्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट […]

११. नव्या पर्वासाठी राष्ट्रजीवनाची पुनर्मांडणी Read More »

१०. आयुष्यभर राष्ट्राघडणीच्या कामाची प्रेरणा

कृतज्ञता बुद्धी आणि जाणती कार्यशक्ती : दोन-चार बौद्धिक कसोट्यांवर उच्च गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे, त्यांनी दोन-चार सार्वत्रिक परीक्षा व स्पर्धा परीक्षांमध्ये उच्च यश मिळविण्यासाठी, व त्यांना चार-दोन लक्षवेधक प्रकल्प करता येण्यासाठी, चार-सहा वर्षे शिक्षण योजणे ही प्रबोधिनीच्या कामाची अगदी सुरुवातीची पायरी होती. प्रबोधिनीच्या घटनेच्या सहाव्या परिच्छेदात विद्यार्थ्यांचे प्रबोधिनीशी निर्माण झालेले विद्याव्रताचे नाते आयुष्यभराचे ठरावे असे उद्दिष्ट

१०. आयुष्यभर राष्ट्राघडणीच्या कामाची प्रेरणा Read More »

९. अभ्यास, प्रयोग आणि प्रतिभेतून शिक्षणप्रणालीची निर्मिती

स्वीकार, रूपांतर आणि प्रतिभा : प्रबोधिनीत रूढ असलेल्या दैनंदिन उपासनेची रचना हळूहळू विकसित होत गेली आहे. तिच्यामधले विरजा मंत्र थिऑसॉफिकल सोसायटीच्या प्रार्थनेतून घेतले आहेत. सामूहिक उपासना करण्याची पद्धत गांधीजींच्या आश्रम-प्रार्थनेच्या प्रभावामुळे स्वीकारली आहे. या स्वीकारशीलतेबरोबरच गायत्री मंत्राबरोबर उच्चारायच्या सात व्याहृती म्हणजे जणू सप्तलोक असा अर्थ नवीन दृष्टीने मांडून विचाराची वेगळी दिशा दाखविली आहे. अशा सर्व

९. अभ्यास, प्रयोग आणि प्रतिभेतून शिक्षणप्रणालीची निर्मिती Read More »

८. कर्तृत्वाला बांधिलकीचा कणा

विवेकानंदांचा राष्ट्रधर्म : स्वामी विवेकानंदांनी युरोपमधून परतल्यावर मद्रास येथे झालेल्या स्वागत सोहळ्यात ‘माझ्या मोहिमेची योजना’ या विषयावर एक व्याख्यान दिले होते. या व्याख्यानाचा शेवट करताना देशभक्तीसाठी आवश्यक अशा तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. देशवासीयांची दुर्दशा पाहून ती दूर करण्यासाठी हृदयाची तळमळ ही पहिली गोष्ट. दुर्दशा दूर करण्यासाठी मार्ग शोधून काढणे ही दुसरी गोष्ट. त्या मार्गाने

८. कर्तृत्वाला बांधिलकीचा कणा Read More »

७. आस्थेला कर्तृत्वाची जोड

कार्यकर्ता किंवा नेता कार्यक्षम असला पाहिजे. यासाठी त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेच्या जोडीला पुढील पाच गुण आवश्यक आहेत असे प्रबोधिनीच्या घटनेत सांगितले आहे. अभ्यासशीलता : एखाद्या विषयाचा १) सर्व बाजूंनी अभ्यास करणे, २) त्याच्या मुख्य गाभ्याचा आणि शाखा-उपशाखांचा अभ्यास करणे, ३) मुळापासून अभ्यास करणे, ४) अनुभव घेऊन व समजून घेऊन अभ्यास करणे, ५) इतर अभ्यासकांचे अनुभव व मते

७. आस्थेला कर्तृत्वाची जोड Read More »

६. समाजाला वगळून एकट्या व्यक्तीचा विकास अशक्य

बांधिलकी आणि कार्यक्षमता: दहा-बारा वर्षांपूर्वी प्रबोधिनीतील तेव्हाच्या महाविद्यालयीन सदस्यांमध्ये एक वाद रंगलेला होता. समाजातील विविध कामे, कार्यकर्ते व संस्था यांना भेटी द्यायला ते जायचे. भेटीहून परत आल्यानंतर प्रत्येक वेळी वाद व्हायचा की ‘कमिटमेंट’ (म्हणजे ध्येयाशी निष्ठा किंवा बांधिलकी) आधी निर्माण झाली पाहिजे की ‘कॉम्पिटन्स्’ (कार्यक्षमता) आधी निर्माण करायला पाहिजे? भेट द्यायला जाणाऱ्याचा स्वभाव आणि भेट

६. समाजाला वगळून एकट्या व्यक्तीचा विकास अशक्य Read More »

५. कृतिशील बुद्धीला विकसित व्यक्तिमत्वाचे कोंदण

एका आंतरराष्ट्रीय संघटनेचा अनुभव ‘मेन्सा’ नावाची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. चाळीस-पंचेचाळीस देशांमध्ये तिच्या शाखा आहेत. भारतीय मेन्साचे कार्यालय प्रबोधिनीच्या पुण्यातील वास्तूमध्ये १९७२ पासून आहे. भारतीय मेन्साचा अध्यक्ष म्हणून दहा-बारा वर्षे वेगवेगळ्या देशातील मेन्सातर्फे प्रकाशित होणारी नियतकालिके माझ्याकडे सस्नेह भेट म्हणून येत असतात. समाजातल्या प्रातिनिधिक दहा हजार लोकांनी बुद्धिमत्ता चाचणी दिली तर त्यांतील गुणानुक्रमे पहिल्या दोनशे

५. कृतिशील बुद्धीला विकसित व्यक्तिमत्वाचे कोंदण Read More »

४. बुद्धी कुशाग्र व्यापक : राष्ट्रीय वृत्तीच्या नेतृत्वासाठी

समुद्र आणि कालव्यातील झडपा (लॉक) : १९९१ साली एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात एका नामवंत शिक्षण तज्ज्ञांना मुख्य भाषण द्यायला निमंत्रित केले होते. त्यांच्या व्याख्यानाचे शीर्षक होते ‘Rising Tide Raises All Ships’. समुद्राला भरती आली की छोट्या होडक्यापासून तेलवाहू टँकरपर्यंतच्या सर्व आकाराच्या जहाजांची पातळी वर जाते असा त्या शीर्षकाचा अर्थ. प्रज्ञावंतांच्या शिक्षणात सापडलेली प्रज्ञा-विकासाची सूत्रे सार्वत्रिक शिक्षण

४. बुद्धी कुशाग्र व्यापक : राष्ट्रीय वृत्तीच्या नेतृत्वासाठी Read More »

३. धुराच करोनि सोडणे I कार्यकर्ते अनेक II

सूर्याजी मालुसरे व आनंदराव गुजर : शिवकालातील दोन प्रसंगांवर अनेक पोवाडे आणि कविता लिहिल्या गेल्या आहेत. पहिला प्रसंग आहे कोंडाणा जिंकण्याचा आणि दुसरा प्रसंग आहे प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांच्या बलिदानाचा. कोंडाणा जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांची होती. पण लढाईत त्यांचा मृत्यू झाल्यावर मराठा फौजेची पळापळ सुरू झाली. त्यावेळी सूर्याजी मालुसरे यांनी पळणाऱ्या मावळ्यांना थोपवले,

३. धुराच करोनि सोडणे I कार्यकर्ते अनेक II Read More »

२. आत्मिक शक्तीचे सामाजिक प्रकटीकरण म्हणजे नेतृत्व

भारताच्या भवितव्याचे कर्णधार : १) भारत हा समृद्ध देश व्हावा. प्रत्येक भारतीय कुटुंबात समृद्धी यावी. २) भारतात सर्व प्रकारची उत्पादने तयार करणारे उद्योग असावेत. या उद्योगांनी कोणाही व्यक्तीचे, समाज-गटाचे व निसर्गाचेही शोषण न करता उत्पादन करावे. ३) भारतातील शेती सर्वांना भरपूर अन्न, उद्योगांना कच्चा माल व अनेकांच्या हातांना सन्मानाचे काम देणारी असावी. ४) भारतात सर्वांना

२. आत्मिक शक्तीचे सामाजिक प्रकटीकरण म्हणजे नेतृत्व Read More »