संत्रिका

परिवर्तन का व कसे? (भाग १)

लेख क्र. ७ ११ जून २०२५ मागील दोन लेखात आपण ‘वटपौर्णिमा व वटसावित्री व्रत’ याविषयी माहिती बघितली व आजच्या काळानुसार व्रतात काय व कसे बदल आवश्यक आहेत ते बघितले. परिवर्तनाच्या या हेतूला अनुसरून श्री. यशवंतराव लेले व प्रज्ञा जेरे (अंजळ) यांनी ‘धर्मविधींच्या अंतरंगात’ हे पुस्तक लिहिले व ज्ञान प्रबोधिनीने प्रकाशित केले. या पुस्तकातील ‘परिवर्तन का व कसे?’ हा भाग येथे देत आहोत. धार्मिक विधीतील परिवर्तन केव्हा व कधीपासून सुरु झाले? त्यासाठी कोणी कोणी काम केले? धर्मनिर्णय मंडळाची स्थापना कशी व कधी झाली? इ. प्रश्नांचे विवेचन या लेखात आले आहे. हा परिवर्तनाचा विषय समजावून घेतला की नंतर आपण तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषदेबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. धर्मामधे स्थल-कालातीत तत्त्वांप्रमाणेच, स्थलकालसापेक्ष सत्यासारखे तत्त्व एका ठिकाणी लागू असून अन्य कोठे ते लागू पडत नाही असे नाही याला म्हणतात ‘स्थलनिरपेक्ष’. अमक्या वेळी हे तत्त्व योग्य आणि अन्य वेळी अयोग्य याचा अर्थ ‘कालनिरपेक्ष’. आचारधर्म मात्र जागोजागी, वेळोवेळी बदलताना दिसतात व तसे ते पुढेही दिसणार याचा अर्थ ‘स्थलकालसापेक्ष’. धर्मविधींमधे स्थलकालानुसार परिवर्तन करण्याची काय आवश्यकता आहे, हे परिवर्तन करण्याला आधार कोणता व ते कसे केले पाहिजे हे समजावून घेतले पाहिजे. धार्मिक क्षेत्रामधे परिवर्तनीयतेची परंपरा महाराष्ट्रात ज्ञानदेवांच्या काळापासून चालत आलेली आहे. गीतेसारख्या ग्रंथाचा मायमराठीत सर्वजनसुलभ असा आविष्कार करून ज्ञानदेवांनी या परंपरेचा पाया घातला आहे. त्यांच्या अवती-भवती अठरापगड जातींच्या संतांची मांदियाळी उभी राहिली व त्यात स्पृश्यास्पृश्यतेची रूढी अर्धमेली होऊन गेली. मग संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास, इत्यादींनी मराठी भूमीवर औदार्याचे, माणुसकीचे गंगाजल शिंपून तिची मशागत केली. समर्थ रामदासांनी भेटो कोणी एक नर । धेड महार चांभार । राखावे तयाचे अंतर। या नाव भजन ।। (समर्थ रामदासांच्या सवाया) अशा शब्दांत भक्तिमार्गातील समतेचा डांगोरा पिटला, तर छळाबळाने बाटवलेल्यांना पुनश्च स्वधर्मात स्वीकारून छत्रपती शिवरायांनी आणखी पुढचे पाऊल टाकले. पेशवाईत राजकीय प्रगती झाली पण काहीसे सामाजिक विषमतेचे दृश्यही दिसले. इंग्रज राजवटीच्या आरंभीच श्री. बाळशास्त्री जांभेकरांनी धर्मभ्रष्टांना पुन्हा स्वधर्मात घेण्यास प्रारंभ केला. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापून नवीन दृष्टीने, नवीन पद्धतीने धर्मसंस्कार करण्यास सुरुवात केली. धर्मसंस्कारांमधे त्यांनी लोकभाषेचा वापर करून सुलभता आणली. पुरोहित वर्गाचे महत्त्व कमी करून समतेची चळवळ उभी केली. न्यायमूर्ती रानडे यांनी संतपरंपरेचा धागा पकडून पारमार्थिक लोकशाहीची परंपरा धर्मक्षेत्रात आणण्यासाठी प्रार्थना समाजाची स्थापना केली आणि दयानंद सरस्वतींच्या परिवर्तनवादी आर्य समाजासही पाठिंबा दिला. श्री शाहू छत्रपतींनीही दयानंद सरस्वतींना मोठा पाठिंबा दिला. कोल्हापुरात सत्यार्थप्रकाश या दयानंद सरस्वतींच्या ग्रंथाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केले. धार्मिक बाबतीतील सुधारणांचे प्रयत्न अशाप्रकारे चालू असतानाच पाश्चात्य पद्धतीने शिक्षण घेतलेल्या काही नवशिक्षितांनी भारतीय संस्कृती, धर्म, आचार-विचार यांना कनिष्ठ किंवा अगदी टाकाऊ समजण्यास सुरुवात केली होती. तरीही काळानुसार आवश्यक ते फेरबदल करून योग्य तो आचारधर्म चालू ठेवण्याचे औचित्य दाखवणारा वर्गही समाजात होता. धर्मातील दोन प्रमुख भाग म्हणजे तात्त्विक धर्म आणि आचारधर्म. सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती, इ. तत्त्वे स्थलकालातीत असली तरी ती तत्त्वे व्यवहारात उतरवण्याची साधने म्हणजे आचारधर्म हा स्थलकालसापेक्षच असतो हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील परिवर्तनवादी पंडितांनी १९३४ मधे ‘तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषदे’ची स्थापना केली. या परिषदेचे बहुतेक संस्थापक हे हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यास केलेले व काहीजण इंग्रजीचाही अभ्यास केलेले असे होते. त्यांचा मुख्य विचार असा – ‘हिंदू धर्मात अनेक स्मृती रचल्या गेल्या याचे कारण त्या त्या परिस्थितीला आवश्यक असे बदल मूळच्या आचारधर्मात करावे लागतात. (उदा. इस्लाम भारतात आल्यानंतर जबरदस्तीने धर्मांतरित झालेल्यांना पुन्हा स्वधर्मात घेण्यासाठी देवल स्मृतीचा जन्म झाला.) आचारधर्मातील परिवर्तनाची ही आवश्यकता लक्षात घेऊन आजच्या काळातही ते करण्यात आले पाहिजे.’ समाजामधे अशा परिवर्तनवादी लोकांप्रमाणेच स्थितिवादी म्हणजे ‘जुने मोडू नये आणि नवे करू नये’ असे म्हणणारेही काही लोक असतात. त्यांना सनातनी म्हणतात. त्यांची धर्मनिष्ठा खोटी नसते. आपल्या धर्ममतांशी ते प्रामाणिकच असतात. तसे लोक त्या काळीही होते. या सनातनी मंडळींनी आपल्या धोरणांत काही लवचिकता ठेवली असती तर महाराष्ट्रात आहे त्यापेक्षा अधिक परिवर्तन होणे शक्य होते. या काळी सनातनी मतांचे समर्थन करणारे लेखन सुरू झाले. हे लेखन परिवर्तनास प्रतिकूल होत आहे हे पाहून पं. नारायणशास्त्री मराठे यांनी धर्मकोशाची रचना करण्याचे ठरवले. पं. नारायणशास्त्री मराठे हे परिवर्तनवादी पक्षाचे होते व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे त्यांचे उजवे हात! इ.स. १९२७ मधे प्रयाग येथील कुंभमेळ्याच्या प्रसंगी पं. मदनमोहन मालवीय यांनी बोलावलेल्या पंडित परिषदेस पं. नारायणशास्त्री मराठे व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे उपस्थित राहिले व त्यांनी शास्त्रचर्चेत परिवर्तनवादी पक्षाची भूमिका समर्थपणे मांडली. श्री. रा. स. भागवतांच्या पुढाकाराने ठाणे येथे ७, ८ एप्रिल १९३४ या दोन दिवशी तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषदेचे प्रथम अधिवेशन भरले. म. म. पाठकशास्त्री हे अध्यक्षस्थानी होते. या पहिल्याच परिषदेने ‘वेद’ हे अपौरुषेय नव्हेत तर मनुष्यकृतच असल्याचा स्पष्ट निर्णय केला. पुणे येथे गीताधर्म मंडळात परिषदेचे दुसरे अधिवेशन भरले ते २७ डिसेंबर १९३५ या दिवशी! याच्या आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे अस्पृश्यता निवारणावर या अधिवेशनात विशेष भर देण्यात आला. डॉ. कुर्तकोटी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ४ ते ६ जून १९३६ रोजी नगर येथे स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन झाले. या परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. नानासाहेब सप्तर्षी यांनी आपल्या भाषणात, ‘जुनी परंपरा न सोडता आजच्या आचारांत फरक कसा घडवून आणावा याचा विचार करण्यासाठी हे अधिवेशन भरवण्यात आले आहे’ असे सांगितले. समाजधारणा होऊन उत्कर्ष साधावा यासाठी श्रुती, स्मृती आणि सदाचाराचे अनुषंगाने आचार परिवर्तनाचे धोरण नगरला निश्चित केले गेले. १६ ऑक्टोबर १९३८ या दिवशी लोणावळ्यात चौथे अधिवेशन पार पडले. त्याचेही अध्यक्ष स्वामी केवलानंदच होते. या अधिवेशनात जे स्वागतगीत म्हणण्यात आले ते मोठे अर्थपूर्ण होते – श्रुती – स्मृतींचे मंथन करुनी, तत्त्वामृत जे देति अम्हातें, समाजधारण, समाजोन्नती, ध्येय हेच धर्माचे मानिति । धर्मां साधन मानुनि करिती, परिवर्तन जे आचारांचे, तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी, नाम असे हे सार्थ तयांचे ।। या अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात स्वामी केवलानंद सरस्वतींनी परिवर्तनवाद्यांच्या एकत्र काम करण्याच्या आवाहनास प्रतिसाद न देता सनातन्यांनी ‘वर्णाश्रम-स्वराज्य-संघा’ची स्थापना करून सवता सुभा स्थापल्याबद्दल व त्यात परिवर्तनवाद्यांना प्रवेश देऊ नये असे ठरवल्याबद्दल खेद व्यक्त केला. यानंतर ‘उपनयनादि-संस्कार’ यावर चर्चा झाली. याच अधिवेशनात तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषदेने ‘धर्मनिर्णय मंडळ’ हे नाव धारण केले व संस्थेची संक्षिप्त घटना निर्माण करून तिलाही मान्यता देण्यात आली. आता वर्षातून एक अधिवेशन घेण्याची जुनी कार्यपद्धती बदलून वर्षभर कार्यरत राहाण्याच्या हेतूने कार्यकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली. १९३९ पासूनच मंडळाचे कार्यवाह तर्कसांख्यतीर्थ पं. रघुनाथशास्त्री कोकजे यांनी काम पाहिले. यांचे पूर्ण नाव रघुनाथ गोपाळ कोकजे. ते वाईच्या प्राज्ञपाठशाळेत शिकले. वेदशास्त्रसंपन्न नारायणशास्त्री मराठे यांचे ते विद्यार्थी. पुढे ते लोणावळ्यातील कैवल्यधाम या योगशास्त्रासाठी काम करणाऱ्या संस्थेत तत्त्वज्ञान हा विषय शिकवत. अध्यापन, ग्रंथसंशोधन याबरोबर आयुष्यभर त्यांनी धर्म निर्णय मंडळाच्या प्रचाराचे, संस्कार कार्याचे काम केले. यांनी ठिकठिकाणच्या आपल्या भाषणांमधून सामूहिक प्रार्थनेच्या प्रचारास प्रारंभ केला. उपनयन, विवाह व संध्येची छोटी पुस्तिका प्रकाशित झाली. अशा प्रकारे विचारमंथनास कृतीचीही जोड मिळू लागली. यानंतरच्या अधिवेशनांमधे शास्त्रचर्चेसाठी एक सत्र राखून ठेवून खुल्या सत्रात सर्वसामान्य जनतेस मंडळाची भूमिका

परिवर्तन का व कसे? (भाग १) Read More »

पर्यावरण परिरक्षणाची वटसावित्रीची पूजा

९ जून २०२५ पर्यावरण परिरक्षणाची वटसावित्रीची पूजा ज्ञान प्रबोधिनीच्या ‘संत्रिका’ विभागाने संस्कृतच्या प्रसारासाठी जसे प्रयत्न केले त्याचप्रमाणे धर्मनिर्णय मंडळाच्या व प्रबोधिनीच्या ‘कालानुकूल बदलांच्या परंपरेला’ साजेशा अनेक संस्कारांच्या सार्थ पोथ्या तयार केल्या आहेत. त्यायोगे केल्या जाणार्‍या संस्कारामागचा मूळ अर्थ, मूळ उद्देश सर्वसामान्यांच्या ध्यानात येईल. व्यक्तींनी कोणतीही पूजा अथवा संस्कार त्यामागचा उद्देश समजून करणे महत्त्वाचे असते. अशीच एक पूजा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेला येणारे वटसावित्री व्रत. उद्या असणाऱ्या वटपौर्णिमेचे औचित्य साधून संत्रिकेच्या सुवर्ण-महोत्सवानिमित्त सादर होणार्‍या लेख मालिकेमधील आजच्या लेखामध्ये प्रबोधिनीचे ज्येष्ठ संस्थापक सदस्य, प्रशालेचे पहिले प्राचार्य व नंतर संत्रिकेचे प्रमुख व ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्रा. यशवंतराव लेले यांनी केलेल्या वटपौर्णिमेच्या पोथीची प्रस्तावना व वडाच्या झाडाचे महत्त्व सांगितले आहे. सध्या या व्रताबद्दल निरनिराळे विचार मांडले जातात परंतु प्रस्तुत लेखातून या विचारांना निश्चितच योग्य दिशा मिळेल. ज्येष्ठ पौर्णिमेला पतिव्रता सावित्रीने आपला पती सत्यवान याची यमराजाच्या हातून सुटका करून त्याचे प्राण परत मिळवले. हा प्रसंग वटवृक्षाखाली घडला. म्हणून ही पौर्णिमा ‘वटपौर्णिमा’ नावाने ओळखली जाते, तसेच या पौर्णिमेला केल्या जाणार्‍या व्रताला ‘वटसावित्री व्रत’ म्हणतात. परंपरेने चालत आलेल्या वटसावित्रीच्या पूजेत पाटावर वटवृक्ष, सावित्री, सत्यवान यांचे चित्र काढून त्याची यथासांग पूजा करण्यास सांगितले आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचीच पूजा करणे हे उत्तम ! थोडे दूर जावे लागले तरी प्रत्यक्ष वटवृक्षाची हवा घ्यावी. वडाच्या फांद्या तोडून त्या फांदीची पूजा करण्याची पद्धत कधी, कोणी सुरू केली ते माहीत नाही. पण आज अनेक शिक्षित महिलाही या पद्धतीने वडाच्या फांदीची पूजा करताना दिसतात. याचे कारण धर्माचे रहस्य हरवले आहे. सावित्री ही रत्नपारखी आहे. तिने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आईबाप अन् देवगुरू यांच्या सूचनांकडे लक्ष न देता माळ घातली. या तिच्या कृतीतून केवढा आत्मविश्वास व्यक्त होतो ! पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम ती आपल्या पर्यावरणाच्या ज्ञानाने, चिकाटीने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने करून दाखवते याचे विस्मरण होऊन षोडशोपचार पूजा यथासांग केली तरी त्या पूजेने काय साधेल? खरी पूजा म्हणजे काय ते आपण समजावून घेतले पाहिजे. पूजा म्हणजे काय ? – ‘पूजा’ हा शब्द वेदात नाही. तो शब्द तमिळ असावा. ‘पू’ म्हणजे फूल व ‘जा’ हा प्रत्यय ‘कृती’ अशा अर्थाचा आहे. ‘फुलाने करावयाची कृती म्हणजे पूजा.’ ज्यांच्याबद्दल प्रेम, आदर, कृतज्ञता या भावना व्यक्त कराव्याशा वाटतात त्या फुलाच्या समर्पणाने व्यक्त करणे म्हणजे पूजा करणे. ऋर्षांनी आपल्याला आज्ञा दिली आहे. ‘मातृदेवो भव ।’ आईला देव मानणारे असे व्हा. ‘पितृदेवो भव।’ वडिलांना देव मानणारे असे व्हा. ‘आचार्यदेवो भव ।’ गुरुला देव मानणारे असे व्हा. ‘राष्ट्रदेवो भव ।’ राष्ट्राला देव मानणारे असे व्हा. म्हणजेच या सर्वांची आदराने पूजा करा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागा. फक्त माणसांचीच नाही तर पशुपक्षांचीही आपल्याकडे पूजा केली जाते. तसेच निर्जीव वस्तूंचीदेखील आपण पूजा करतो. आपली रोजच्या वापरातील वाहने, यंत्रे या सर्वांची पूजा करतो. आपल्याला सेवा देणाऱ्या सर्व वस्तूंची, व्यक्तींची आपण काळजी घेणे, त्यांची स्वच्छता, शोभा, उपयुक्तता टिकेल, वाढेल अशी कृती करणे हाच पूजेचा खरा अर्थ आहे. याबरोबरच ‘वृक्षदेवो भव’ असेही म्हणता येईल. म्हणजेच वृक्षाला देव मानणारे असे व्हा. जो आपल्या दिव्य गुणांचे व सामर्थ्याचे दान करतो तो देव. वृक्ष हे खरोखरीच सत्पुरुष वा देव आहेत असे एका सुभाषितात म्हटले आहे. छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे । फलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषा इव ।। जे स्वतः उन्हात उभे राहून दुसऱ्यांना सावली देतात. ज्यांची फळेदेखील दुसऱ्यांकरिता असतात असे वृक्ष म्हणजे सत्पुरुषाप्रमाणेच आहेत. वृक्षाचा हा दातृत्वाचा गुण आपण घेतला पाहिजे. तो आपल्या आयुष्यात उतरवला पाहिजे. म्हणूनच याच भावनेने आपण वडाची पूजा करावी. वडाला पाणी घालणे, प्रसंगी पार बांधून त्याचे रक्षण करणे, पोषण करणे म्हणजेच पूजा. वडाचे महत्त्व प्रतिवर्षी देशभर सर्व भगिनींनी एकेक वडाचं रोप लावून ते वाढवत राहण्याचे संकल्प केले तर हा देश संपन्न देश होईल यात संदेह नाही. कारण, वडाचे महत्त्वच तसे आहे. नीट ऐका ! कलकत्ता विद्यापीठातला डॉक्टर दास हा मोठा प्राध्यापक. त्यानं वडाचाच अभ्यास केला. कितीतरी वर्ष त्यानं खूप मोजदाद केली. बागेतल्या भल्यामोठ्या वडाचं वय ठरवलं, पन्नास! पन्नास वर्षात त्यानं किती पानं, फळं गाळली असतील त्याचं गणितही मांडलं. त्यामुळे खताचे रूपाने शेतीचा किती लाभ होतो ते पाहिलं. अहो ! अडीच लाखांचं खत त्या एकट्या वडानं आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात शेतीला दिल्याचं दिसलं. दवाखान्यात रोग्याच्या नाकातोंडात नळ्या घातलेल्या आपण पाहातो. त्यातून प्राणवायू पुरवण्यात येतो. भारी पैशाचं काम असतं ते ! पण आपल्याला फुकटात प्राणवायू देणाऱ्या झाडाचं- वडाचं आपल्याला कुठे ज्ञान आहे ? वडापिंपळाची झाडं तर खूपच प्राणवायू देतात. त्या डॉक्टर दासांनी त्याचाही हिशोब केला आणि ते म्हणतात की पन्नास वर्षात एका वटवृक्षानं दिलेल्या प्राणवायूचं मोल भरतं अडीच लक्ष रुपये ! आपण प्राणवायू घेऊन नाकावाटे बाहेर टाकतो तो खराब झालेला वायू ! तो आसपासची हवा खराब करणारा प्राणिमात्रांनी सोडलेला वायू ही झाडं खातात अन् वाढत राहतात ! वातावरणाच्या स्वच्छतेचं हे केवढं काम वडासारखी झाडं करत असतात त्याचं तर आपल्याला भानच नसतं ! जिथं झाडं नाहीत आणि गाड्यामोटारीतून असाच खराब वायू सारखा बाहेर पडत राहतो तेथे तो माणसाच्या नाकावाटे त्याच्या छातीत जाऊन कर्करोगासारखे रोग होत आहेत आणि म्हणून काही माणसं नाकाला गाळणी लावून फिरताना दिसत आहेत. खेडेगावांत गिरण्या नाहीत, गाड्या नाहीत त्यामुळे तेथे बरे आहे. हवा ताजी आहे. शुद्ध आहे. पण ध्यानात ठेवा घराघरातून चुलींचा धूर येतो. प्राणिमात्रांनी वापरलेला खराब वायू त्यात मिसळतो. तरीही तेथली हवा ताजी राहते ती या वडासारख्या थोर वृक्षांमुळे ! वडाच्या या कामाचं मोल किती ? डॉक्टर दास यांच्या गणितानुसार पन्नास वर्षात पाच लाख रुपयांचं हवा शुद्धीचं काम एक वडच करू शकतो ! एका वटवृक्षाचे आपल्यावरील उपकार केवढे ! पन्नास वर्षात प्राणवायू, खत आणि हवेचे शुद्धीकरणाद्वारा त्यानं केलेल्या सेवेचं मोल झालं दशलक्ष रुपये ! १० लाख ! आकाशातून धावणाऱ्या ढगांमधील पाणी खेचून घेण्याचं कामही हे वृक्ष करत असतात. त्यायोगे पाऊस येतो याची किंमत किती ? फांद्या, पारंब्यांतून मिळणाऱ्या लाकूडफाट्याची किंमतही थोडी नाही. धूप थांबवून मातीचं रक्षण करण्याचं मोल काय ? उन्हाळ्यात हवेत आर्द्रता सोडून गारवा आणण्याच्या त्याच्या कर्तबगारीची किंमत किती? असं सारं काम जमेस धरलं तर एक वडाचं झाड पन्नास वर्षात आपली पंधरा लाख रुपयांची सेवा करतं ! असा लाख मोलाचा वृक्ष तोडायचा म्हणजे महापातक नव्हे का? हे व्रत जरी स्त्रियांसाठी असले तरी सर्वांनीच वडाकडं पहावं ते वैद्य म्हणून! त्याची कोवळी पानं, खडीसाखर आणि पळसाचा डिंक, वेलदोडा नि वंशलोचनासह गाईच्या दुधातून घ्याल तर धूपणीचा त्रास जाईल! मूळव्याध असो की इसब! पिकलेली पानं जाळून, ती राख तेलातून लावल्यास गुण हमखास! पक्षांना आवडणारी याची लालबुंद फळं आपणही खाल्ली तर कफापित्ताचा निकाल ठरलेला! पारंब्यांचे अंकुर वाटून पोटात घेतले की जंताचा निकाल! जखमेवर चोळताना, दातदुखीवरही चीक चालतो. आणखी एक वडाचा गुण! त्याच्या पारंब्यांचे कोवळे कोवळे अंकुर वाटून तुपात खाल्ल्याने वंशाला अंकुर फुटतो असंही म्हणतात ! (कृपया जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.) गावागावातला हा फुकटचा वैद्य! त्याला जवळपासच, घरासमोर अंतरावर जागा द्यावी.

पर्यावरण परिरक्षणाची वटसावित्रीची पूजा Read More »

Sanskrit-Sanskriti-Sanshodhika (Santrika) – Part 3

६ जून २०२५ लेख क्र. ३ भाग २ मध्ये संस्कृत मधील अभ्यास व संशोधन यावरती श्री.अर्जुनवाडकर यांनी केलेले विवेचन व काय काय करता येईल याच्याही कल्पना मांडल्या होत्या. कामाच्या उत्तम कल्पना स्फुरल्या तरी त्या पूर्णत्वास नेण्यासाठी योग्य मनुष्यबळ हवेच!  या भागात  संस्कृत मध्ये काम करण्यासाठी मनुष्यबळ का मिळत नाही? संस्कृत बद्दल आस्था का वाटत नाही? तरुण वर्ग व सर्वसामान्य संस्कृत आवडत असूनही संस्कृतकडे का आकर्षित होत नाहीत? यावर चिकित्सक चर्चा केली आहे. संस्कृतची नवीन शिक्षण पद्धत परिपूर्ण नाही; ती पंडितांना पण निर्माण करू शकत नाही आणि सर्वसामान्यांपर्यंत संस्कृत भाषेमधील माधुर्य, रसास्वाद पण पोहोचवू शकत नाही ….अर्थात असा फक्त प्रश्न निर्माण करून ते थांबले नाहीत तर त्यांनी संत्रिकेत संस्कृतसाठीचे  उपक्रम पण केले. Personnel But where are we going to get the personnel from to execute this grand plan? The old system withered as talent flowed towards the new system, which offered better scope, stability, and status. Talent is now flowing to science, commerce, and technology for the same reason, and almost all humanity subjects are today facing starvation or pulling on with the kind of clientele they are doomed to get. Subjects like Sanskrit that have little market value are faring worst in the changed order. Even scholarships and fellowships are, in recent times, failing to attract good students to Sanskrit. Who will then do the research? Sanskrit Education: A Historical Review The problem is very true and brings us to the work SANTRIKA proposes to do at the popular level. The story of Sanskrit education in the modern age is one of lack of foresight and precipitous failure on this front. A casual look at the syllabi, textbooks, and teaching methods of Sanskrit during the last century at the school, college, and university levels reveals that the sculptors of Sanskrit education were guided by the sole object of producing pundits. Whether they succeed in producing pundits of their dreams is another matter, but they little cared for the common man who loved and respected Sanskrit. All that he wanted from Sanskrit was general cultural enlightenment and wisdom; instead, he was given technicalities of grammar, specimens of style, jargon of technical terms, philosophical controversies, moral discourses, and historical records, and all this through a foreign medium—the English. He asked for a cake; the Sanskritists gave him a flour mill! The result was that the common Sanskrit lover was estranged from Sanskrit. But still Sanskrit fared well till recent times, as the field of options was very limited and Sanskrit was practically compulsory. As soon as this protection was lifted off and the field of options widened so as to accommodate easier alternatives, Sanskrit collapsed.   This means the common student studied Sanskrit not because he specially liked it but because he could not help it! The painful but inevitable conclusion is that, in their enthusiasm to produce a specialist, designers of Sanskrit education ignored and estranged the common man. Nor did they succeed much in producing the kind of specialist they had in mind while fashioning the system. What little success they achieved in producing a specialist was negated by their failure to build up popular support. They were attempting an impossible feat: constructing a castle in the sky! At the Popular Level It is against this background that SANTRIKA is determined to work even at the popular level by devising ways and means to create and preserve love for Sanskrit in the common man. This is necessary not only for the survival of the specialist but also for Sanskrit to play its part effectively in our national life. It is a great paradox that a cry is often raised to save the Sanskritist, a cry to save Sanskrit—little minding that the saving of Sanskrit would automatically lead to the saving of the Sanskritist. And for the saving of Sanskrit, there is only one way: making people feel intensely like wanting it. If people at large want something, there is no power on earth that would prevent them from getting it. But how to make people want Sanskrit? By convincing them that Sanskrit is their rich heritage, major identity, and goodwill in the world; a powerful integrating element in national life; the vital force of their language and culture; enrichment of life in all stages; and already a part and parcel of their speech and thought. This will remove the popular impression that Sanskrit is a dead, difficult language having little relevance to the present. All talk about Sanskrit being difficult is the outcome of the wrong concepts about the objects and the methods of Sanskrit education. Teaching Sanskrit in a Canadian university revealed to me how easy it is for an Indian student to learn Sanskrit. When I talk in Sanskrit to a Marathi-knowing person, the person may be unable to answer in Sanskrit but finds no difficulty in understanding me. Once convinced of the value and the easiness of Sanskrit, a culturally sensitive man may be unable to answer in Sanskrit but finds no difficulty in understanding me, for the mere joy of it, little minding its value as a career commodity. It is out of these considerations that SANTRIKA has been conducting 1. Classes and meetings for Sanskrit lovers for reading classical literature, the great epics, passages from the Rigveda and the Upanishads, the Yoga-vasishtha, and Sanskrit speaking. 2. A scheme of teaching essential Sanskrit in a month is under preparation, and a comprehensive scheme of graded curriculum texts and examinations in Sanskrit and Indian culture is under active consideration. 3. Pamphlets giving simple Sanskrit equivalents for English expressions of greeting as well as those for standard telegrams and festival greeting cards in Sanskrit together with a rendering in another language are among the miscellaneous efforts by SANTRIKA aimed at making room for Sanskrit in everyday life. 4. A publication wing is being gradually developed. This wing publishes annually, as a joint activity of the Dharma-Nirnaya Mandala and the Jnana Prabodhini, the solar national calendar. This calendar is recommended by the Calendar Reform Committee appointed by the

Sanskrit-Sanskriti-Sanshodhika (Santrika) – Part 3 Read More »

Sanskrit-Sanskriti-Sanshodhika (Santrika) – Part 2

संत्रिका सुवर्ण महोत्सव ५ जून २०२५ लेख क्र. २ या भागात श्री.अर्जुनवाडकरांनी संस्कृतचे देशासाठी काय महत्त्व आहे, त्या महत्त्वाला अनुसरून संत्रिका-विभागाचे काम काय असेल, याबद्दलचे त्यांचे प्रदीर्घ चिंतन मांडले आहे. हे लिहिताना सध्याच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.  संस्कृतच्या अभ्यासकांनी संस्कृत सोबत पाली,प्राकृतचे ज्ञान करून घ्यायला पाहिजे असे लिहिताना; १.संस्कृतमधील संशोधन अधिक समाजोपयोगी व विस्तृत पायावर आधारित होणे. २.अभ्यासाच्या जुन्या परंपरा व नवीन पद्धती यांचा मेळ घालता येणे. ३.संशोधनास व्यापक पायावर आधारित बनवून समाजाच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्याची प्रेरणा निर्माण होणे व त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे, ज्यामुळे विविध विचारसरणी, पंथ, परंपरा, धार्मिकविचार, विविध राष्ट्रांना  समजून घेता येईल… National Value of Sanskrit Equally important is the role Sanskrit has played on the national stage. It has nurtured the Indian brain and mind, speech, and culture for more than four millennia, not discriminating between the orthodox and the heterodox, the religious and the secular, or the spiritual and the material. ‘The Indian people and the Indian civilization were born, so to say, in the lap of Sanskrit.’ (Report of the Govt.of India Sanskrit Commission.) Even while it flourished as a pan-India medium of the learned, Sanskrit let the Prakrits freely draw upon it for content as well as expression, and for the modern Indian languages struggling to keep pace with the fast-moving world of science and technology, Sanskrit is a veritable source of strength, as is blood in any organic system. And this has not been only a one-way traffic; since, through long centuries of its activity as an all-India language, Sanskrit, too, absorbed quite a few elements from Sanskritic and non-Sanskritic linguistic stocks. Sanskrit, thus, is a true symbol of Indian unity. If the Indian people are one nation and not half a dozen or more nations, it is certainly due to Sanskrit. This debt to Sanskrit is acknowledged by Jawaharlal Nehru in the most expressive and unequivocal terms: ‘If I was asked what is the greatest treasure that India possesses and what is her finest heritage, I would answer unhesitatingly—it is the Sanskrit language and literature and all that it contains. This is a magnificent inheritance, and so long as this endures and influences the life of our people, the basic genius of India will continue. (Ibid., p. 72) India is to the world ‘the land of Sanskrit’ and one of the most ancient cradles of civilization. India without Sanskrit would, like a man without a face, forfeit identity, status, and goodwill. It is, therefore, both a duty and a self-interest for us Indians to preserve and nourish Sanskrit. Preservation of Sanskrit on Research Level How well we can do it is the next question, which can be answered on two levels: the research level and the popular level. Before the advent of the university system in the wake of British rule in India, the indigenous system of Pathashalas took care of Sanskrit education at the primary, secondary, and higher levels. It had its own strong points, and products of this system surpassed those of the university system in depth. They, however, lacked the comparative and historical outlook, a gift of the newly introduced university education, and the overall perspective that such an outlook lends to the student. Under the tremendous pressure of the changed conditions, needs of the time, and practical considerations, the old system slowly gave way to the new one. It no longer attracted the best brains, which fact naturally resulted in poor results. The university system, too, planned to work on the lines conceived by and suited to the needs and conceptions of its foreign sculptors but failed to produce results comparable in depth to those of the old system, which the new one supplanted. To use the expressions of a veteran Maharashtrian educationist, the old system produced the ‘misfit,’ while the new one produced the ‘counterfeit.’ Neither system produced just the ‘fit.’ The Santrika Way Given the legacy of the two systems vying with each other in failure, SANTRIKA had to work out its own system, which would combine the strong points of both and develop additional sources of strength, furnish a purpose that would attract the best brains to Sanskrit and allied studies, and provide a utility that would counterbalance the support for such studies expected of the society. This new system would be such as to provide for i) Rigorous training under the masters of the old system as well as those of the new one; ii) Equipment that would lift up the student above the conventional research arena, place in his hands the basic tools of research, and make his studies truly critical, comparative, and historical; and iii) A motivation to make the research fulfil the needs and aspirations of the society by making it broad-based, leading to understanding between different schools, sects, traditions, religious provinces, or nations. The Ailment and the Cure Research fulfilling these conditions is bound to be interdisciplinary, requiring guidance from experts in different subjects and efforts from the student to acquire sufficient grounding in essential and supplementary equipment. The present Sanskritist in India knows little beyond Sanskrit, not even Pali and Prakrit, which are two more facets of Sanskrit itself, while his counterpart in Europe and North America is required to know, beyond Sanskrit, ancient and modern world languages and subjects related to Sanskrit or his special field of research. No wonder, then, that research degrees in foreign countries are rated higher than those in our country. Indian Sanskritists rarely turn to, or are encouraged to turn to, cross-cultural subjects requiring equipment to deal with firsthand Arabic, Tibetan, Chinese, Ceylonese, or similar sources; if at all he chooses subjects from these areas, he has to rely on second hand sources like English translations, good or bad, of the firsthand material. The reason is our research worker is never taught to think this way. SANTRIKA would be justified in adding one more to the already existing institutes in this field if it does not duplicate the existing research pattern

Sanskrit-Sanskriti-Sanshodhika (Santrika) – Part 2 Read More »

संस्कृत-संस्कृति-संशोधिका (संत्रिका)-लेख क्र. १

लेख क्र. १ ज्ञान प्रबोधिनीच्या संस्कृत-संस्कृति-संशोधिका (संत्रिका) या विभागाच्या कामाची सुरुवात १९७५ साली प्रा. कृष्ण. श्री. अर्जुनवाडकर, जे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते व प्रबोधिनीशी सुरुवातीपासून जोडले गेले होते, त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. काम सुरु झाल्यानंतर साधारण ४ वर्षांनंतर झालेल्या कामाबद्दल व भावी काळात संत्रिकेकडून अपेक्षित कामाबद्दल त्यांनी ज्ञान प्रबोधिनी, खंड २ मध्ये इंग्रजी भाषेत विस्तृत लेख लिहिला आहे. संत्रिका विभागाच्या सुवर्ण-महोत्सवानिमित्त तो लेख क्रमशः येथे पुनर्प्रकाशित करीत आहोत. Birth and After On July 22, 1975, Jnana Prabodhini (JP), gave birth to a new babe, later named Sanskrit-Sanskriti-Sanshodhika, or briefly ‘SANTRIKA’ (alluding to the presence of three-trika-Sans in its full form), meaning Sanskrit and Cultural Research Institute. In the presence and with the blessings of about a dozen Sanskritists in Pune, the institute was commissioned forth-with to devise means and programmes for the study, preservation and development of Sanskrit and Indian Culture, both at the popular and the research levels. The task of nursing the new babe and taking its care through the various stages of growth was assigned to Prof. K. S. Arjunwadkar, associated with the JP since its foundation. Sanskrit language, literature and the culture reflected in them have, to all serious-minded and knowledgeable people, a two-fold value: a world value, and a national value. To the world, Sanskrit as a language, belonging to the Indo-European family, is of basic importance, has a long and rich tradition of literature, and commands a unique position as an indisputable, reliable means of understanding the life, mind and culture of the ancient man. The very theory of Indo-European Family of languages owes its origin to the discovery and a deep study of Sanskrit by the European Scholarship and was first heralded by Sir William Jones-popularly known as “ORIENTAL JONES ” in his oft-quoted observation, made in 1786 before the Royal Asiatic Society of Calcutta, about the more-than-accidental relationship between Sanskrit and European languages. The tremendous contribution this theory has made to anthropology cannot be better expressed than by the observation of Prof. Max Muller who considered as the greatest discovery of the 18th century the linguistic equation that Sanskrit ‘Dyaus-pitar’ = Greek ‘Zeus Pater’ = Latin ‘Jupiter’. And all is not said when this anthropological importance of Sanskrit is stressed. Traditions of linguistics, philosophy, literary criticism, Yoga and the like in Sanskrit still continue to inspire and influence world thought in these areas. The impact of Sanskrit Culture, centuries after centuries, on countries East and West of India is too well-known to be detailed. Thus ‘Sanskrit’ by its origin and its basic character links us to the West. But it has been no less potent a bond of union, for India with the lands of Asia with Serindia or Central Asia of ancient and mediaeval times where the cultures of China and India had a common meeting place; with Tibet, China and the lands within the orbit of Chinese Civilization – Korea and Japan and Vietnam and above all, with the lands of farther east of India-Burma and Siam, Pathet Land and Cambodia, and Cochin-China or Champa, and the area of Malaya and Indonesia. Ceylon is of course a historical and cultural projection of India (Report of the Government of India Sanskrit Commission, Pg. 74-75.) All these factors contributed to Sanskrit being recognized as a subject of international importance and it occupies a place of honor in the curricula of leading Universities all over the world. During the period of a little over four years now, the SANTRIKA has made a steady but sure progress on the basis of which it now stands recognized by the Central as well as the State Governments, and is looking forward to University recognition as a Post-graduate Research Centre. It is also gaining a place of love, admiration and respect in the hearts of the lovers of Sanskrit and Culture. Why a New Institute? “In a city like Pune, already crowded with institutions devoted to Sanskrit, many of them on the point of starvation because of the sharp decline in the number of students offering Sanskrit studies, what is the propriety of starting a new institute for a similar purpose?” was amongst the foremost questions asked when SANTRIKA made its first appearance on the stage. Was not the same question asked when its parent institute, the JP, was founded? And are not there still quite a few who, for different reasons, doubt that the JP was ever or is now doing something basically essential to the well-being and progress of the society? The JP has answered such questions fairly well by its work and results during an unbelievably short span of time; and the SANTRIKA, alive to the JP heritage, can hope to do the same. Since, however, the conception of an institute anticipates, the lines and dimensions of the development thereof, an outline of the purpose and the guidelines of the SANTRIKA may not be out of place here. World Value of Sanskrit Sanskrit language, literature and the culture reflected in them have, to all serious-minded and knowledgeable people, a two-fold value: a world value, and a national value. To the world, Sanskrit as a language, belonging to the Indo-European family, is of basic importance, has a long and rich tradition of literature, and commands a unique position as an indisputable, reliable means of understanding the life, mind and culture of the ancient man. The very theory of Indo-European Family of languages owes its origin to the discovery and a deep study of Sanskrit by the European Scholarship and was first heralded by Sir William Jones-popularly known as “ORIENTAL JONES “-in his oft-quoted observation, made in 1786 before the Royal Asiatic Society of Calcutta, about the more-than-accidental relationship between Sanskrit and European languages. The tremendous contribution this theory has made to anthropology cannot be better expressed than by the observation of Prof. Max Muller who considered as the greatest discovery of the 18th century the linguistic equation that Sanskrit ‘Dyaus’- pitar’ = Greek ‘Zeus Pater’ = Latin ‘Jupiter’. And all is not said when

संस्कृत-संस्कृति-संशोधिका (संत्रिका)-लेख क्र. १ Read More »

संस्कृत संस्कृति संशोधिका – संत्रिका

२२ जुलै १९७५ ते २२ जुलै २०२५ वाचस्पती विनायक विश्वनाथ पेंडसे तथा आदरणीय आप्पा पेंडसे यांनी पुण्यात ज्ञान प्रबोधिनीची स्थापना इ. स. १९६२ साली केली.  ती. आप्पांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या दूरदृष्टीतून हळुहळू प्रबोधिनीचे रोपटे घट्ट रुजले, त्याला एकेक फांदी फुटत गेली व ते आता उत्तम बहरले आहे. प्रबोधिनीच्या स्थापनेनंतर  २२ जुलै १९७५ या दिवशी ‘संस्कृत संस्कृति संशोधिका’ म्हणजेच ‘संत्रिका’ या नावाने एका नव्या विभागाची स्थापना झाली. पुण्यातील काही मोजक्या ज्येष्ठ संस्कृत विद्वानांच्या उपस्थितीत, प्रसिद्धी व संशोधन अशा दोन्ही स्तरांवर संस्कृत भाषा व भारतीय संस्कृतीचा विकास व्हावा; त्याद्वारे समाजात संवाद सेतू बांधले जाऊन सामाजिक एकात्मता साधता यावी यासाठी या विभागाची निर्मिती झाली.  या नव्याने उदयास आलेल्या विभागाचे संगोपन तिच्या वेगवेगळ्या वाढीच्या टप्प्यातून करण्याचे काम प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर,जे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते व प्रबोधिनीशी सुरुवातीपासून जोडले गेले होते, यांच्याकडे सोपविण्यात आले. तीन ‘सं’ म्हणून ‘संत्रिका’ याचा अर्थ संस्कृत भाषा व भारतीय संस्कृतीच्या विविध आयामांचा अभ्यास व संशोधन होईल. आज पन्नास वर्षानंतर ‘संत्रिका’ विभाग लोकांच्या हृदयात प्रेम, कौतुक व आदराचे स्थान मिळवत आहे. प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर, यांनी बंगाली भाषा वर्ग, संस्कृतमधील शुभेच्छापत्र, संस्कृत साहित्य चर्चा, सौर कालदर्शिका, पारशी धर्मग्रंथ ‘अवेस्ता’ अशा उपक्रमातून सुरुवातीला केलेल्या कामातून संत्रिका विभागाचे काम मूळ धरू लागले होते. प्रा. यशवंतराव लेले व प्रा. विश्वनाथ गुर्जर यांनी हे कार्य बहुआयामी केले, विविधांगी कामाच्या कल्पना फुलवल्या. राष्ट्रीय एकात्मता विषयावरील मुक्त चर्चेस वाव देणारे ‘राष्ट्रवाद अभ्यास मंडळ’ किंवा सर्वांसाठी खुला असलेला ‘जनतंत्र उद्बोधन मंच’, अथवा प्रबोधिनीतील कार्यकर्त्यांनी ‘आंतरविद्याशाखीय अभ्यास’ समजून घ्यावा यासाठीची ‘मासिक वैचारिक योजना’ अशा उपक्रमांमुळे विविध क्षेत्रातील व विविध विचारसरणींचे सय्यद भाई, असगरअली इंजिनिअर यांच्यासारखे ज्येष्ठ सदस्य संत्रिकेच्या मंचावर आपले विचार खुलेपणाने मांडून गेले. अलीकडच्या काळात अन्य धर्मीय समाजाला समजून घेण्यासाठी कुरआन अभ्यास, मुस्लिम महिलांना शिक्षणामुळे मिळणारी प्रेरणा व संधी याविषयावरील मुलाखती असेही उपक्रम झाले. याप्रकारच्या वैचारिक घुसळणीतून ‘सामाजिक शास्त्र अध्ययन केंद्र’ असे आंतरविद्याशाखीय काम आता स्वतंत्रपणे सुरू झाले आहे. संत्रिका विभागाचा पौरोहित्य उपक्रम – महाराष्ट्रातील धर्मशास्त्राचे विद्वान अभ्यासक पं. नारायणशास्त्री मराठे, तर्कसांख्यतीर्थ पं. रघुनाथशास्त्री कोकजे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी इत्यादींनी इ.स. १९३४ मध्ये सुरू केलेल्या धार्मिक विधीतील कालानुकूल परिवर्तनाचा ‘धर्म निर्णय मंडळाचा’ वारसा संत्रिकेने नुसताच पुढे नेला असे नाही तर त्यात कालोचित मूल्यांची भर घालून तो अधिक समयोचित केला. बुरूड समाजातील सामूहिक विवाह, अंध -अपंग वधू वर विवाह, परीट समाजातील महिलांसाठी कार्यक्रम, सोमवंशीय क्षत्रिय समाजातील सामूहिक उपनयन संस्कार, अशा सर्व समाजगटातील सामूहिक व कौटुंबिक संस्कारांत संत्रिकेचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी अजून बरेच प्रयत्न करायचे आहेत. वटपौर्णिमा, मार्गशीर्षातील गुरुवार, विहीर लोकार्पण विधींच्याद्वारे नवीन विचार देणारे सामाजिक सामूहिक संस्कार निर्माण झाले. देश-विदेशात आता ज्ञान प्रबोधिनीची संस्कार पद्धती पोहोचली आहे. परदेशस्थ भारतीय दूरस्थ (online) पद्धतीने या संस्कारसेवांचा लाभ घेतात. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध समाजगटातील महिला व पुरुषांना ‘स्वयं पौरोहित्य’ करता यावे यासाठी दिले जाणारे प्रशिक्षण.   ग्रंथालय व प्रकाशने – वेद, पुराणे, कोश, विविध भाषा व लिपीमधील रामायणे, असे सात हजारपेक्षा अधिक पुस्तके असलेले समृद्ध ग्रंथालय संत्रिकेत आहे. संस्कार विधींच्या पोथ्या, विविध अभ्यासकांच्या संशोधनातून तयार झालेली ग्रंथसंपदा उदा:- ‘गरुड पुराणातील आयुर्वेद’ किंवा ‘भूकंप’ (प्राचीन भारतीय साहित्यातील भूकंपाबाबतचे संदर्भ), ‘संस्कृत साहित्याचा इतिहास’ या पुस्तकाचे १ ते १० भाग अशी संत्रिकेची प्रकाशने आहेत. दोन सदस्यांच्या ‘भारतीय संस्कृतिमधील कासव’ व ‘श्राद्धामधील दान संकल्पना’ या विद्यावाचस्पती (Ph.D) साठीच्या संशोधनाचे काम संत्रिकेत पूर्ण झाले आहे. संत्रिका विभागाला आता २२ जुलै २०२५ ला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने गेल्या पन्नास वर्षातील कामाचे निवडक दर्शन पुढील ५० दिवस लेख, छायाचित्रे, ध्वनीमुद्रित व्याख्याने याद्वारे आपल्यासमोर आणत आहोत. आपला प्रतिसाद, सूचना यांचे स्वागत आहे. संत्रिका फेसबुक पेजला जरूर फॉलो करा. https://www.facebook.com/share/1Fpk12pa7z/?mibextid=qi2Omg वाच. मनीषा शेटे संत्रिका

संस्कृत संस्कृति संशोधिका – संत्रिका Read More »

श्राद्ध व गणेशपूजन या विधींचे वर्णन

लातूर येथे सेवाभावाने, संघटनवृत्तीने श्री विवेकानंद रुग्णालय चालविणार्‍या डॉ. अ. ल. कुकडे यांच्या वडिलांचे निधन १९७७ मध्ये झाले. तेव्हा त्यांनी संत्रिका विभाग, ज्ञान प्रबोधिनी प्रणीत श्राद्धविधी केला होता. तसेच, रुग्णालयातील मंदिरात गणेश प्रतिष्ठापना सुद्धा त्यांनी ज्ञान प्रबोधिनीकडून केली होती. तेव्हा त्यांनी या दोन्ही विधींचे वर्णन केले होते. संत्रिका विभाग सुवर्ण-महोत्सव साजरा करीत आहे. त्या निमित्ताने त्यांनी केलेले वर्णन येथे देत आहोत. श्राद्ध विधीचे नवे रूप – ज्ञान प्रबोधिनीच्या व्यवहारातून निमित्ता-निमित्ताने होणार्‍या अनेक धार्मिक संस्कारांचे स्वरूप बदलून ते अधिक अर्थपूर्ण झाले आहे. बदलत्या कालानुरुप या संस्कारात नवा आशय आणणारे तसेच व्यक्तीस अधिक समाधान देणारे असे या संस्कारांचे रूपांतर करण्यात आले आहे. विविध धार्मिक संस्कारांचे महत्त्व अत्यंत आहे. परंतु त्यातील अनेक संस्कार केवळ अवडंबर या स्वरूपात शिल्लक राहिले आहेत याचे दुःख होते. या संस्कारांत सहभागी होणाऱ्यांना त्यांचा अर्थही कळत नाही व प्रत्यक्ष संस्कार पाहण्यासाठी उपस्थित असणाऱ्या इतर व्यक्तींचा या संस्कार विधीत काहीच सहभाग नसतो. ज्ञान प्रबोधिनीने या संस्कारांच्या बाबतीत दोन महत्त्वाचे बदल केले आहेत आणि या महत्त्वाच्या बदलांमुळे त्या संस्कारांचे स्वरूपच बदलून गेलेले जाणवते. ते स्वरूप अधिक भावस्पर्शी व त्यामुळे अधिक उपयुक्त झाले आहे. पूर्वीच्या संस्कारातील अनेक श्लोक वा वचने तशीच घेऊन पाठोपाठ त्याचे मराठी गद्य-पद्य विवरण आणि अध्वर्यूच्या पाठोपाठ सर्व उपस्थितांनी पठण करणे या दोन बदलांमुळे एक आगळेच वातावरण उभे राहाते. या आगळ्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभवच सर्वांनी घेतला पाहिजे. ज्ञानप्रबोधिनीने अनेक संस्कार लिहिले आहेत, पैकी दोन संस्कारांचा अनुभव या ठिकाणी विशद करीत आहे. मरणोत्तर श्राद्धविधी – दि. २० ऑगस्ट १९७७ रोजी माझे वडील डॉ. ल. दि. कुकडे यांचे आकस्मिक निधन झाले. दहन पारंपरिक पद्धतीनेच परंतु विद्युत दाहिनीमध्ये केले. नंतर ९-१०-११-१२-१३ या दिवसांचे विधी करण्याचा प्रश्न आला. ज्ञान प्रबोधिनीने या विधींची एक पोथी तयार केली आहे. पाच दिवस विधी करण्याऐवजी ११ व्या दिवशी सर्व विधी एकदमच, घरीच करता येतील अशी त्यात योजना आहे. हे ‘एकोद्दिष्ट श्राद्ध’ करण्यासाठी नदीच्या काठी जावे लागत नाही. आपल्या घरीच ते जागा असल्यास करता येते. त्यासाठी नातेवाईकांनी, मित्रांनी सकाळी शुचिर्भूत होऊन एकत्र बसणे व पोथीप्रमाणे सर्व संस्कार करणे अपेक्षित आहे. उपाध्याय असले तर चांगलेच, पण ते नसले तर कोणीही शुचिर्भूत व्यक्तीने अध्वर्यू म्हणून पोथी वाचन करण्याची यात सोय आहे. प्रथम संस्कृत श्लोक, पाठोपाठ मराठी विवरण आणि मराठीतून तोच संस्कार करणे अशी पद्धत येथे असल्याने कोणता विधी कशासाठी, काय व कसा चाललाय याची सर्वांना योग्य जाण येते. त्यामुळे सर्वांचा या विधीत सहभाग होतो. आप्ताच्या वा मित्राच्या मृत्यूचे दुःख असले तरी त्याचे उचित स्मरण करीत असल्याचे समाधान सर्वांना मिळते. हा विधी सुमारे १ तासाचा असतो. सर्वच दृष्टीने सुटसुटीत !! संध्याकाळची श्राद्धसभा – सायंकाळी सर्व आप्तेष्ट, मित्र पुन्हा शोकसभेसाठी एकत्र येतात. सुमारे एक तास भजनाचा अतिशय हृदयस्पर्शी कार्यक्रम असतो. मृत व्यक्तीच्या प्रतिमेसमोर सर्व कार्यक्रम त्यामुळे त्या व्यक्तीचे स्मरण स्वाभाविकतःच प्रत्येक क्षणी होते. नंतर काही व्यक्तींची छोटी छोटी भाषणे असतात. भजनात सर्वांचा सहभाग तर भाषणात काहींचा. परंतु त्यामुळे उपस्थितांतील सर्वांनाच समाधान मिळते. श्रद्धेने केलेल्या या श्राद्धाचीही अनुभूती आगळीच आहे. शेवटी प्रसाद वाटप. असा एकूण कार्यक्रम असतो. व्यक्तीच्या सामाजिक, कौटुंबिक स्थानानुसार या कार्यक्रमात थोडाफार बदल होऊ शकतो. माझ्या वडिलांचे एकोद्दिष्ट श्राद्ध आम्ही या प्रकारे केले. त्यामुळे खऱ्या अर्थाने श्राद्ध, श्रद्धापूर्वक स्मरण केल्याचा आनंद आम्हाला मिळाला. गणेश संस्थापना – अशा प्रकारे संस्कार करण्याचा पण अगदी वेगळ्या प्रकारचा अनुभव दुसऱ्या एका कार्यक्रमात आला. आमच्या लातूर येथील विवेकानंद रुग्णालयात आम्ही एक छोटे गणेश मंदिर बांधले आहे. मानवी प्रयत्नांची शर्थ करीत असतानाच तेथे भगवंताचे अधिष्ठान असलेच पाहिजे या भावनेने या मंदिरात आम्ही गणेश प्रतिष्ठापना करण्याचे ठरविले. ही प्रतिष्ठापना ज्ञान प्रबोधिनीने गणपती स्थापनेची जी पोथी केली आहे तिच्यानुसार करावयाची ठरविली. पारंपरिक पूजेतील काही ऋचा, अथर्वशीर्षातील श्लोक, अन्य काही निवडक श्लोक यांची मिळून ही पोथी करण्यात आलेली आहे. श्लोकापाठोपाठ मराठी विवरण आहेच. तेही अध्वर्यूनी समजावून सांगावयाचे असते. पोथीतील मंत्रांना गेय चाली लावलेल्या आहेत. अध्वर्यू संगीत मंत्र म्हणतात. पाठोपाठ सर्व उपस्थित ते अनुसरतात व त्याचे अर्थ विवरण मराठीत. पुन्हा याच पद्धतीने पुढील मंत्र. असे सगळ्या वास्तूत ते मंत्र वातावरण भारून टाकतात. खर्‍याखुर्‍या अर्थाने ती प्राणप्रतिष्ठा होते. आपल्या धार्मिक विधीत असलेल्या संस्कारक्षमतेचा प्रत्यय येतो. संस्कार कार्यक्रमात सामाजिक आशय भरला जातो. ज्यासाठी या सर्व कार्यक्रमांची योजना असते, तो हेतू साध्य होतो. या सर्वांची अनुभूतीच घेतली पाहिजे. हे विविध प्रयोग अद्याप नवीन आहेत. तथापि आतासुद्धा त्यांचा प्रभाव जाणवतो. यांचा अधिक प्रसार व्हावयास पाहिजे, म्हणजे अनुभवांती काही बदल करता येतील. हे संस्कार अधिक अर्थवाही करता येतील. कदाचित आणखी काही नवीन गोष्टींची भरती करता येईल, काहींना रजा देता येईल. सर्वच संस्कारांच्या नूतनीकरणाची कल्पना यातून पुरी होऊ शकेल.

श्राद्ध व गणेशपूजन या विधींचे वर्णन Read More »

भारतीय भाषांचे भवितव्य काय? (भाग १)

लेख क्र. १६ २०/६/२०२५ संत्रिकेच्या कामाची त्रिसूत्री हळूहळू स्पष्ट होत गेली. संस्कृत भाषेचे संवर्धन, संस्कृतीचे संवर्धन व त्यासाठी आवश्यक संशोधन सुरु झाले. विविध विषयांवरील अभ्यास, संशोधन, व्याख्यानमाला, कालानुरूप संस्कारविधींची निर्मिती व प्रसार असे काम फुलत गेले. प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर, प्रा. यशवंत लेले, डॉ. म. अ. मेहेंदळे (भांडारकर संस्था), पं. महादेवशास्त्री जोशी, डॉ. सरोजा भाटे, डॉ. श्रीकांत बहुलकर, डॉ. रा. चिं. ढेरे, प्रा. राम डिंबळे, डॉ. संभाजीराव भावसार, अशा व्यक्तींच्या येण्याने विभाग समृद्ध होत गेला. यातील प्रा. यशवंत लेले व प्रा. राम डिंबळे यांचे संत्रिकेशी अतूट नाते जुळले आहे. प्रा. यशवंतराव लेले यांनी संत्रिकेचे विभाग प्रमुख म्हणून पद स्वीकारले. त्यांनी स्वतः सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे धागे जोडत अनेक व्यक्तींना व विषयांना संत्रिकेशी जोडले. ते स्वतः अखंड अभ्यास करतात व अनेकांना अभ्यासाची प्रेरणा देतात. आतापर्यंत आपण संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठीचे प्रयत्न वाचले. तसेच मराठी भाषा विभागात रुजविण्यासाठी यशवंतरावांनी अनेक शब्द प्रचलित केले. मातृभाषा व भारतीय भाषांवर होणारे इंग्रजीचे अतिक्रमण त्यांना कधीच आवडले नाही. सध्या हिंदी भाषा विद्यार्थ्यांना सक्तीची करावी की नाही यावरती बाहेर सुरु असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आणि २०११ साली केंद्रिय हिंदी समितीने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक परिपत्रक काढले होते, त्यात हिंदी भाषा सोपी केली जावी असे म्हटले होते. हिंदी सह अन्य भारतीय भाषांमध्ये झालेली इंग्रजीची सरमिसळ, एकूणच भाषांची झालेली दयनीय स्थिती आणि त्यातून निघालेले केंद्राचे परिपत्रक पाहून श्री. यशवंतराव लेले यांनी त्यांचे विचार लेखाच्या रूपात प्रकट केले. ते आजही वाचनीय आहे. अलीकडे केंद्रीय हिंदी समितीची एक बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होऊन असे परिपत्रक काढण्यात आले आहे की ‘राजभाषा आता सरल आणि सुगम करण्यात यावी. वृत्तपत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या हिंदी भाषेस कठीण आणि क्लिष्ट ठरवून उदाहरणे कोणती दिली आहेत ते पहाण्यासारखे आहे.भोजन शब्दाऐवजी लंच, क्षेत्र ऐवजी एरिया, ‘महाविद्यालया’पेक्षा कॉलेज, ‘वर्षाजल’च्या जागी रेन वॉटर, नियमित ऐवजी रेग्युलर, श्रेष्ठतमच्या ऐवजी बेस्ट फाइव, आवेदन ऐवजी अ‍ॅप्लाई, छात्र पेक्षा स्टुडंट्स, उच्च शिक्षण म्हणण्याऐवजी हायर एज्युकेशन, हे शब्द वापरण्यास सुचविले आहे. भोजन हा शब्द क्लिष्ट? ‘रेन वॉटर’ हा शब्द प्रयोग काय वर्षाजलापेक्षा सुलभ आहे? आता संस्कृतनिष्ठ शब्दांऐवजी इंग्रजी शब्दप्रयोग करण्याची ही शिफारस म्हणजे हिंदीचा प्रवास इंग्रजीच्या दिशेने व्हावा असे सरकारने सूचित केले आहे, यात काही संदेह नाही.खरोखरी अस्मितेची चक्रे उलटी फिरवण्याचे हे काम केंद्रशासन करते आहे. मात्र याचा आरंभ पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळीच झाला आहे. हिंदी भाषेत सारी शास्त्रे, कला इ. विषय सार्थपणे शिकता शिकवता यावेत यादृष्टीने डॉ. रघुवीर यांच्याकडे बृहत् हिंदीकोश रचण्याचे अशक्य वाटणारे काम देण्यात आले होते. ते त्यांनी प्रचंड मेहनतीने पूर्णही केले होते. पण आज हा ‘बृहत् हिंदी कोश’ कुणाच्या तरी पाहण्यात आहे का? ऐकण्यातही नसेल, तर वापरात असण्याचा प्रश्नच येत नाही. हे असे का घडले? स्वत: नेहरूंनीच या कोशातील काही पारिभाषिक शब्द घेऊन सर्व कोशाची टर उडवल्यानंतर जो संदेश समाजापर्यंत जायला नको तो सहजच गेला व नवी हिंदी परिभाषा बनण्याऐवजी इंग्रजी शब्द वापरण्यास प्रोत्साहन मिळाले!मराठी भाषेत स्वातंत्र्यवीर सावरकर, कवी माधव ज्यूलियन, आणि त्याही आधीचे विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक इत्यादींनी दैनंदिन व्यवहारातील अनेक नवनवीन इंग्रजी शब्द घडवले व ते नियतकालिकांमधून सामान्यजनांपर्यंत पोचवले असल्याने हिंदीच्या केंद्रीय समितीने कठीण आणि क्लिष्ट म्हणून अव्हेरलेले असले तरी ते हिंदी व मराठी माणसास परिचित आहेतच. जुन्या पिढीच्या वापरातही ते आहेत. पण मराठीतही इंग्रजीची भर अ-पारिभाषिक शब्दांसाठीही वेगाने पडत चालली आहे हे आपण पाहतोच. गत शतकाभरात संगणक आला, चलभाष आला, नाना नवी शास्त्रे आली. पर्यावरणशास्त्र अभ्यासक्रमात बसवण्यात आले. व्यक्तिमत्वविकसन हा अभ्यासक्रमाचा एक विषय ठरला, मूल्य शिक्षण आवश्यक ठरले. आजही विज्ञान, तंत्रज्ञानाची प्रचंड घोडदौड वेगात चालू आहे. मराठी माणसाने परम हा महासंगणक स्व-प्रज्ञेने बनवला, संगणक, दूरध्वनी, चलभाष अथवा भ्रमणभाष हे अन्वर्थक शब्दही बनले… पण संगणकीय शास्त्रास आवश्यक ती सारी शब्दावली इंग्रजीच राहिली।परिणामी इंग्रजीचा महिमा इतका वाढत गेला की त्या मेकॉलने स्वप्नातही त्याची कल्पना केली नसेल! त्याने प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावे व नंतर इंग्रजीचा आरंभ व्हावा असे सुचवले होते. आज आपण मात्र पहिली पासून इंग्रजी एक विषय सुरु करून आता आपण जगाबरोबर प्रगत होत राहणार असा विश्वास बाळगून आहोत.पटपडताळणीतून शिक्षणसम्राटाच्या साम्राज्यातून किती सुरस आणि चमत्कारिक गोष्टी घडत आहेत याचे विश्वरूप दर्शन घडले आहे! आता गुणवत्ता पडताळणी होणार असे ऐकतो. त्यातून काय चमत्कार पुढे येतील त्याचा तर्क करण्याची जरूर नाही. एम्. ए. इग्रजी विषयात उत्तीर्ण झालेल्या युवकांना दोन वाक्ये इंग्रजीतून बोलणे शक्य होत नाही हा प्रत्यक्ष अनुभव आहे! अशा स्थितीत दहावी बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांनी पहिलीपासून इंग्रजी शिकवून तयार केलेल्या पिढीच ज्ञान किती ‘अफाट’ असेल याची कल्पना सहज येऊ शकते!पालकांचीच हौस अशी आहे की बालवाडीपासूनच इंग्रजी माध्यम सुरू होऊन आपले पाल्य लवकरात लवकर साहेब व्हायला हवेत! हे उच्चभ्रूंसाठीचे प्रयोग सुरु असून नेकटाय – सुटबुट चढवून ती अजाण बालकं ‘गुडमार्निंग’, ‘हाय’, ‘टाटा’, ‘प्लीज’, ‘सॉरी’ इत्यादी आपल्या बोबड्या बोलांनी मम्मी-डॅडींना धन्य धन्य करताहेत! ग्रामीण भागातील कृषिकार्यातील पालकांनाही मग सहजच वाटते, ‘हे पुढे चालले, आपण मागे राहून कसे चालेल?’ मग ते परवडो न परवडो, पण मुलांना ‘अप् टु डेट’ पोशाख चढवून इंग्रजीची दीक्षा देण्याची ते सुरुवात करत आहेत!देशी भाषा, देशी वेष, देशी संस्कृती या साऱ्याच गोष्टींना ‘चले जाव’ म्हणणे चालले आहे. इतिहासासारखे विषय इंग्रजी माध्यमातून समजावून घेणे हे किती दुर्घट आहे ते पालकांनी स्वत: तो विषय इंग्रजीतून मुलांना सांगून पाहावा म्हणजे त्यांना काहीशी कल्पना यईल!इंग्रजी वृत्तपत्रांनीही हिंदीच्या इंग्रजी-करणाचे कौतुक चालवले आहे. त्या वृत्तपत्रांमध्ये ‘हिंग्लिश गेन्स रिस्पेक्टेबिलिटी’, ‘हिंग्लिश गेन्स ग्राउंड इन इंडिया’, ‘हिंग्लिश विल बी व ऑफिशियल लँग्वेज ऑफ इंडिया’ अशी हर्षोत्फुल्ल शीर्षके वाचायास मिळत आहेत. याचा अर्थ हाच की हिंदीचं भवितव्य अंधकारमय आहे, इंग्रजी हीच राजभाषा बनण्याचा हा सारा खटाटोप आहे. हिंग्लिशच्या टप्प्यानंतर यायची इंग्लिश! पण हिंदी पुरता हा प्रश्न मर्यादित नाही, तिकडे संस्कृतनिष्ठ हिंदीची मुस्कटदाबी करून इंग्रजी प्रचुर हिंग्लिश शासकीय भाषा बनू पाहात आहे आणि तिला शासना बरोबर सामान्य माणसांचाही पाठिंबा दिसतो आहे कारण इंग्रजी ही ज्ञानभाषा महणून आम्हाला हवी, सर्व माध्यमे त्यासाठी कटिबद्ध आहेत.हिंदी हिंग्लिश बनून ‘प्रगती’ चे गाजर दाखवते आहे तर मग मराठी तरी मागे का राहावी? मराठीची मिंग्लिश बनवण्याची घाई सर्वत्र चालूच आहे. मराठी माणसे इंग्रजी ही ‘जगाची’ भाषा म्हणून तिची भक्ती करू लागली आहेत आपल्याला अमेरिकेत जाऊन तेथील समृद्ध जीवनाचा उपभोग घेण्याचे स्वप्न साकार व्हावं असं जर वाटत असेल तर बाकी सारे सोडून आधी इंग्रजीचा वसा घ्यायलाच हवा. त्याचा मार्ग मिंग्लिशच्या उपासनेपासूनच सुरू होतो. आपली गावरान मराठी सोडून आधी अधिकाधिक इंग्रजी शब्द वापरून प्रतिष्ठित झाल्याचा अनुभव घेत प्रगत होऊया. म्हणजे मिंग्लिश भाषी होऊ या व मग पुढची पायरी शुद्ध इंग्रजीची! ती काही दूर नाही! अशा प्रकारे उत्तम इंग्रजी शिकून आम्ही जग जिंकू! एखादा शेक्सपिअर देखील त्यातून उत्पन्न होईल! प्रत्यक्ष इंग्लंड मध्येही आजवर दुसर्‍या शेक्सपिअरचा जन्म झालेला नाही. अमेरिका, कॅनडा इ. आंग्लभाषी देशांनाही ते भाग्य लाभले नाही. त्या भाग्याची

भारतीय भाषांचे भवितव्य काय? (भाग १) Read More »

स्वामी विवेकानंद यांचा देशधर्माचा विचार

लेख क्र. ३० ०४/०७/२०२५ मा. श्री. यशवंतराव लेले यांनी देश, धर्म, वेद-पुराण इ. विषयांवरील स्वामी विवेकानंदांचे विचार या लेखात मांडलेले आहेत. हा लेख ‘स्व’-रूपवर्धिनी संस्थेच्या कार्यवृत्त २०११ मध्ये प्रकाशित झाला. ज्ञान प्रबोधिनीच्या पथकाधिपतींमधील विवेकानंद व त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांचे विचार व कार्य भारतीय स्त्री-पुरुषांनी आत्मसात करायला हवेत असा यशवंतरावांचा आग्रह आहे. राष्ट्र – स्वामी विवेकानंदांनी एक राष्ट्र म्हणून हिंदुस्थानचा सखोल विचार केलेला आहे. ‘हिंदु राष्ट्र म्हणजे ज्यांच्या अंत:करणात समान अध्यात्मविचारांचे ध्वनी उठतात अशांचे राष्ट्र’, ‘या हिंदू राष्ट्राचा प्राण कशात असेल तर तो अध्यात्मात!’ असे त्यांचे स्पष्ट प्रतिपादन आहे. पण हे अध्यात्म म्हणजे तरी काय? अगदी व्यावहारिक उदाहरण देऊन ते सांगतात, ‘मला आधी खायला हवे, इतरांपेक्षा मला अधिक धन मिळायला हवे. मीच आधी मुक्तीचा अधिकारी व्हायला हवे,’ असे विचार करण्यापेक्षा ‘न लगे मुक्ती धनसंपदा’ असे जो म्हणतो, त्याचप्रमाणे स्वार्थाचा काही विचार न करता ‘दुसर्‍याला साहाय्य मिळवून देण्यासाठी मी नरकात जाण्यासही तयार आहे’ असे म्हणण्याइतका नि:स्वार्थीपणा आपल्या ठिकाणी यायला हवा. कारण माझ्यात अन् दुसर्‍या माणसात काय फरक आहे? तो आणि मी एकसारखेच आहोत, नव्हे तर एकच आहोत! तो स्वर्गात गेला आणि मला नरकात धाडले तर मी स्वर्गसुखाचा तेथे आनंद घेईन! आमच्यात भेद नाही. आमच्यात अद्वैत आहे. तो वेगळा-मी वेगळा असा दोनपणाचा भावच नाही. म्हणजेच आमच्यात द्वैत नाही. याला संस्कृतात म्हणतात अद्वैत! स्वामीजी भारतीयांना सांगतात ‘अद्वैती व्हा’. पूर्वपश्चिम भेद – युरोपातील राष्ट्रांशी तुलना करता आपला देश अजून राष्ट्र म्हणावयास पात्र नसल्याचे त्यांना वाटे. ते म्हणाले, ‘इंग्रजांना हिंदुस्थान जिंकणे इतके सोपे का गेले?’ ‘कारण ते राष्ट्र आहेत’. आम्ही राष्ट्र नाही. आमच्यातील एखादा थोर पुरुष जेव्हा मरतो तेव्हा दुसऱ्याची वाट पाहात आम्हास शतकानुशतके थांबावे लागते. त्यांच्याकडे एक मेला, दुसरा तयार असतो. असे का? त्यांच्याकडे माणसे निवडण्याचे क्षेत्र अत्यंत व्यापक आहे. आमचे अत्यंत लहान आहे. कित्येक कोटींच्या देशात (२० कोटींच्या भारतात) थोर पुरुष निवडण्याचे क्षेत्र लहान आणि ३ कोटीच्या देशात अशा निवडीचे क्षेत्र मोठे, हे कसे? कारण एवढेच, त्या देशातून शिकलेल्या स्त्री-पुरुषांची संख्या अत्यंत मोठी आहे. ध्येयासाठी संघटित झालेला समाज म्हणजे राष्ट्र. ध्येयसाधनेसाठी संघटना करायची तर वेगवेगळ्या समाजातील समान भूमिका शोधावी लागते, मग त्या आधारे राष्ट्रीयत्वाची जाणीव जागृती करता येते.           यानंतर आमचा समान इतिहास स्वामीजी सांगतात, ‘हे सारे करायला निघताना ध्यानात ठेवा आपल्या या पवित्र भूमीवर अत्याचारी आक्रमकांच्या लाटांमागून लाटा आल्या. आयुष्य कोणत्या क्षणी संपेल याची शाश्वतीच कोणा हिंदूला राहिली नव्हती. जगाच्या इतिहासात या भूमीइतके दु:ख आणि या भूमीला दास्यात जखडण्यासाठी केली गेली तेवढी धडपड दुसर्‍या कोणत्याही देशाच्या अनुभवास आलेली नाही. पण तरीही एक समाज म्हणून आज आपण जवळजवळ जसेच्या तसे खडे आहोत. इतकेच नव्हे तर प्रसंग आल्यास, पुन्हा तशा संकटांना परतवून लावण्यास सिद्ध आहोत. इतकेच काय, हिंदुस्थानाबाहेर जाऊनही आम्ही पराक्रम करू शकतो आणि खरोखरी बाहेर जाणे, वाढणे हेच जिवंतपणाचे निदर्शक आहे.             स्वामीजींनी पश्चिमेत जाऊन तेथील समाजजीवनाचे सूक्ष्म निरीक्षण केले होते. इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल सारखी युरोपीय राष्टे दर्यावर्दी म्हणून प्रसिद्ध आहेत. ज्यांनी नौकानयनात प्रगती केली असे हे सारे देश, नावेवर ‘नित्य नवा दिवस संकटाचा’ अशा परिस्थितीशी सामोरे जात असतात व अशा वादळांचे वेळी नावेवरील प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या कामात दक्ष राहून प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो ते त्या नावेच्या सुरक्षेसाठी ! बाप मुलाच्या नावे हाका मारत नाही की मुलगा मदतीसाठी बापाला हाकारत बसत नाही. सारेजण एक दिलाने कर्तव्यदक्ष राहून नाव वाचवतात. तिच्यात पाणी भरू लागले असेल ते सर्व शक्ती एकवटून बाहेर काढून टाकत असतात. पण या सांघिक प्रयत्नात यश नाहीच आले तर सारेच्यासारे त्या जहाजासकट नाहीसे होण्यासही मागेपुढे पाहात नाहीत. नौकेवरील हे सहकार्य, ही कुटुंबभावना, हे संघटन, इंग्रजी जीवनात घरोघरी मुरले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे संघटन हा सहज गुणधर्म दिसून येतो. विदेशातून स्वदेशी परतल्यावर स्वामींनी कोलंबोपासून अल्मोरापर्यंत जी व्याख्याने दिली त्यात संघटनेचा महिमा वारंवार सांगितलेला दिसतो. तो सांगताना ‘To sail or sink together’ हा वाक्यप्रयोग त्यांना सुचत राहिला असावा. हिंदुस्थानातील चित्र अगदी वेगळे होते. स्वामी म्हणत, ‘आम्हा हिंदूंचा सर्वात मोठा दोष असा की आपल्या हातातील सत्तेमध्ये दुसऱ्याला भागीदार करण्याची आमची तयारी नसते.’ राष्ट्र समर्थ व समृद्ध करायला समाजातील संघटनवृत्ती कशी कारणीभूत होते हे स्वामी विवेकानंदांनी मुख्यतः अमेरिकेमध्ये पाहिले. भारतात अशी संघटनवृत्ती जोपासण्यासाठी भारतीयांमध्ये कोणते गुण आले पाहिजेत याविषयी आपले चिंतन त्यांनी भाषणांमधून, पत्रांमधून मांडले आहे.             गुणग्रहण करून एकमेकांना साहाय्यक होणारी संघटना आवश्यक आहे. म्हणून अशी एक संस्था स्थापन करावी जिथे नित्यनेमाने एकत्र यावे लागेल. माझ्या मित्रांनो मग तेज तुमच्या पाठोपाठ येईल. संघटन आमचा स्वभाव बनायला हवा. त्यासाठी मत्सररहितता हे मुख्य सूत्र आहे. सर्वांना प्रेमाने जिंका. वाढणे आणि गतिशील असणे हीच जिवंतपणाची खूण आहे. स्वामीजींनी म्हटले आहे, ‘हे ध्यानात ठेवा की, कार्य करणारे तुम्ही नसून कार्य करविता तो परमेश्वर आहे !’ द्वितीय सरसंघचालक प. पू. श्रीगुरूजी हे स्वामीजींच्या गुरुबंधूंचे, स्वामी अखंडानंदांचे, शिष्य होते. त्यामुळे स्वामी विवेकानंदांचे संघटना कार्य मूर्त रूपात आज लक्षावधी सेवाकार्यांमधून उभे राहिलेले आपण पाहतो. ते रा. स्व. संघाच्या द्वाराच घडत आहे. (अशा संघटनेत बहुमताचे जोरावर निर्णय घ्यावेत असे स्वामींना वाटत नव्हते. त्याचे कारण पाश्चात्य देशातील समाजाप्रमाणे येथील समाज प्रगल्भ नव्हता, हे दिसते.) आज्ञांकितता हा महत्त्वाचा गुणधर्म संघटनेत आवश्यक असतो हे स्पष्ट करताना स्वामी म्हणतात, ‘नदीत उडी टाकून सुसरीला पकडा अशी वरिष्ठांनी आज्ञा केली तर ती तुम्ही प्रथम पाळली पाहिजे, आज्ञा चूक की बरोबर याचा विचार नंतर’. बंगालमध्ये स्वामी पाहात होते, ब्राह्मो समाजातील वरिष्ठांमध्ये मतभेद होऊन हा समाज दुभंगण्याचे प्रसंग अनेकदा घडले होते. स्वामी म्हणत ‘संघाबद्दल तुम्हाला अत्यंत निष्ठा हवी. इथे अवज्ञेस स्थान नाही. अवज्ञा करणाऱ्यास दूर केले पाहिजे. संघटनेत विश्वासघातकी कोणी असता कामा नये. आकाशासारखे विशाल व आज्ञांकित असे संघ सदस्य हवेत.’             स्वामी विवेकानंदांचे, म्हणजेच एका ‘पराक्रमी’ संन्याशाचे, विश्वविजय करून ते परतल्यावर जे देवदुर्लभ स्वागत भारतीयांनी केले ते हिंदू जातीच्या परंपरेला साजेसेच असल्याचे स्वामीजींनी स्वत: म्हटले आहे. पुढे ते सांगतात, ‘हिंदू जातीचे चैतन्य, हिचा जीवनाधार, हिचा आत्मा, म्हणजे केवळ धर्मच आहे. आपणास धर्म हे एवढेच साधन उपलब्ध आहे की, ज्याच्या साहाय्याने आपण पुढे जाऊ शकू. इंग्रजाला धर्मही राजकारणाद्वारे कळतो, अमेरिकनास समाजसुधारणांमधून धर्म कळतो पण हिंदूंना राजकारणही कळू शकले ते केवळ धर्माच्याच वाटे. धर्म हाच येथील ओंकार ध्वनी आहे.’ अशा या हिंदू धर्माची वैशिष्ट्ये स्वामीजींनी सुस्पष्ट केली आहेत. हा धर्म कोणा एका व्यक्तीवर आधारलेला नाही. श्रीकृष्णासही वेद वंद्य आहेत. तसेच, स्वामींचा सारा भर होता उपनिषदांवर. त्यातही ‘शक्तीची उपासना’ हिंदूंसमोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अहिंसा हा बुद्धाचा मार्ग पण स्वामींचे मते उपनिषदांचा मार्ग अधिक चांगला आहे.             ‘शोपेन हौवरने’ भविष्य वर्तवले आहे की पूर्वी ‘डार्क एजेस्’ नंतर जशी ग्रीक व लॅटिन संस्कृती सर्व युरोपभर पसरली. त्याप्रमाणे हिंदू संस्कृतीचे

स्वामी विवेकानंद यांचा देशधर्माचा विचार Read More »

विवाह : निरर्थक की अर्थपूर्ण अन भावपूर्ण ?

श्री. यशवंतराव लेले माहेरचे एक छोटेसे रोप घेऊन सासरी जाणारी नववधू हे सारस्वत समाजाचे वैशिष्ट्य असल्याचे ऐकले होते. खरं तर प्रत्येक नववधू ही मातृघरातून काढून पतीच्या घरी नेऊन लावलेलं एक सुंदरसं रोपच असतं. बहुधा लाजाळूचंच हे रोप असतं ! नव्या ठिकाणी रुजण्याचं, वाढण्याचं, फुलण्याचं अन् जीवन सफल करण्याचं छोटं मोठं स्वप्न, घेऊन ते आलेलं असतं ! वातावरण नवं, स्थळ अन् माळीही नवाच ! काय चांगलं अन् काय वाईट हेही सांगता येत नसतं. अनामिक हुरहुर अन् बरोबर भीतीही त्या नवलक्ष्मीच्या (की वनलक्ष्मीच्या) हृदयी दाटलेली असते. प्रसंग असतो लक्ष्मीपूजनाचा ! पारंपरिक विवाहविधीचा अखेरचा भाग असतो लक्ष्मीपूजन ! नववरासह वधूने गृहप्रवेश केल्यानंतर त्या नववधूस लक्ष्मीस्वरूप समजून घरादारानं वंदन करण्याचा हा प्रसंग ! तो मनःपूर्वक असेल, प्रेमपूर्वक असेल तर संसार सुरळीत होण्याचा संभव ! आशयाचं भान खरोखर सर्व लग्नविधी अर्थपूर्ण होईल तर कितीतरी संसार आनंदाची उधळण करू लागतील. आजच्या साऱ्या संस्कारांमधून अर्थ लुप्तप्राय झाला आहे. त्यामध्ये पुनश्च अर्थ भरण्याची नितान्त आवश्यकता आहे. लग्नविधींमध्ये तर याची विलक्षण गरज आहे, कारण सहजीवनातील संभाव्य धोके टाळण्यासाठी सहभागी होणाऱ्या उभयतांना त्यांचे कर्तव्य अन् अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी लग्नविधीतील मंत्रांचे अर्थ सु-स्पष्ट व्हायला हवेत, त्यावर विचार व्हायला हवा ! आपण उभे आयुष्य एकमेकांशी बांधून घेतो आहोत. बहिरंग पसंतीने परस्परांचा स्वीकार झाला असला तरी बहिरंग उडू लागण्यापूर्वीच अंतरंगातील भावसौंदर्यात बद्ध होऊन एकमेकांसाठी व अपत्यांसाठी परस्परांनी धरून राहण्याची प्रतिज्ञा करायची असते, याचे भान वधूवरांना यायला हवं अन् पुरोहितांनी त्यांना भानावर आणण्यासाठी संस्कृत मंत्र स्पष्ट करून सांगायला हवेत. शब्दांचं ज्ञान आजचा लग्नविधी हा मुख्यतः भोजन समारंभ, त्यासाठीचं कार्यालय आणि ‘आनुषंगिक’ म्हणून विवाह कर्मकांड असा पार पाडण्यात येतो. यात बदल व्हायला हवा. जीवनात शरीरसुखाबरोबर मानसिक, बौद्धिक, आत्मिक असेही मोठे सुख असते व कोणत्याही सहजीवनात काही ना काही देवघेव, तडजोड ही अपरिहार्यच ठरते, या गोष्टी वधूवरांनी जाणून घ्यायला हव्यात, मनोमन स्वीकारायलाही हव्यात ! पुरुषांनी तर ही गोष्ट विशेष ध्यानी घ्यायला हवी आहे. लग्नात वधू त्यांना वचन मागते व वर त्रिवार ने देतोही; पण आपण वचन मागतो आहोत, हे त्या वधूस कळत नाही अन् आपण पत्नीस काही वचन एकदाच नव्हे तर त्रिवार दिले आहे याचा पता वरासही नसतो ! धर्म, अर्थ अन् काम या कशातही आपल्या कन्येची मानमर्यादा जावयाने मोडू नये, अशी वधूपित्याची अपेक्षा असते. म्हणून तो मुलीला नववराकडे तसे वचन मागण्यास सुचवत असतो. किती विवाहित स्त्रियांनी समजून उमजून असे वचन आपापल्या लग्नात मागितले व किती नवऱ्यांनी अर्थ समजून घेऊन वचन दिले होते. याचा विचार करून पहावा. धर्म-अर्थ-काम हे शब्द कळले असतील, तर त्या शब्दांचा अर्थ काय होतो, याचा विचार लग्नप्रसंगी केला होता का ? याचा विचार व्हावा. त्रिविध पुरुषार्थाची साधना व्हावी, म्हणून धर्मपत्नीसह गृहस्थाश्रमात प्रवेश केला हे खरे; पण पुरूषार्थसाधनेत पत्नीच्या आशा-आकांक्षांचा मान ठेवून मार्गक्रमणा होणे अपेक्षित असते हे स्मरणात हवे. कालबाह्य गोष्टी ! अनेकांच्या दृष्टीने सीमान्तपूजन हा लग्नाचा प्रारंभ असतो. सीमान्तपूजन पूर्वसंध्येस केले जाते. हा विधी वैदिक नाही व गृह्यशास्त्रांसारख्या ग्रंथातही दिलेला नाही. गावच्या वेशीवर जाऊन वराचे स्वागत करण्याचा हा रिवाज जुन्या जमान्यात ठीक होता. आता त्याची काही आवश्यकता नाही व हे श्रीमंतपूजनही नव्हे, हे ध्यानी ठेवू या. त्यातूनही काही करायचेच तर उभयपक्षांमधील एकेका जाणकार व्यक्तीने आपापल्या पक्षातील एकेका व्यक्तीचा नेमका परिचय करून द्यावा. यावेळी वर-वधूपक्षीय सारी मंडळी शांतपणे बसलेली असावीत व आपण ज्या नवीन कुटुंबाशी जोडले जातो आहोत त्यांची नीट ओळख करून घेण्याची संधी साधावी. वधूचा मामा, वराचा मामा समोरासमोर येऊन श्रीफलाचे आदान-प्रदान करून जागेवर जाऊन बसतील, तर उभयपक्षीय नातेवाईक एकमेकांना भेटल्याने चेहरा माहितीचा होण्यापेक्षा अधिक काम साधत नाही. म्हणून या विधीत अधिक अर्थ भरला पाहिजे तो चांगल्या परिचयाने. कोणत्याही धर्म विधीत संकल्प, पुण्याहवाचन हे असतात. ते उरकून कन्यादान करण्याची प्रथा असते. हल्ली कन्या शिकलेल्या असतात, आपले दान देण्यात यावे हे त्यांना आवडतेच असे नाही. अशा वेळी स्वयंवर विधीने प्रारंभ करावा हे उचित होईल. वधू व वर हे वयात आलेले म्हणजेच सज्ञान तर असतातच; पण सुशिक्षित, विद्वान अन् सुसंस्कृतही असतात. अशा दोघांनी परस्परांना पतीपत्नी म्हणून सर्वाच्या साक्षीने स्वीकारणे म्हणजेच ‘स्वयंवर.’ या पद्धतीतही वडील मंडळींचायोग्य तो मान ठेवला जातोच. अपेक्षांची परिपूर्ती करण्याचे अभिवचन यानंतरचा विधी अक्षतारोपणाचा असतो. गृहस्थाश्रमात प्रवेशताना आपापल्या काय अपेक्षा आहेत, हे उभयतांनी सांगणे व परस्परांच्या अपेक्षा पुऱ्या करण्याचा शब्द देताना एकमेकांच्या मस्तकावर ‘तथास्तु’ म्हणून अक्षता टाकणे यास अक्षतारोपण म्हणतात. काळानुसार या अपेक्षा अधिक सुस्पष्ट व नेमक्या शब्दात व्यक्त करण्यात याव्यात, म्हणजे त्या पूर्ण करण्याची शक्यता वाढते. वधूने मग, श्री आणि संततीची म्हणजेच सर्व प्रकारची समृद्धी, सुंदरता आणि इष्ट अपत्यांची इच्छा व्यक्त केल्यावर ती पूर्ण करण्याचा शब्द ‘तथास्तु’ म्हणून वधूचे मस्तकी अक्षता टाकत वराने द्यायचा असतो, याचरोबर वर यज्ञ, धर्म आणि यश अशा तीन अपेक्षा व्यक्त करतो. वधूने ‘तथास्तु’ म्हणून वराच्या मस्तकी अक्षता टाकत त्यास मान्यता द्यावयाची असते. या विधीतील वराच्या अपेक्षा आजही विचार करण्यासारख्या आहेत. धर्म म्हणजे न्यायनीतीच्या आचरणाची अपेक्षा. ‘यश’ शब्दामधून असामान्य अशा सद्‌गुणसमूहाची साधना अपेक्षित आहे, तर यज्ञ शब्दातून उदात्त जीवनध्येयं सूचित होते. पतीस ध्येयनिष्ठ होण्यात अन् राहण्यात, न्यायनीतीचे मार्गावर साथसंगत देण्यात, आणि उत्तम गुणांची संपदा वाढवण्यात वधूने सहाय्यक व्हावे, हे तर या विधीचे उद्दिष्ट असते. एकट्या वराच्या वा एकट्या वधूच्या या अपेक्षा असतील असे नाही. प्रसंगी या सर्व अपेक्षा दोघांनीही बरोबरीने व्यक्त कराव्यात असे वाटल्यास त्या त्यांनी व्यक्त कराव्यात व आचार्यांनी त्या उभयतांच्या मस्तकी अक्षता टाकून त्यांना आशीर्वाद द्यावा. वधू-वरांच्या याहूनही अन्य अपेक्षा असू शकतात. त्या तशा असल्यास त्यांचा उल्लेख करण्यास काहीच अडचण नाही. ज्ञान प्रबोधिनी पद्धतीच्या विवाहविधीत अनेक वधू-वरांनी हा मार्ग स्वीकारलेला आहे. प्रत्यक्षात विवाहापूर्वी यावर वाचन, चिंतन विचारविनिमय होईल, तर नेमक्या शब्दात हव्या त्या अपेक्षा व्यक्त होतील व त्यांची परिपूर्ती होण्याची शक्यताही वाढेल. मंगल बंधन दोघांनाही हवेच मंगलसूत्रबंधनाचा विधी प्राचीन नाही व आजही सार्वत्रिक नाही, उत्तरेत सिंदूरभरण तेवढे असते. मंगळसूत्र नसते. मंगळसूत्राचा स्वीकार करणाऱ्या वधूने वरासाठी असेच एकनिष्ठ राहण्यासाठी बंधन अवश्य घालावे. ते अंगठी, कंठी वा साध्या गोफातील ओंकार चिन्हाच्या स्वरूपाचे असले तरी चालेल; पण मंगळसूत्राइतकेच सातत्याने वराने ते चिन्ह वापरून आपल्या पत्नीनिष्ठेचे प्रमाण देत राहिले पाहिजे. साखरपुड्याच्या वेळी अंगठी दिली असेल, तर मंगळसूत्रबंधनापूर्वी ती वधूने वराकडून घेऊन बंधन म्हणून त्यास द्यावी हा पर्यायही काहींनी वापरलेला आहे. सौभाग्यवान् होण्यासाठी पाणीग्रहण ! यानंतर असतो पाणीग्रहण विधी. परस्परांचे उजवे हात हाती घेणे हा याचा अर्थ. वराने यावेळी म्हणावयाचा मंत्र ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील आहे. पंचाऐंशी क्रमांकाचे विवाहसूक्त हे आजच्या विवाहाचे मूळ आहे. त्यातील पाणीग्रहणाचा मंत्र सूर्या नामक तेजस्वी युवतीने रचलेला असून तिच्या स्वयंवरात तिने वराकडून म्हणजे आश्विनाकडून तो म्हणवून घेतला होता. “माझ्या सौभाग्यासाठी मी तुझा हात हातात घेत आहे. माझ्यासह तू वृद्धत्वापर्यंत (सुखात) रहावेस व गृहस्थाश्रमीय कर्तव्ये उत्तम रीतीने पार पाडावीत यासाठी भग, अर्यमा, सूर्य व इंद्रांनी माझी अर्धांगिनी म्हणून तुझी योजना केली आहे”, अशा अर्थाचा तो

विवाह : निरर्थक की अर्थपूर्ण अन भावपूर्ण ? Read More »