वैचारिक

बाह्य सृष्टीवर प्रेमाने विजय

हिंदू संस्कृतीचे असे वैशिष्ट्य आहे, की भारतीयांना कधीच महासत्ता व्हावेसे वाटले नाही. पूर्वीच्या काळीही नाही, आणि आजही नाही. भारतीय समाजाने स्वप्न पाहिले, ते विश्वगुरू होण्याचे. सामान्य मनुष्यापासून देवमाणूस कसे बनायचे हे सगळ्या जगाला शिकवावे, अशी भारतीयांची इच्छा होती. जगाला शिकवणे म्हटल्याने किंवा विश्वगुरू म्हटल्यानेही आपण इतरांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे वाटू शकते. तशी श्रेष्ठत्वाची भावनाही भारतीयांनी […]

बाह्य सृष्टीवर प्रेमाने विजय Read More »

संस्कृतीचे पहिले लक्षण : बाह्य सृष्टीवर विजय

बाह्यसृष्टीवर विजय मिळवणे हे उद्दिष्ट समोर ठेवून हिंदू समाजाने प्राचीन काळात विज्ञान संशोधनामध्ये मोठी आघाडी मारली होती. गणितातील दशमान पद्धती आणि शून्याची कल्पना, खगोलशास्त्रातील पृथ्वीला गती आहे, पण ती स्थिर भासते हा सिद्धांत, रसायनशास्त्र, वैद्यक आणि शल्यचिकित्सा या सगळ्यांमध्येच हिंदू समाजाने आघाडी घेतलेली होती. अगदी पेशवाईच्या काळापर्यंत हे विज्ञान आणि तंत्रज्ञान हिंदू समाजाने सांभाळले. इंग्लंडमध्ये

संस्कृतीचे पहिले लक्षण : बाह्य सृष्टीवर विजय Read More »

संस्कृती : जीवनदृष्टी आणि जीवनपद्धती

जीवनदृष्टी आणि जीवनपद्धती यांना मिळून आज संस्कृती असा शब्द वापरतात. पूर्वीच्या काळी भारतीय भाषांमध्ये संस्कृती हा शब्द वापरात नव्हता. त्याऐवजी धर्म हा शब्द आपण बापरायचो. समाजाची धारणा करणारा म्हणजे समाजाला एकसंध व प्रगतिशील ठेवणारा तो धर्म, अशी धर्माची व्याख्या आहे. निश्चित जीवनदृष्टी आणि त्यानुसार बनलेली जीवनपद्धती असेल तरच समाजाची धारणा होते. म्हणजे समाजातील सर्व व्यवस्था

संस्कृती : जीवनदृष्टी आणि जीवनपद्धती Read More »

जीवनपद्धती : इतरांसाठी जगणे

आपण बारकाईने निरीक्षण करत गेलो, तर सर्वसामान्य लोकांच्या साध्या-साध्या कृतीतून ही जीवनदृष्टी व्यक्त होत जाते. एखाद्या समाजाची ओळख त्याच्या जीवनदृष्टी वरूनच होते. जीवनाकडे बघायचा भारतीय दृष्टिकोन सांगण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एका फुलाचे उदाहरण घेऊन म्हटले आहे, अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती । कोणी त्यांची महती गणती केली असे । परी जे गजेंद्रशुंडेने उपटिले, श्रीहरीचरणीं ठेविले

जीवनपद्धती : इतरांसाठी जगणे Read More »

बाह्यसृष्टी व अंतःसृष्टी यांचा समतोल

फार प्राचीन काळी भारतीयांनी बाह्य सृष्टीवर विजय मिळविण्याचा प्रयत्न चालू केला. त्यानंतर बाह्यसृष्टीबरोबर प्रत्येकाच्या मनाच्या आणि बुद्धीच्या आतील अंत सृष्टीवर विजय मिळविण्याचा प्रयत्न चालू केला. पुढे बाह्य सृष्टीवर विजय मिळविण्याच्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष झाले व अंतः सृष्टीच्या शोधातच भारतीय समाज रमला. नेमका त्याच काळात आधुनिक विज्ञान व समुद्रप्रवासाच्या साहाय्याने युरोपने बाह्य सृष्टीवर विजय मिळविण्याचा मोठा प्रयत्न

बाह्यसृष्टी व अंतःसृष्टी यांचा समतोल Read More »

समाज स्थिर, गट बदलते

अनेक माध्यमातून एक आकार वेगवेगळ्या घरांच्या शो-केसेसमध्ये अनेक प्रकारच्या शोभेच्या वस्तू बघायला मिळतात. एकदा दिल्लीमध्ये दहा-बारा दिवस राहायला लागले, कामानिमित्त अनेक खासदार, मंत्री, अधिकारी, वकील यांच्या घरी जायला लागले, शिवाय बरेच दिवस मुक्काम असल्याने संध्याकाळी व रात्री नव्या-जुन्या परिचितांकडेही जाणे व्हायचे. नकळत सगळ्या घरांच्या बैठकीच्या खोलीतील शो-केसेसमध्ये ठेवलेल्या वस्तूंची मनात नोंद व्हायची. एके रात्री अचानक

समाज स्थिर, गट बदलते Read More »

धर्मसंस्थापना : धर्मसंस्थापनेचे आधुनिक स्वरूप

भारतीय मुशीतला विचार भारतीय राष्ट्राच्या विकासासाठी समर्थांचे विचार आज ही मार्गदर्शक होऊ शकतील असे वाटते, म्हणून हे संकलन केले. याची सुरुवात व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक सद्गुणांच्या वर्णनाने केली आहे. याचा शेवट हे गुण अंगी बाणवलेल्या भाग्यवान व्यक्तीच्या वागण्याच्या वर्णनाने केला आहे. राष्ट्र विकसित होण्यासाठी व्यक्ती विकसित होणे हे मुख्य. त्याचा भारतीय मुशीतला आणि स्वत: अनुभवलेला विचार

धर्मसंस्थापना : धर्मसंस्थापनेचे आधुनिक स्वरूप Read More »

ज्ञान प्रबोधिनी : देशातील संस्थात्मक जीवन समृद्ध करणारी संघटना

१. प्रबोधिनीचे वर्णन “संस्थात्मक जीवन समृद्ध करणारी संघटना” असे करावे हे प्रथम १९९० मध्ये सुचले. त्याचे स्पष्टीकरण आजवर कोणी विचारले नव्हते आणि मी ही केले नव्हते. डिसेंबर २००७ मध्ये राजगुरुनगर येथील प्रबोधक प्रशिक्षण वर्गाच्या वेळी प्रभागश: भूमिका मांडणारी सत्रे झाली तेव्हा असे स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता जाणवली. हे टिपण माझ्या मनातील अर्थाच्या स्पष्टीकरणासाठी लिहिले आहे. यावर

ज्ञान प्रबोधिनी : देशातील संस्थात्मक जीवन समृद्ध करणारी संघटना Read More »

सर्वसमावेशक अध्यात्म

भारतात राहणाऱ्या ख्रिश्चन, ज्यू, पारशी आणि मुसलमानांचे धर्म हे हिंदू धर्माचा भाग होऊ शकतात का? ‘उपास्यानाम् अनियमः साधनानाम् अनेकता’, आणि प्रतीक व साधन यांच्या निवडीत प्रत्येकाचे व्यक्तिस्वातंत्र्य या भारतीय संस्कृतीच्या तीन गोष्टी त्यांनी स्वीकारल्या तर त्यांचे त्यांचे धर्म ही सनातन धर्माचा म्हणजे हिंदू धर्माचा भाग होऊ शकतात. सप्तशतीमध्ये एक श्लोक आहे, या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण

सर्वसमावेशक अध्यात्म Read More »

ईश्वरनिष्ठांची मांदियाळी

इतरांच्या तुलनेत भारत तुलना दोन प्रकारांनी करता येते. एकाच प्रकारच्या कामात कोणी कमी, कोणी जास्त काम केले हे बघता येते. जे इतर कोणी करत नाही असे वेगळे काय करतो हे पण बघता येते. पहिल्या तुलनेला ‘प्रमाणाची’ तुलना म्हणता येईल. दुसऱ्या तुलनेला ‘प्रकाराची’तुलना म्हणता येईल. जे मोजता येते त्याची प्रमाणाची तुलना करता येते. लोकसंख्या, उत्पादन, आर्थिक

ईश्वरनिष्ठांची मांदियाळी Read More »