संत्रिका सुवर्ण महोत्सव

७. प्रथम ते द्वितीय प्रतिज्ञेचा प्रवास

प्रथम प्रतिज्ञेनंतर द्वितीय प्रतिज्ञेची आवश्यकता का आहे? प्रथम प्रतिज्ञा आजीवन राष्ट्रसेवा करण्याची आहे. राष्ट्रसेवा कशी करायची याचा निश्चय त्यात नाही. राष्ट्रसेवेचे अनेक मार्ग आहेत. ते हळूहळू कळत जातात. त्यात आपल्या स्वभावाला अनुकूल असा मार्ग त्यानंतर लक्षात येतो. काही जणांना आपले कार्यक्षेत्र सापडते. कार्यक्षेत्र सापडले तरी त्यात काम करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक व्यक्तिशः काम करण्याची […]

७. प्रथम ते द्वितीय प्रतिज्ञेचा प्रवास Read More »

५. प्रतिज्ञितांची सामूहिक शक्ती

नवा विचार माझा या वर्षात द्वितीय प्रतिज्ञेसंबंधी नव्याने काही विचार झाला. द्वितीय प्रतिज्ञा आयुष्यभरासाठी असते. प्रथम प्रतिज्ञेने आपण व्यक्तिशः राष्ट्रसेवेचे व्रत घेतो. द्वितीय प्रतिज्ञेनुसार आपण संघटनेचे घटक म्हणून राष्ट्रसेवा करण्याचे ठरवतो. ‘प्रबोधिनीचा मार्ग हा राष्ट्रसेवेचा सर्वश्रेष्ठ मार्ग’ की ‘कोणत्याही संघटनेचा घटक होऊन राष्ट्रसेवा करणे हा सर्वश्रेष्ठ मार्ग’ असा प्रश्न अनेकांना पडतो असे त्यांच्याशी चर्चा करताना

५. प्रतिज्ञितांची सामूहिक शक्ती Read More »

५. संघटनेच्या विकासाचे टप्पे

प्रबोधिनीच्या द्वितीय प्रतिज्ञितांना प्रबोधिनीच्या स्थापना-दिनी प्रतिज्ञेबद्दल किवा संघटनेचा स्वरूपाबद्दल दरवर्षी पत्र लिहित असतो. तसे हे आठवे पत्र. प्रबोधिनीच्या एकूण द्वितीय प्रतिज्ञितांची संख्या आता २०१५ अखेर ३४५ झाली आहे. या ३४५ सदस्यापैकी आज प्रबोधिनीच्या एखाद्या विभागात किंवा केंद्रात नियमित किंवा प्रासंगिक काम करणारे सुमारे १२५ सदस्य आहेत. अन्य सर्वजण प्रबोधिनीत पाच पासून पंचवीस वर्षे काम करून

५. संघटनेच्या विकासाचे टप्पे Read More »

संघटना म्हणजे काय?

कोणत्याही समाजामध्ये तीन प्रकारांनी लोक एकत्र जमत असतात. एक प्रकार म्हणजे ‘संस्था, दुसरा प्रकार म्हणजे ‘संघटना’, व तिसरा प्रकार म्हणजे ‘मित्रसमूह’. ‘संस्था’ दोन प्रकारच्या असतात. औपचारिक संस्था सरकारने केलेल्या कायद्याप्रमाणे तयार होतात व चालतात. अनौपचारिक संस्था या समाजातील रूढी, परंपरा व प्रथांमुळे बनलेल्या असतात. एखादी बँक, कंपनी, शिक्षणसंस्था किंवा क्लब या औपचारिक संस्था आहेत. कुटुंब,

संघटना म्हणजे काय? Read More »

उत्तमतेची साधना

प्रबोधीनीचे दीर्घकालीन उद्दिष्ट राष्ट्र उभारणी आणि ध्येय धर्मसंस्थापना आहे हे कळले. प्रबोधिनीची कार्यपद्धती काय आहे? तनमनधनपूर्वक आणि उत्तरदायी राहून काम करणे ही प्रबोधिनीची कार्यपद्धती आहे. काम करता करताच ही पद्धती समजत जाते. तनमनधनपूर्वक काम करायचे तर बुद्धीचा निश्चय किंवा निर्णय व्हायला पाहिजे. आपल्याला दोन प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. धोरणात्मक निर्णय आणि कार्यवाहीचे निर्णय. एखाद्या ध्येयासाठी

उत्तमतेची साधना Read More »

२. उत्तरदायी सदस्य म्हणजे

तनमनधनपूर्वक काम करणे आणि उत्तरदायी राहून काम करणे या गोष्टी जमायला बराच वेळ लागेल. तोपर्यंत रोज काय करायचे ? रोज काय करायचे हे प्रत्येकाने स्वतःच प्रयोग करत ठरवायला लागेल. सर्वसामान्य प्रबोधिनीपण आणि विशेष प्रबोधिनीपण स्वतःमध्ये बाणविण्याचा प्रयत्न चालू ठेवला तर रोज काय करायचे हे स्वतःलाच सुचत जाईल. दिशादर्शक म्हणून पुढील काही गोष्टी सुचवता येतील. त्यातल्या

२. उत्तरदायी सदस्य म्हणजे Read More »

द्वितीय प्रतिज्ञिताची जीवनशैली

द्वितीय प्रतिज्ञेमध्ये राष्ट्रसेवा आणि धर्मसंस्थापना या ध्येयांसाठी संघटनेचा घटक म्हणून आयुष्यभर काम करण्याचा संकल्प करायचा असतो. असे काम करायचे झाले तर दिवसाचे काही तास या ध्येयासाठी काम करायचे आणि इतर सर्व वेळ आपल्या आवडी-निवडीनुसार कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवनात घालवायचा असे करून चालत नाही. संघटनेतील जीवन दिवसाच्या काही तासांचे असू शकेल. संघटनेतील काम आणि आपले उदरनिर्वाहाचे

द्वितीय प्रतिज्ञिताची जीवनशैली Read More »

संघटनेचे पर्यावरण

१. सामूहिक द्रष्टेपणा यंदा अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण झाले. त्या दिवशी रात्री अनेकांनी ते ग्रहण अनेक ठिकाणांहून पाहिले. कोणी नुसत्या डोळ्यांनी पाहिले. आणखी कोणी दुर्बिणीतून पाहिले. विविध शक्तीच्या अनेक दुर्बिणी अनेक गच्च्यांमधून व टेकड्यांवरून ग्रहणाच्या आधीपासूनच चंद्राकडे रोखल्या गेल्या होत्या. ज्यांनी नुसत्या डोळ्यांनी ग्रहण पाहिले, त्यापेक्षा जास्त तपशील दुर्बिणीतून पाहणाऱ्यांना बघायला मिळाले. दुर्बिण

संघटनेचे पर्यावरण Read More »

मंत्रपुष्पांजली- सार्वभौम राज्याची कामना

लेख क्र. ५६ ३०/०८/२०२५ गणेशोत्सव भारतीय मनाला आनंद देणारा आहे. कुटुंबाला, समाजाला संघटित करणारा आहे. गणेशाची स्थापना झाल्यापासून त्याच्या विसर्जनापर्यंत केली जाणारी आरती हा सुद्धा भारतीय मनाला आस्था असणारा विषय आहे. आर्तभावाने ईश्वराला मारलेली हाक म्हणजे आरती. आरती म्हणून झाल्यावर हातात फुले आणि अक्षता घेवून मंत्रपुष्प वाहिले जाते. पूजेतील सोळा उपचारातील हा शेवटचा उपचार मानला

मंत्रपुष्पांजली- सार्वभौम राज्याची कामना Read More »