वैचारिक

११. आपापल्या श्रद्धेच्या बळावर एकाच सत्याकडे

११. आपापल्या श्रद्धेच्या बळावर एकाच सत्याकडे ज्ञान प्रबोधिनीच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त महापुरुषपूजा या नावाचा एक अभिनव कार्यक्रम करण्यात आला होता. या पूजेमध्ये सर्व धार्मिक संप्रदायांच्या धर्मग्रंथांची पूजा करण्यात आली. त्या ग्रंथांमधल्या काही प्रार्थना म्हणण्यात आल्या व रामदास, दयानंद, विवेकानंद आणि अरविंद या चार राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या महापुरुषपूजेचे वृत्त ज्ञान प्रबोधिनीच्या दुसऱ्या खंडात […]

११. आपापल्या श्रद्धेच्या बळावर एकाच सत्याकडे Read More »

१०. जो जशी श्रद्धा ठेवतो, तसा तो होतो.

 १०. जो जशी श्रद्धा ठेवतो, तसा तो होतो. लोक अनेक तऱ्हांनी वागत असतात. ते जसे वागतात तसे का वागतात हे शोधण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या स्वभावाची ठेवण जशी आहे, तसे ते वागतात हे लक्षात येते. कोणाचा स्वतः धडपड करण्यावर भर असतो. कोणी सरकार करील म्हणून वाट पाहतात. कोणी देव देईल ते घ्यायचे म्हणून स्वस्थ बसतात.

१०. जो जशी श्रद्धा ठेवतो, तसा तो होतो. Read More »

९. आपले आग्रह नसण्यात भक्तीचे रहस्य आहे

९. आपले आग्रह नसण्यात भक्तीचे रहस्य उद्दिष्टाकडे जायला जी कृती मदत करते ती पुण्य. उद्दिष्टाच्या विरुद्ध दिशेने नेणारी कृती, ते पाप. पाप-पुण्याच्या अशा व्याख्या केल्या तर उद्दिष्ट कोणते? स्वतःच्या खऱ्या रूपाची ओळख होणे, आत्मसाक्षात्कार होणे हे उद्दिष्ट सुद्धा एका व्यक्तीपुरते मर्यादित आहे. समाजबांधवांची सुखदुःखे उत्कटतेने जाणवणे, त्यांना योग्य कृतीने प्रतिसाद देणे हे जर कर्मातले सर्वोच्च

९. आपले आग्रह नसण्यात भक्तीचे रहस्य आहे Read More »

८. कामातील गुणवत्तेच्या चढत्या-वाढत्या पायऱ्या

८. कामातील गुणवत्तेच्या चढत्या-वाढत्या पायऱ्या आजपर्यंत गीतेतील सात श्लोकांचे निरूपण पाहिले. वीरवृत्तीने सदैव कामाला सज्ज असणे हे त्यांपैकी पहिल्या श्लोकाचे तात्पर्य. स्वतःच स्वतःच्या प्रगतीची सूत्रे हातात घ्यायची असतात हे दुसऱ्या श्लोकाचे सार. सर्व क्रिया वेळच्या वेळी, योग्य प्रमाणात, योग्य रितीने केल्याने साध्य होणारा योग दुःख दूर करतो हे तिसऱ्या श्लोकात पाहिले. पुढच्या तीन श्लोकांमध्ये मिळून

८. कामातील गुणवत्तेच्या चढत्या-वाढत्या पायऱ्या Read More »

७. मन एकाग्र केल्याने सर्व प्रकारचे ज्ञान मिळते.

७. मन एकाग्र केल्याने सर्व प्रकारचे ज्ञान मिळते. ‘अविद्यया मृत्युं तीर्त्वा –‌’ भौतिक ज्ञानाने भौतिक जगात यशस्वी होऊन ‌‘– विद्यया अमृतम्‌‍ अश्नुते‌’, अध्यात्मज्ञानाने अमृतत्वाचा अनुभव येतो, हे प्रबोधिनीचे बोधवाक्य आहे. भौतिक ज्ञान मिळवून कर्मवीर भौतिक जगात यशस्वी होतो. कर्मयोग्याला शेवटी अध्यात्मज्ञान मिळते व तो अमृतत्वाचा अनुभव घेतो. अर्जुन कर्मवीर होताच. त्यामुळे कर्मवीर होण्यासाठी काय करायचे

७. मन एकाग्र केल्याने सर्व प्रकारचे ज्ञान मिळते. Read More »

६.सर्वात दुर्बळ दुव्यापाशी साखळी तोडा

६.सर्वात दुर्बळ दुव्यापाशी साखळी तोडा दोन छान बोधप्रद गोष्टी आहेत. पहिल्या गोष्टीत एका राजाचे डोळे खूप दुखायला लागतात. त्यांची आग-आग होत असते. वैद्य येतो, डोळे तपासून निदान करतो. खूप रखरखीत, उन्हाचे वातावरण बरेच दिवस आहे. त्यामुळे डोळे कोरडे पडले आहेत. उपाय म्हणजे राजाने भरपूर हिरवाई पाहावी असे वैद्य सांगतो. राजाने लगेच सर्व भिंती, वस्तू, कपडे,

६.सर्वात दुर्बळ दुव्यापाशी साखळी तोडा Read More »

५. उद्दिष्टाकडे जाण्यातला अडथळा आहे ‘काम’

५. उद्दिष्टाकडे जाण्यातला अडथळा आहे ‌‘काम‌’ खेळांच्या किंवा कसरतींच्या विविध प्रकारांपैकी एक प्रकार आहे, गोल कड्यामधून उडी मारण्याचा. शरीर मधल्या जागेतून आरपार जाऊ शकेल एवढे मोठे गोल कडे असते. ते जमिनीपासून थोडे वर उचलून उभे धरलेले असते. पुरेशा वेगाने येऊन नेम धरून उडी मारली तर पलीकडे जाणे थोड्या सरावाने जमू शकते. पळत येऊन कड्यामधून सूर

५. उद्दिष्टाकडे जाण्यातला अडथळा आहे ‘काम’ Read More »

४ हाव आणि राग हेच आपले खरे शत्रू

४ हाव आणि राग हेच आपले खरे शत्रू स्वतःचा उद्धार करण्यासाठी स्वतःजवळ शक्ती हवी. त्याच बरोबर पुढे जाण्यासाठी पायाखाली भक्कम आधार हवा. स्वतःची प्रगती करणे हेच उद्दिष्ट असेल, त्यासाठी युक्ताहारविहाराचे नियम नियमित व्यवस्थित पाळायचे असतील, तर उद्दिष्टावरून लक्ष ढळून चालणार नाही. आपले लक्ष उद्दिष्टावर स्थिर ठेवायला ज्या गोष्टी मदत करतात त्या म्हणजे आधीच्या श्लोकातील युक्ताहारविहार.

४ हाव आणि राग हेच आपले खरे शत्रू Read More »

३.शक्तिसंग्रहासाठी स्वयं-अनुशासन

३.शक्तिसंग्रहासाठी स्वयं-अनुशासन पहिले दोन श्लोक प्रौढांना जेवढे मार्गदर्शक तेवढेच ते युवक-युवती आणि किशोर-किशोरींनाही मार्गदर्शक आहेत. त्या मार्गाने जायचे तर सुरुवात कुठून करायची हे या तिसऱ्या श्लोकात सांगितले आहे. किशोर-किशोरींसाठी आपण विद्याव्रत संस्कार योजतो. त्याच्यासाठी रचलेल्या पोथीतील हा श्लोक आहे. (विद्याव्रत उपासना पोथी, चौथी आवृत्ती, २०१७, पान १७) स्वतः स्वतःचा उद्धार करायचा, आहोत त्या स्थितीतून स्वतःला

३.शक्तिसंग्रहासाठी स्वयं-अनुशासन Read More »

२. स्वतःच्या मर्यादा सतत ओलांडणे म्हणजे स्वतःचा उद्धार

प्रबोधिनीत एक पद्य म्हटले जाते. त्याचे शेवटचे कडवे आहे – ‌ ‘मर्यादांनी मर्यादुन? छे ! त्यांना उल्लंघुनी पुढे पुढे चालणे असू दे हेच ध्येय तव मनी ॥‌’ हे पद्य लिहिले गेले त्याच सुमारास प्रबोधिनीच्या उद्योगांमध्ये खंडेनवमीच्या यंत्रपूजनाच्या उपासनेची पोथी तयार झाली. त्या उपासनेमध्ये उपासनेचे सूत्रचालक किंवा अध्वर्यू असे म्हणतात की ‌‘सीमोल्लंघन म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्या

२. स्वतःच्या मर्यादा सतत ओलांडणे म्हणजे स्वतःचा उद्धार Read More »